शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अपघाताच्या नावाखाली मदत मागून नवी मुंबईच्या रहिवाशाची २५ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 18:37 IST

कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे भावनिक कारण पुढे करून जोधपुरच्या एका रहिवाशाने नवी मुंबईतील रहिवाशाकडून २५ लाख रुपयांची मदत मागितली. गावाकडचा माणूस म्हणून मदत केल्यानंतर आरोपींनी हात वर केले.

ठळक मुद्देगुन्हा दाखलआरोपी जोधपुरचेशोध सुरू

ठाणे : कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे खोटे कारण सांगून नवी मुंबईच्या रहिवाशाची मदतीच्या नावाखाली २५ लाख रुपयांची फसवणूक करणाºया जोधपुरच्या दोन रहिवाशांविरूद्ध कासारवडवली पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी किरणसिंह शिवनाथसिंह राजपुरोहीत (४५) हे मुळचे जोधपूर येथील आहेत. आॅगस्ट २0१७ मध्ये त्यांना गावाकडील रेवतसिंह राजपुरोहित यांचा फोन आला. कुटुंबातील तिघांचा गंभीर अपघात झाला असून, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी असल्याचे त्याने किरणसिंह राजपुरोहीत यांना सांगितले. उपचारासाठी २५ लाख रुपयांची तातडीने मदत करण्याची विनंती त्याने केली. गावातील व्यक्ति म्हणून किरणसिंह राजपुरोहीत यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ठरल्याप्रमाणे रेवतसिंह राजपुरोहितने पैसे घेण्यासाठी चंद्रविरसिंह चौधरी याला पाठवले. २0 आॅगस्ट रोजी किरणसिंह राजपुरोहीत यांनी चंद्रविरसिंह चौधरी याला भार्इंदरपाड्यातील मेट्रो सुपर मार्केटजवळ बोलावून १0 लाख रुपये रोख दिले. याशिवाय १ सप्टेंबर २0१७ रोजीचा १५ लाख रुपयांचा धनादेश दिला. काही महिने निघून गेल्यानंतर किरणसिंह राजपुरोहीत यांना अशा प्रकारचा कोणता अपघातच झाला नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजपुरोहीत यांनी पैशासाठी तगादा लावला. रेवतसिंह राजपुरोहित याने पैशासाठी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. किरणसिंह राजपुरोहित यांनी शनिवारी याप्रकरणी कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार रेवतसिंह राजपुत आणि चंद्रविरसिंह चौधरी यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचे मोबाईल फोन सातत्याने बंद येत आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस