शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

९२२ अपघातांत २१७ मृत्यू, २०१८ मध्ये ठाण्यात ५५ जण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:50 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे.

- पंकज रोडेकरठाणे  - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे. यात नारपोली या वाहतूक उपशाखेच्या हद्दीत सर्वाधिक ७९ प्राणांतिक अपघात घडले असून त्यामध्ये ३५ जणांचा बळी गेला आहे. उल्हासनगर, विठ्ठलवाडी, बदलापूर पश्चिम आणि वागळे इस्टेट या पोलीस ठाणेअंतर्गत एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याने तेथे कोणीही दगावले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या एकूण १८ उपशाखा आहेत. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर ही शहरे पाच परिमंडळांतर्गत वेढलेले असून तेथे या उपशाखेद्वारे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याचे काम करण्यात येते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, गुजरात आदी भागांत जाणारी जडअवजड वाहने ही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातूून येजा करतात. त्यातच, दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येतही वाढ होत असल्याने शहरांमध्ये वाहतूककोंडीही पाचवीला पुजलेली आहे. मागील वर्षभरात आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २१७ प्राणांतिक, गंभीर ४५६ आणि २४९ किरकोळ अशा एकूण ९२२ अपघातांची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.परिमंडळानुसार विचार केल्यास ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांत प्राणांतिक अपघातांत ९१ जणांचा मृत्यू झाला. तर,भिवंडीत ६८, कल्याण-डोंबिवलीत ३४,उल्हासनगर परिमंडळात २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारीत ३३ तर फेब्रुवारीत २२ दगावले२०१८ च्या पहिल्या दोन महिन्यांत ५५ प्राणांतिक, ७० गंभीर तर ४९ किरकोळ अपघात असे एकूण १७४ अपघात झाले आहे. यामध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात ३३ तर फेब्रुवारी महिन्यात २२ जण रस्ते अपघातात दगावले आहेत.बळींचा आकडा ३१ वाढला२०१७ मधील पहिल्या दोन महिन्यांत २४ जण अपघातात ठार झाले होते. तर, २०१८ मध्ये रस्ते अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाल्याने यंदा बळींची संख्या ३१ ने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. तसेच २०१७ मध्ये १९० जखमी झाले होते. तर २०१८ मध्ये १७५ जखमी झाले असून जखमींची संख्या मात्रयंदा १५ने कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात