शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

२७ गावे, दिव्याला जादा पाणी

By admin | Updated: May 3, 2017 05:24 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी

कल्याण : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या  हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत हे निर्देश देण्यात आले. २७ गावे आणि दिवा येथे भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईमुळे तेथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यातून गेले वर्षभर नागरिकांनी वेगवेगळ््या माध्यमातून आपल्या नाराजीला तोंड फोडले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच दोन्ही महापालिकांमधील पदाधिकाऱ्यांनी येथील पाण्याचा कोटा वाढवण्याची मागणी जलसंपदामंत्री महाजन, पालकमंत्री शिंदे आणि एमआयडीसी यांच्याकडे केली होती. याची दखल घेत हा कोटा वाढवून देण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात एका विशेष बैठक झाली. या प्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अन्सारी आदी अधिकारी उपस्थित होते.पाणीटंचाईमुळे दिवा परिसरातील नागरिक मुंब्रा येथून रेल्वेने पाणी आणत असल्याकडे, त्यातून दुर्घटना घडून काही जणांना जीव गमवावा लागल्याकडे डॉ. शिंदे यांनी या वेळी महाजन यांचे लक्ष वेधले. यंदाचा उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे २७ गावे तसेच दिव्यासाठी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. त्यानुसार २७ गावांसाठी २५ आणि दिव्यासाठी १० एमएलडी पाणी वाढवून देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. महाजन यांनी दिलेल्या निर्देशाबाबत त्यांचे उपस्थितांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निर्देशच देतात, पण ठोस कृती कधी?केडीएमसीतील २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मागील उन्हाळ््यात पाणीकपातीमुळे १७ ते १८ दशलक्ष लिटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. यंदा चांगला पाऊस होऊनही २७ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वीजलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देऊ, या निर्णयावार शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु, आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही.गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने मार्चमध्ये २७ गावांतील नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर भव्य हंडाकळशी मोर्चा काढला होता. सरकारकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर झाला, याची अंमलबजावणी एप्रिल अखेरपर्यंत होण्याची शक्यता होती. परंतु, तीही झाली नाही. आता पुन्हा जलसंपदा मंत्र्यांनी अतिरिक्त पाणीसाठा देण्याचे निर्देश दिले आहेत. आजवर केवळ निर्देशच देण्यात आले आहेत, पण ठोस कृती होत नाही, असा सूर गावांमध्ये उमटत आहे.