शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये वर्षभरात 21,534 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 23:46 IST

६४३ रुग्णांचा मृत्यू : सध्या एक हजार ८०८ जणांवर उपचार सुरू

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील शहरांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात कहर केला आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण, आदिवासी भागात या रुग्णांचे प्रमाण तसे फारसे नाही. परंतु, शहरी भागाला म्हणजे महापालिका शहरांजवळील गावपाड्यांमध्ये रुग्णसंख्या दिसून येत आहे. जिल्ह्यातील या गावपाड्यांमध्ये वर्षभरात २३ हजार ९८५ कोरोनाबाधित सापडले. मात्र, यापैकी २१ हजार ५३४ जण कोरोनामुक्त झाले असून ६४३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी एक हजार ८०८ जणांवर उपचार सुरू आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (पीएचसी) ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील एक हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पीएचसींमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा नाही. त्यामुळे या गावपाड्यांतील ठिकठिकाणचे ९५ रुग्ण जवळील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये व शहरांतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर आहेत तर आठ जण जीवन-मरणाचे ठोके व्हेंटिलेटरवर मोजत आहेत. या ग्रामीण रुग्णांसाठी वरदान ठरणारे भिवंडी तालुक्यातील सवाद, भिणार व वज्रेश्वरी येथील कोरोना रुग्णालये मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेअभावी तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे केवळ निरोपयोगी ठरत आहे. गुरुवारी पालकमंत्र्यांनी या रुग्णालयांवरील मनुष्यबळासह सोयीसुविधांवर तीन तास चर्चा केली. मात्र, तत्काळ ठोस उपाययोजना म्हणून लोकप्रतिनिधींचा निधी व ऑक्सिजन प्लान्ट उभारणीवर भर देण्याचे नियोजन केले आहे.

१२२९ ग्रामस्थ होम क्वारंटाइनजिल्ह्यातील या ग्रामीण, दुर्गम भागातील एक हजार १२९ ग्रामस्थांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन करून घेत उपचार सुरू केले आहेत. यापैकी शहापूर तालुक्यातील २०९ ग्रामस्थांवर घरात उपचार सुरू आहेत. या तालुक्यातील शेंद्रुण, वासिंद, अघई, टाकीपठार, खानिवली, शेणवा, टेंभा आणि डोळखांब पीएचसीच्या आरोग्य यंत्रणेकडून उपचार सुरू आहेत. या आरोग्ययंत्रणेकडून आतापर्यंत चार हजार २३७ रुग्णांवर उपचार झाले. यापैकी तीन हजार ६२८ जण कोरोनामुक्त झाले. उर्वरित ४७१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील ५१५ रुग्णांवर उपचार सुरू असून ४९५ घरी क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत. यावर म्हसा, ढसाळ, नारीवली, किशोर, सरळगाव, शिरोशी, मोरोशी आणि तुळई पीएचसीची यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

पहिला रुग्ण सापडला होता कल्याणच्या निळजे परिसरातठाणे : कल्याण तालुक्यातील निळजे या शहरी भागातील एपीएचसी आहे. या पीएचसीच्या कार्यक्षेत्रात गेल्यावर्षी पहिला रुग्ण सापडला होता. यासह दहागाव, खडवली या पीएचसींमध्ये सर्वाधिक म्हणजे आतापर्यंत सात हजार १९४ रुग्णांवर उपचार झाले. यातूूून सहा हजार ८२२ रुग्ण बरे झाले असून सध्या २३० जण उपचार घेत आहेत. भिवंडीच्या पडघा, कोन, खारबाव, दिवा-अंजूर, चिंबिपाडा, दाभाड, वज्रेश्वरी आणि अनगाव या आरोग्यकेंद्रांद्वारे आजपर्यंत आठ हजार ५९१ रुग्णांवर उपचार होऊन सात हजार ५८८ जण कोरोनामुक्त झाले. आजस्थितीला या ठिकाणी ७६५ रुग्ण उपचार घेत आहे. अंबरनाथ तालुक्यातील बादलापूर, सोनावळे, मंगरूळ, वांगणी या आरोग्य केंद्रांच्या यंत्रणेने आजपर्यंत दोन हजार ५६२ जणांवर उपचार करून दोन हजार २६९ जण बरे केले आहेत. या केंद्रांवर आजही २२७ जणांवर यशस्वीरित्या उपचार सुरू आहे.

जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ३३ प्राथमिक आरोग्यकेंद्वांद्वारे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. वर्षभरातून आजपर्यंत या केंद्रांवर २३ हजार ९८५ रुग्णांवर उपचार झाले. यातून २१ हजार ५३४ रुग्ण बरे झाले आजही या आरोग्यकेंद्रांवर एक हजार ८०८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यासाठी आमची आरोग्ययंत्रणा रात्रंदिवस तैनात आहे.    - डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे