शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा, जयंत पाटील यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 06:39 IST

देशातील वातावरण आता बदलत असून राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांकडे केला.

ठाणे : देशातील वातावरण आता बदलत असून राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांकडे केला. राज्यातील चौथ्या व अंतिम टप्प्यातील १७ जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानिमित्ताने पाटील हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यात वातावरण आघाडीला पोषक असल्याने अनेक जागांवर आघाडीला यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंझावाताचा भाजप-शिवसेनेला नक्कीच तोटा होणार आहे. त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्टपणाने जे काही मुद्दे मांडले, त्यातून सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याचे काम झाले आहे. राज्यातील जनतेला सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा आता कळून चुकला असल्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो आता जनताच घेईल, असेही ते म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे हे आघाडीसोबत एकत्र येतील किंवा नाही, हे त्यावेळीच स्पष्ट होईल. त्यावर, आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांची भाषणे केवळ राज्यात नव्हे तर देशपातळीवर गाजत आहेत. आपण मागणी लावून धरल्याने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दाव्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, विखे काय बोलले, हे नक्की माहीत नाही, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आघाडीच्या वतीने आंदोलन केले होते. चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली होती. विधानसभा बंद पाडण्याचे काम विरोधी पक्षांनी केले.

विरोधी पक्षाच्या दबावामुळेच सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आजही सुरू आहे. परंतु, त्याचे श्रेय एका व्यक्तीने घेणे योग्य ठरणार नाही. भाजप, शिवसेना एवढी घाबरली आहे की, आता सगळे हातातून गेल्यावर त्यांच्याकडून केवळ आपली अब्रू वाचवण्यासाठी राज ठाकरे यांनी व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्यांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक