शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

२७ गावांचा प्रश्न : पाणीटंचाईविरोधात सोमवारी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:31 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीप्रश्न सुटत नसल्याने येत्या सोमवारी या गावांतील नगरसेवक महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार आहेत, असा इशारा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपा पुरस्कृत अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील व नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी दिला आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीप्रश्न सुटत नसल्याने येत्या सोमवारी या गावांतील नगरसेवक महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार आहेत, असा इशारा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपा पुरस्कृत अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील व नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी दिला आहे.प्रभाग क्रमांक १०८ आडिवली-ढोकाळीचे नगरसेवक पाटील म्हणाले, ‘माझ्या प्रभागातील पाणीसमस्या सोडवण्यासाठी ४३ लाख रुपये खर्चून जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रशासनाने मंजुरी दिली. मात्र, माशी कुठे शिंकली, काही कळत नाही. या कामाचा कार्यादेश अजून दिलेला नाही. २७ गावांसाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेंतर्गत १८० कोटींची पाणीपुरवठा योजनाही निविदा मंजुरीच्या गर्तेत आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावर २७ गावांतील नगरसेवक एकत्र येऊन उपोषण करणार आहेत.’नगरसेविका म्हात्रे म्हणाल्या, ‘पी अ‍ॅण्ड टी कॉलनीतील पाणीसमस्या अडीच वर्षांपासून सुटलेली नाही. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही पाणी मिळत नाही. अन्यथा, सोमवारी उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल.’त्यावर २७ गावांतील पाणीप्रश्नी उपोषण करू नका, असे आवाहन सभापती राहुल दामले यांनी केले. आपण समितीचे सदस्य आहात. या ठिकाणी चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.शिवसेना नगरसेविका छाया वाघमारे म्हणाल्या, ‘बिर्ला कॉलेज परिसरातील माझ्या प्रभागात अडीच वर्षांपासून पाणी कमी दाबाने येते. त्यामुळे नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो. कमी दाबाची समस्या सोडवण्यासाठी आठ इंच व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्यात आली. तरीही, कमी दाबानेच पाणी येत आहे. याविषयी विचारणा केली असता महापालिकेच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत. शेजारीच महापौरांचा प्रभाग आहे.मात्र, तेथे कमी दाबाने पाणी येत नाही. तेथेही मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातूनच पाणीपुरवठा होतो.मग, माझ्या प्रभागातच पाणी कमी दाबाने का येते, असा सवाल त्यांनी केला.१३ एप्रिलला उघडणार निविदापाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक म्हणाले, २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी मागवलेली पहिली निविदा सरकारने रद्द केली. त्यानंतर, पुन्हा निविदा मागवली असून त्यासाठी तीन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी कमी दराच्या निविदाधारकांसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चर्चा करून कार्यादेश देण्यात येईल.दरम्यानच्या काळात २७ गावांतील प्रत्येक प्रभागासाठी २० ते २५ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठ्याची कामे मंजूर केली आहेत. एकूण पाच कोटी ५० लाख रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवल्या, तेव्हा पहिल्या निविदेला प्रतिसाद आला नव्हता. आता पुन्हा फेरनिविदा प्रत्येक कामासाठी स्वतंत्ररीत्या मागवल्या आहेत. त्या १३ एप्रिलला उघडण्यात येणार आहेत. वाघमारे यांच्या प्रभागातील कमी दाबाने येणाऱ्या पाणीसमस्येचीपाहणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता मी स्वत: भेट देणार आहे.

टॅग्स :Waterपाणीkalyanकल्याण