शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

२७ गावात विकास नियंत्रण नियमावली समान हवी

By admin | Updated: January 26, 2016 01:55 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट असली तरी त्यांचा विकास आराखडा हा एमएमआरडीएने तयार केला आहे. २७ गावे व महापालिका यांची विकास नियंत्रण नियमावली

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट असली तरी त्यांचा विकास आराखडा हा एमएमआरडीएने तयार केला आहे. २७ गावे व महापालिका यांची विकास नियंत्रण नियमावली समान असावी अशी मागणी कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी एमएमआरडीएकडे केली आहे. विकास प्राधिकरणाचा दर्जा आजही एमएमआरडीएकडे असल्याने नवी बांधकामे व एफएसआयविषयी धोरण ठरत नाही. त्याचा फटका विकास कामाला होत आहे हा मुद्दा आमदार भोईर यांनी मांडला आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी एमएमआरडीएने तयार केलेल्या मंजूर विकास आराखड्यात भाल व भोपर येथील जागेवर डंपिंग ग्राऊंड प्रस्तावित आहेत. हा डंपिंग ग्राऊंड त्याठिकाणी करण्यात येऊ नये. त्याला आमदार म्हणून कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी विरोध केला आहे. तशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भोईर यांनी केल्याने त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकारयांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली आहे. एमएमआरडीएने २७ गावांसाठी तयार केलेला आराखड्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३० डिसेंबर २०१४ रोजी मान्यता दिली. या आराखड्यात भाल येथे २५० एकर जागेवर डंपिंगसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर भोपर येथे ९० एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. यापूर्वी राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळ,ब्रिटीशांनी नेवाळी विमान तळासाठी जागा घेतली. तेव्हाही भाल गावचा शेतकरी बाधित झाला होतो. आत्ता २५० एकर जागा डंपिंग ग्राऊंडसाठी घेतल्यास त्याच्यावर आणखीन अन्याय होणार असल्याचा मुद्दा भोईर यांनी विशद केला आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर नुकत्याच २७ गावांसह महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. डंपिंग ग्राऊंडचे आरक्षण हटविण्याच्या मागणीसाठी भाल गावच्या नागरीकांनी मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला होता. निवडणूक प्रचारादरम्यान २७ गावांची संघर्ष सभा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थिीत पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण बदल्याबाबत नक्कीच विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते असे नागरीकांकडून सांगण्यात आले.