शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

३०५ हॉटेलच्या एनओसी तयार असतांनाही एकानेही घेतली नाही ताब्यात, पुन्हा कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:32 IST

अग्निशमन विभागावर ठपका ठेवणाºया हॉटेलवाल्यांनी एनओसी तयार असतांना देखील अद्यापही ताब्यातच घेतल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या हॉटेलवाल्यांवर पुन्हा कारवाईची टांगती तलावर उभी राहिली आहे.

ठळक मुद्देरात्रभर जागून अग्निशमन विभागाने तयार केल्या एनओसीशहर विकास विभागाची एनओसी घ्यावी लागणार

ठाणे - ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवार पासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी मंगळवार पासून बंद पुकारला होता. परंतु आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर हॉटेल व्याविसायिकांनी बंद मागे देखील घेतला आहे. आयुक्तांनी अ‍ॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वास दिल्यानंतर आणि सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अग्निशमन विभागामार्फत अवघ्या काही तासातच शहरातील शिल्लक राहिलेल्या ३०५ हॉटेलच्या एनओसी तयार देखील झाल्या आहेत. परंतु त्या ताब्यात घेण्यासाठी अद्यापही एकाही हॉटेल चालकाने अग्निशमन विभागाशी संपर्क साधलेला नाही. विशेष म्हणजे या एनओसीला विलंब केल्यास शहर विकास विभागाकडून देखील या हॉटेल व्यावसायिकांना परवाने घेणे शिल्लक आहे. परंतु त्यांनी ३१ मार्च पर्यंत ही कार्यवाही पूर्ण केली नाही तर पुन्हा या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.              अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्यावतीने नोटीसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. परंतु उर्वरीत हॉटेलवाल्यांनी याची पुर्तता न केल्याने ते सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर तीन दिवसात ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले होते. परंतु, अग्निशमन दलाच्या जाचक अटीच्या विरोधात आणि पॅनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवार पासून बंदची हाक दिली होती. या संदर्भात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्ठमंडळाशी चर्चा झाल्यानंतर या चार्जेसचे स्लॅब करुन ते २५ लाखांवरुन थेट पाच लाखापर्यंत खाली आणण्यात आले आहेत. तसेच सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अग्निशमन विभागाने आपली जबाबदारी पार देखील पाडली.अग्निशमन विभागावर टिका करणाºया बार आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी याच विभागाने रात्री ११.३० वाजेपर्यंत शहरातील शिल्लक राहिलेल्या ३०५ हॉटेल, बारच्या एनओसी तयार केल्या आहेत. आता केवळ या हॉटेल व्यावसायिकांना कमी करण्यात आलेले चार्जेस भरुन या एनओसी ताब्यात घ्यावयाच्या आहेत. परंतु त्यानंतरही गुरुवारी दिवसभरात एकही हॉटेल व्यावसायिक अग्निशमन विभागाकडे फिरकलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विभागावर टिका करणाºया आणि आंदोलन करणाºया हॉटेल व्यावसायिकांना आता एनओसीची गरज नाही का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.चौकट - शहर विकास विभागाचाही घ्यावा लागणार परवानाअग्निशमन विभागाचे चार्जेस कमी करण्यात आले असले तरी शहर विकास विभागाचे कंपोडींग आणि चेंज आॅफ युजर्सचे चार्जेस मात्र कमी करण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाची एनओसी घेतल्यानंतर या हॉटेल व्यावसायिकांना चेंज आॅफ युज करुन घेऊन त्याची माहिती शहर विकास विभागाला सादर करायची आहे. यासाठी आता केवळ २२ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असे असतांना अद्याप अग्निशनम विभागाकडूनच एनओसी न घेतल्याने शहर विकास विभागाची एनओसी केव्हा मिळणार हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ३१ मार्च पर्यंत जे हॉटेलवाले या प्रक्रिया पूर्ण करतील तेच १ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहेत. परंतु जे या प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणेhotelहॉटेल