शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

९२२ अपघातांत २१७ मृत्यू, २०१८ मध्ये ठाण्यात ५५ जण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:50 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे.

- पंकज रोडेकरठाणे  - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे. यात नारपोली या वाहतूक उपशाखेच्या हद्दीत सर्वाधिक ७९ प्राणांतिक अपघात घडले असून त्यामध्ये ३५ जणांचा बळी गेला आहे. उल्हासनगर, विठ्ठलवाडी, बदलापूर पश्चिम आणि वागळे इस्टेट या पोलीस ठाणेअंतर्गत एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याने तेथे कोणीही दगावले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या एकूण १८ उपशाखा आहेत. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर ही शहरे पाच परिमंडळांतर्गत वेढलेले असून तेथे या उपशाखेद्वारे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याचे काम करण्यात येते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, गुजरात आदी भागांत जाणारी जडअवजड वाहने ही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातूून येजा करतात. त्यातच, दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येतही वाढ होत असल्याने शहरांमध्ये वाहतूककोंडीही पाचवीला पुजलेली आहे. मागील वर्षभरात आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २१७ प्राणांतिक, गंभीर ४५६ आणि २४९ किरकोळ अशा एकूण ९२२ अपघातांची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.परिमंडळानुसार विचार केल्यास ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांत प्राणांतिक अपघातांत ९१ जणांचा मृत्यू झाला. तर,भिवंडीत ६८, कल्याण-डोंबिवलीत ३४,उल्हासनगर परिमंडळात २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारीत ३३ तर फेब्रुवारीत २२ दगावले२०१८ च्या पहिल्या दोन महिन्यांत ५५ प्राणांतिक, ७० गंभीर तर ४९ किरकोळ अपघात असे एकूण १७४ अपघात झाले आहे. यामध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात ३३ तर फेब्रुवारी महिन्यात २२ जण रस्ते अपघातात दगावले आहेत.बळींचा आकडा ३१ वाढला२०१७ मधील पहिल्या दोन महिन्यांत २४ जण अपघातात ठार झाले होते. तर, २०१८ मध्ये रस्ते अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाल्याने यंदा बळींची संख्या ३१ ने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. तसेच २०१७ मध्ये १९० जखमी झाले होते. तर २०१८ मध्ये १७५ जखमी झाले असून जखमींची संख्या मात्रयंदा १५ने कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात