शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

२७ गावे, दिव्याला जादा पाणी

By admin | Updated: May 3, 2017 05:24 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी

कल्याण : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या  हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत हे निर्देश देण्यात आले. २७ गावे आणि दिवा येथे भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईमुळे तेथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यातून गेले वर्षभर नागरिकांनी वेगवेगळ््या माध्यमातून आपल्या नाराजीला तोंड फोडले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच दोन्ही महापालिकांमधील पदाधिकाऱ्यांनी येथील पाण्याचा कोटा वाढवण्याची मागणी जलसंपदामंत्री महाजन, पालकमंत्री शिंदे आणि एमआयडीसी यांच्याकडे केली होती. याची दखल घेत हा कोटा वाढवून देण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात एका विशेष बैठक झाली. या प्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अन्सारी आदी अधिकारी उपस्थित होते.पाणीटंचाईमुळे दिवा परिसरातील नागरिक मुंब्रा येथून रेल्वेने पाणी आणत असल्याकडे, त्यातून दुर्घटना घडून काही जणांना जीव गमवावा लागल्याकडे डॉ. शिंदे यांनी या वेळी महाजन यांचे लक्ष वेधले. यंदाचा उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे २७ गावे तसेच दिव्यासाठी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. त्यानुसार २७ गावांसाठी २५ आणि दिव्यासाठी १० एमएलडी पाणी वाढवून देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. महाजन यांनी दिलेल्या निर्देशाबाबत त्यांचे उपस्थितांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निर्देशच देतात, पण ठोस कृती कधी?केडीएमसीतील २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मागील उन्हाळ््यात पाणीकपातीमुळे १७ ते १८ दशलक्ष लिटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. यंदा चांगला पाऊस होऊनही २७ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वीजलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देऊ, या निर्णयावार शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु, आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही.गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने मार्चमध्ये २७ गावांतील नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर भव्य हंडाकळशी मोर्चा काढला होता. सरकारकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर झाला, याची अंमलबजावणी एप्रिल अखेरपर्यंत होण्याची शक्यता होती. परंतु, तीही झाली नाही. आता पुन्हा जलसंपदा मंत्र्यांनी अतिरिक्त पाणीसाठा देण्याचे निर्देश दिले आहेत. आजवर केवळ निर्देशच देण्यात आले आहेत, पण ठोस कृती होत नाही, असा सूर गावांमध्ये उमटत आहे.