शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावात विकास नियंत्रण नियमावली समान हवी

By admin | Updated: January 26, 2016 01:55 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट असली तरी त्यांचा विकास आराखडा हा एमएमआरडीएने तयार केला आहे. २७ गावे व महापालिका यांची विकास नियंत्रण नियमावली

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट असली तरी त्यांचा विकास आराखडा हा एमएमआरडीएने तयार केला आहे. २७ गावे व महापालिका यांची विकास नियंत्रण नियमावली समान असावी अशी मागणी कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी एमएमआरडीएकडे केली आहे. विकास प्राधिकरणाचा दर्जा आजही एमएमआरडीएकडे असल्याने नवी बांधकामे व एफएसआयविषयी धोरण ठरत नाही. त्याचा फटका विकास कामाला होत आहे हा मुद्दा आमदार भोईर यांनी मांडला आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी एमएमआरडीएने तयार केलेल्या मंजूर विकास आराखड्यात भाल व भोपर येथील जागेवर डंपिंग ग्राऊंड प्रस्तावित आहेत. हा डंपिंग ग्राऊंड त्याठिकाणी करण्यात येऊ नये. त्याला आमदार म्हणून कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी विरोध केला आहे. तशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भोईर यांनी केल्याने त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकारयांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली आहे. एमएमआरडीएने २७ गावांसाठी तयार केलेला आराखड्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३० डिसेंबर २०१४ रोजी मान्यता दिली. या आराखड्यात भाल येथे २५० एकर जागेवर डंपिंगसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर भोपर येथे ९० एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. यापूर्वी राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळ,ब्रिटीशांनी नेवाळी विमान तळासाठी जागा घेतली. तेव्हाही भाल गावचा शेतकरी बाधित झाला होतो. आत्ता २५० एकर जागा डंपिंग ग्राऊंडसाठी घेतल्यास त्याच्यावर आणखीन अन्याय होणार असल्याचा मुद्दा भोईर यांनी विशद केला आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर नुकत्याच २७ गावांसह महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. डंपिंग ग्राऊंडचे आरक्षण हटविण्याच्या मागणीसाठी भाल गावच्या नागरीकांनी मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला होता. निवडणूक प्रचारादरम्यान २७ गावांची संघर्ष सभा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थिीत पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण बदल्याबाबत नक्कीच विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते असे नागरीकांकडून सांगण्यात आले.