शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

‘आधारवाडी’तील २२६ कैद्यांना मिळाले ‘आधार’, ‘महा ई-सेवा’ केंद्रामार्फत मिळवून दिला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:01 IST

केंद्र सरकारने बँक खाती आणि मोबाइल नंबर आधारकार्डाशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आधारकार्ड काढणे

कल्याण : केंद्र सरकारने बँक खाती आणि मोबाइल नंबर आधारकार्डाशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आधारकार्ड काढणे, तसेच ते बँक आणि मोबाइलशी जोडण्यासाठी धावपळ उडाली. मात्र, कैद्यांना कारागृहाबाहेर येऊन आधारकार्ड काढणे शक्य नाही. त्यामुळे आधारवाडी कारागृहातील कैद्यांचे आधारकार्ड कारागृहात काढण्याचे काम सुभाष रजपूत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.टिटवाळ्यात राहणारे रजपूत डिसेंबर २०१५ पासून कल्याणच्या बेतूरकरपाडा येथे महा-ई-सेवा केंद्र चालवत आहे. मागील महिनाभरात एक हजार ८०० जणांनी त्यांच्याकडे आधारकार्ड काढले आहे. कल्याण परिसरात ५५ महा-ई-सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी रजपूत यांच्याच केंद्रात मोफत आधारकार्ड काढण्याची सुविधा आहे. कल्याणमध्ये टपाल कार्यालयात आधारकार्डावरील दुरुस्ती करून मिळते. मात्र, नव्याने आधारकार्ड काढण्याची सुविधा तेथे नाही. टपाल कार्यालय तसेच अन्य महा-ई-सेवा केंद्रात आधारकार्ड नव्याने काढण्याची सुविधाच नसल्याने रजपूत यांच्या केंद्रात नागरिकांची बरीच गर्दी होते. त्यांचे हे काम पाहून आधारवाडी कारागृह प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला. आधारवाडी कारागृहात त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड लवकरच काढले जाणार आहे.रजपूत हे एका महा-ई-सेवा केंद्रात कामाला होते. त्याची चांगली माहिती झाल्यावर त्यांनी सरकारकडे अर्ज केला. सरकारकडून त्यांना महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. २०१५ पासून ते यशस्वीरीत्या हे केंद्र चालवत आहेत.आधारकार्डवरील नाव, पत्त्यात करा सुधारणा; कल्याण, उल्हासनगरमध्ये सुविधा-डोंबिवली : भारत संचार निगमने सुरू केलेल्या (बीएसएनएल) आधारकार्ड अपडेट केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. कल्याण व उल्हासनगरमध्ये तीन केंद्रे सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बीएसएनएलने सुरू केलेल्या या केंद्रांमुळे आता आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी बीएसएनएलचे महाव्यवस्थापक हरिओम सोलंकी उपस्थित होते. कल्याणमधील काळातलाव परिसरातील टेलिफोन एक्स्चेंज केंद्र, कल्याण येथील केंद्रीय तार कार्यालय भवन आणि उल्हासनगर येथील गोल मैदानात ही केंद्रे सुरू केल्याचे पाटील म्हणाले. भिवंडी व वसई येथील दूरसंचार कार्यालयात लवकरच केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. रविवारची सुटीवगळता दररोज सकाळी १० ते सायं. ५.३० पर्यंत ही केंद्रे सुरू राहतील. ‘आधार’मध्ये काही चुका असल्यास त्या नागरिकांना या केंद्रांमध्ये सुधारता येतील. पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडीमध्ये पुरावे पाहून बदल केले जातील.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड