शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

‘आधारवाडी’तील २२६ कैद्यांना मिळाले ‘आधार’, ‘महा ई-सेवा’ केंद्रामार्फत मिळवून दिला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:01 IST

केंद्र सरकारने बँक खाती आणि मोबाइल नंबर आधारकार्डाशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आधारकार्ड काढणे

कल्याण : केंद्र सरकारने बँक खाती आणि मोबाइल नंबर आधारकार्डाशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आधारकार्ड काढणे, तसेच ते बँक आणि मोबाइलशी जोडण्यासाठी धावपळ उडाली. मात्र, कैद्यांना कारागृहाबाहेर येऊन आधारकार्ड काढणे शक्य नाही. त्यामुळे आधारवाडी कारागृहातील कैद्यांचे आधारकार्ड कारागृहात काढण्याचे काम सुभाष रजपूत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.टिटवाळ्यात राहणारे रजपूत डिसेंबर २०१५ पासून कल्याणच्या बेतूरकरपाडा येथे महा-ई-सेवा केंद्र चालवत आहे. मागील महिनाभरात एक हजार ८०० जणांनी त्यांच्याकडे आधारकार्ड काढले आहे. कल्याण परिसरात ५५ महा-ई-सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी रजपूत यांच्याच केंद्रात मोफत आधारकार्ड काढण्याची सुविधा आहे. कल्याणमध्ये टपाल कार्यालयात आधारकार्डावरील दुरुस्ती करून मिळते. मात्र, नव्याने आधारकार्ड काढण्याची सुविधा तेथे नाही. टपाल कार्यालय तसेच अन्य महा-ई-सेवा केंद्रात आधारकार्ड नव्याने काढण्याची सुविधाच नसल्याने रजपूत यांच्या केंद्रात नागरिकांची बरीच गर्दी होते. त्यांचे हे काम पाहून आधारवाडी कारागृह प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला. आधारवाडी कारागृहात त्यांनी २२६ कैद्यांचे आधारकार्ड काढले आहे. आणखी ९० कैद्यांचे आधारकार्ड लवकरच काढले जाणार आहे.रजपूत हे एका महा-ई-सेवा केंद्रात कामाला होते. त्याची चांगली माहिती झाल्यावर त्यांनी सरकारकडे अर्ज केला. सरकारकडून त्यांना महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. २०१५ पासून ते यशस्वीरीत्या हे केंद्र चालवत आहेत.आधारकार्डवरील नाव, पत्त्यात करा सुधारणा; कल्याण, उल्हासनगरमध्ये सुविधा-डोंबिवली : भारत संचार निगमने सुरू केलेल्या (बीएसएनएल) आधारकार्ड अपडेट केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. कल्याण व उल्हासनगरमध्ये तीन केंद्रे सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बीएसएनएलने सुरू केलेल्या या केंद्रांमुळे आता आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी बीएसएनएलचे महाव्यवस्थापक हरिओम सोलंकी उपस्थित होते. कल्याणमधील काळातलाव परिसरातील टेलिफोन एक्स्चेंज केंद्र, कल्याण येथील केंद्रीय तार कार्यालय भवन आणि उल्हासनगर येथील गोल मैदानात ही केंद्रे सुरू केल्याचे पाटील म्हणाले. भिवंडी व वसई येथील दूरसंचार कार्यालयात लवकरच केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. रविवारची सुटीवगळता दररोज सकाळी १० ते सायं. ५.३० पर्यंत ही केंद्रे सुरू राहतील. ‘आधार’मध्ये काही चुका असल्यास त्या नागरिकांना या केंद्रांमध्ये सुधारता येतील. पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडीमध्ये पुरावे पाहून बदल केले जातील.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड