शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘आधारवाडी’तील २२६ कैद्यांना मिळाले ‘आधार’, ‘महा ई-सेवा’ केंद्रामार्फत मिळवून दिला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:01 IST

केंद्र सरकारने बँक खाती आणि मोबाइल नंबर आधारकार्डाशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आधारकार्ड काढणे

कल्याण : केंद्र सरकारने बँक खाती आणि मोबाइल नंबर आधारकार्डाशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आधारकार्ड काढणे, तसेच ते बँक आणि मोबाइलशी जोडण्यासाठी धावपळ उडाली. मात्र, कैद्यांना कारागृहाबाहेर येऊन आधारकार्ड काढणे शक्य नाही. त्यामुळे आधारवाडी कारागृहातील कैद्यांचे आधारकार्ड कारागृहात काढण्याचे काम सुभाष रजपूत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.टिटवाळ्यात राहणारे रजपूत डिसेंबर २०१५ पासून कल्याणच्या बेतूरकरपाडा येथे महा-ई-सेवा केंद्र चालवत आहे. मागील महिनाभरात एक हजार ८०० जणांनी त्यांच्याकडे आधारकार्ड काढले आहे. कल्याण परिसरात ५५ महा-ई-सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी रजपूत यांच्याच केंद्रात मोफत आधारकार्ड काढण्याची सुविधा आहे. कल्याणमध्ये टपाल कार्यालयात आधारकार्डावरील दुरुस्ती करून मिळते. मात्र, नव्याने आधारकार्ड काढण्याची सुविधा तेथे नाही. टपाल कार्यालय तसेच अन्य महा-ई-सेवा केंद्रात आधारकार्ड नव्याने काढण्याची सुविधाच नसल्याने रजपूत यांच्या केंद्रात नागरिकांची बरीच गर्दी होते. त्यांचे हे काम पाहून आधारवाडी कारागृह प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला. आधारवाडी कारागृहात त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड लवकरच काढले जाणार आहे.रजपूत हे एका महा-ई-सेवा केंद्रात कामाला होते. त्याची चांगली माहिती झाल्यावर त्यांनी सरकारकडे अर्ज केला. सरकारकडून त्यांना महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. २०१५ पासून ते यशस्वीरीत्या हे केंद्र चालवत आहेत.आधारकार्डवरील नाव, पत्त्यात करा सुधारणा; कल्याण, उल्हासनगरमध्ये सुविधा-डोंबिवली : भारत संचार निगमने सुरू केलेल्या (बीएसएनएल) आधारकार्ड अपडेट केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. कल्याण व उल्हासनगरमध्ये तीन केंद्रे सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बीएसएनएलने सुरू केलेल्या या केंद्रांमुळे आता आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी बीएसएनएलचे महाव्यवस्थापक हरिओम सोलंकी उपस्थित होते. कल्याणमधील काळातलाव परिसरातील टेलिफोन एक्स्चेंज केंद्र, कल्याण येथील केंद्रीय तार कार्यालय भवन आणि उल्हासनगर येथील गोल मैदानात ही केंद्रे सुरू केल्याचे पाटील म्हणाले. भिवंडी व वसई येथील दूरसंचार कार्यालयात लवकरच केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. रविवारची सुटीवगळता दररोज सकाळी १० ते सायं. ५.३० पर्यंत ही केंद्रे सुरू राहतील. ‘आधार’मध्ये काही चुका असल्यास त्या नागरिकांना या केंद्रांमध्ये सुधारता येतील. पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडीमध्ये पुरावे पाहून बदल केले जातील.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड