शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

२७ गावांना पाणी देणार नाही

By admin | Updated: March 24, 2017 01:05 IST

केडीएमसीतील २७ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसागणिक गंभीर बनत आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी या गावांमधील

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसागणिक गंभीर बनत आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी या गावांमधील नगरसेवकांनी आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन तात्पुरत्या स्वरूपात का होईना महापालिकेने त्यांच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्याला माजी महापौर व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप यांनी विरोध केला आहे. आता कुठे आमचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. गावांना पाणी दिल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती त्यांनी व्यक्त करत तात्पुरते पाणी देण्यास नकार दिला आहे. त्यांचा विरोध पाहता पाण्यावरून शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवकांमध्ये वाद पेटण्याची चिन्हे आहेत. २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. परंतू ते पुरेसे प्रमाणात मिळत नाही, असे तेथील नगरसेवकांचे म्हणणे आहे. यंदाच्या पावसाळ््यात चांगला पाऊस होऊनही सध्या पाण्याची कमतरता गावांमध्ये भेडसावत आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, आजतागायत याची अंमलबजावणी झालेली नाही. पुरेशा पाण्याअभावी गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने मागील आठवड्यात २७ गावांतील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर हंडाकळशी मोर्चा काढला होता. यावर सोमवारी २७ गावांमधील नगरसेवकांना पाणीप्रश्नावर चर्चेसाठी आयुक्तांनी बोलावले होते. या वेळी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेने आम्हाला तात्पुरता दिलासा द्यावा, अशी विनंती केली. शासनाकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर झाला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होईस्तोवर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत न क रता महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पाणी गावांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीतही बुधवारी २७ गावांमधील पाण्याचा प्रश्न चांगलाच गाजला होता. काहीही करा पण गावांना पाणी द्या, नुसत्या खुर्च्या उबवू नका, तातडीने कृती आराखडा सादर झाला पाहिजे अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही, असा सज्जड इशारा सभापती रमेश म्हात्रे यांनी दिला. तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या योजनेतून पाणी देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. परंतु, अधिकारी याची अंमलबजावणी करण्याबाबत टाळाटाळ करतात, याकडे ग्रामीण भागातील नगरसेवकांनी लक्ष वेधले होते. एकीकडे काहीही करा पण गावांना पाणी द्या, असे जरी सभापती म्हात्रे यांनी प्रशासनाला आदेश दिले असलेतरी दुसरीकड घोलप यांनी मात्र महापालिकेच्या योजनेतून पाणी देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांची तात्पुरते पाणी देण्याची आग्रहाची मागणी असताना घोलप यांचा होत असलेला विरोध पाहता ग्रामीण आणि शहरी असा वाद उद्भवणार आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षातील नगरसेवकांमध्येच पाणीप्रश्नावरून जुंपण्याचीही चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)