शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांना पाणी देणार नाही

By admin | Updated: March 24, 2017 01:05 IST

केडीएमसीतील २७ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसागणिक गंभीर बनत आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी या गावांमधील

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसागणिक गंभीर बनत आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी या गावांमधील नगरसेवकांनी आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन तात्पुरत्या स्वरूपात का होईना महापालिकेने त्यांच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्याला माजी महापौर व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप यांनी विरोध केला आहे. आता कुठे आमचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. गावांना पाणी दिल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती त्यांनी व्यक्त करत तात्पुरते पाणी देण्यास नकार दिला आहे. त्यांचा विरोध पाहता पाण्यावरून शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवकांमध्ये वाद पेटण्याची चिन्हे आहेत. २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. परंतू ते पुरेसे प्रमाणात मिळत नाही, असे तेथील नगरसेवकांचे म्हणणे आहे. यंदाच्या पावसाळ््यात चांगला पाऊस होऊनही सध्या पाण्याची कमतरता गावांमध्ये भेडसावत आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, आजतागायत याची अंमलबजावणी झालेली नाही. पुरेशा पाण्याअभावी गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने मागील आठवड्यात २७ गावांतील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर हंडाकळशी मोर्चा काढला होता. यावर सोमवारी २७ गावांमधील नगरसेवकांना पाणीप्रश्नावर चर्चेसाठी आयुक्तांनी बोलावले होते. या वेळी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेने आम्हाला तात्पुरता दिलासा द्यावा, अशी विनंती केली. शासनाकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर झाला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होईस्तोवर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत न क रता महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पाणी गावांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीतही बुधवारी २७ गावांमधील पाण्याचा प्रश्न चांगलाच गाजला होता. काहीही करा पण गावांना पाणी द्या, नुसत्या खुर्च्या उबवू नका, तातडीने कृती आराखडा सादर झाला पाहिजे अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही, असा सज्जड इशारा सभापती रमेश म्हात्रे यांनी दिला. तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या योजनेतून पाणी देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. परंतु, अधिकारी याची अंमलबजावणी करण्याबाबत टाळाटाळ करतात, याकडे ग्रामीण भागातील नगरसेवकांनी लक्ष वेधले होते. एकीकडे काहीही करा पण गावांना पाणी द्या, असे जरी सभापती म्हात्रे यांनी प्रशासनाला आदेश दिले असलेतरी दुसरीकड घोलप यांनी मात्र महापालिकेच्या योजनेतून पाणी देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांची तात्पुरते पाणी देण्याची आग्रहाची मागणी असताना घोलप यांचा होत असलेला विरोध पाहता ग्रामीण आणि शहरी असा वाद उद्भवणार आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षातील नगरसेवकांमध्येच पाणीप्रश्नावरून जुंपण्याचीही चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)