शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

३०५ हॉटेलच्या एनओसी तयार, मालकांचा मात्र पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 6:55 AM

ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारपासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद बुधवारी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. आयुक्तांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करून सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिले होते.

ठाणे - ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारपासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद बुधवारी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. आयुक्तांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करून सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अग्निशमन विभागाने अवघ्या काही तासांतच शहरातील ५०० पैकी शिल्लक ३०५ हॉटेलच्या एनओसीदेखील तयार केल्या आहेत. परंतु, त्या ताब्यात घेण्यासाठी अद्यापही एकाही हॉटेलचालकाने अग्निशमन विभागाशी संपर्क साधलेला नाही. विशेष म्हणजे या एनओसीअभावी शहर विकास विभागाकडूनदेखील त्यांनी परवाने घेणे शिल्लक आहे. ३१ मार्चपर्यंतही कार्यवाही पूर्ण केली नाही, तर पुन्हा या हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित केली आहेत. परंतु, उर्वरित हॉटेलवाल्यांनी याची पूर्तता न केल्याने ते सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर, तीन दिवसांत ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले. परंतु, अग्निशमन दलाच्या जाचक अटी पॅनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवारपासून बंदची हाक दिली होती. यासंदर्भात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर या चार्जेसचे स्लॅब करून ते २५ लाखांवरून थेट पाच लाखांपर्यंत खाली आणले आहेत. तसेच सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार, अग्निशमन विभागाने आपली जबाबदारी पारदेखील पाडली.अग्निशमन विभागावर टीका करणाºया बार आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी याच विभागाने रात्री ११.३० वाजेपर्यंत शहरातील शिल्लक राहिलेल्या ३०५ हॉटेल, बारच्या एनओसी तयार केल्या आहेत.आंदोलकांना आता गरज नाही कागुरुवारी दिवसभरात एकही हॉटेल व्यावसायिक अग्निशमन विभागाकडे फिरकलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विभागावर टीका करणाºया आणि आंदोलन करणाºया हॉटेल व्यावसायिकांना आता एनओसीची गरज नाही का, असा सवाल मात्र यानिमित्ताने शहरात तसेच पालिका वर्तुळात उपस्थित झाला आहे.शहर विकास विभागाचाही घ्यावा लागणार परवाना''अग्निशमन विभागाचे चार्जेस कमी केले असले, तरी शहर विकास विभागाचे कम्पोडिंग आणि चेंज आॅफ युजर्सचे चार्जेस मात्र कमी झालेले नाहीत. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाची एनओसी घेतल्यानंतर या हॉटेल व्यावसायिकांना चेंज आॅफ युज करून घेऊन त्याची माहिती शहर विकास विभागाला सादर करायची आहे. यासाठी आता केवळ २२ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.असे असताना अद्याप अग्निशमन विभागाकडूनच एनओसी न घेतल्याने शहर विकास विभागाची एनओसी केव्हा मिळणार हादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ३१ मार्चपर्यंत जे हॉटेलचालक या प्रक्रिया पूर्ण करतील, तेच १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, जे या प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिका