शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मुद्रांक शुल्काचे २१४ कोटी अद्यापही मिळाले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 02:03 IST

यंदा वाढीव अनुदानाची अपेक्षा; १६४ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याचेही मोठे आव्हान

ठाणे : मालमत्ताकर आणि पाणीकर वगळता ठामपाला इतर स्रोतांकडून उत्पन्न अपेक्षित होते. परंतु, त्यांच्याकडून ते न मिळाल्याने प्रशासनाने नव्या प्रकल्पांची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे अनुदानापोटीही मनपाने १०७ कोटी ६७ लाख अपेक्षित धरले आहेत. तर शासनाकडून मुद्रांक शुल्कापोटी मिळणारी २१४ कोटींची रक्कमही अद्याप मिळालेली नाही. त्यातच मनपाच्या डोक्यावर अद्यापही १६४ कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालताना प्रशासनास यंदा चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.ठामपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी २०२१-२२चा दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. काटकसरीच्या या अर्थसंकल्पात कोरोनामुळे फटका बसल्याचे दिसले आहे. त्यामुळे ठामपाच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर त्याचा स्पष्ट परिणाम दिसून आला. मालमत्ताकरापोटी २०२०-२१ मध्ये ७७३.२६ कोटींचे लक्ष अपेक्षित होते. परंतु, ते आता सुधारित ६०९.५४ कोटींचे केले आहे. तर २०२१-२२ मध्ये या करातून ६९३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. दुसरीकडे मागील वर्षी शहर विकास विभागाकडून तिजोरीला चांगली रक्कम मिळाली होती. त्यामुळे २०२०-२१ मध्ये या विभागाकडून ९८४ कोटींचे लक्ष अपेक्षित होते. त्यात शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राला कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे उत्पन्न ९८४ कोटींवर थेट २६० कोटींवर घसरले. याचाच अर्थ उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या शहर विकास विभागाला थेट ७२४ कोटींचा फटका बसला आहे. त्यात मंदी असल्याने पुढील आर्थिक वर्षातही हीच परिस्थिती राहणार असल्याने २०२१-२२ साठी केवळ ३४२ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.मुद्रांक शुल्काचा फटकाजकात, एलबीटी बंद झाल्याने शासनाकडून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कावर मनपाला अवलंबून राहावे लागत आहे. परंतु, २०१९ पासून अद्यापपर्यंत मुद्रांक शुल्क मिळाले नाही. यापोटी २१४ कोटी अद्यापही येणे बाकी आहेत. तसेच २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १५६ कोटी ९८ लाखांचे अनुदान अपेक्षित केले होते. आतापर्यंत १२५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये कोरोनासाठी शासनाकडून ५.९७ कोटी, एमएमआरडीएकडून २५ कोटी, वित्त आयोगाकडून २३.२५ कोटी अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले आहे. आता २०२१-२२ मध्ये १०७.६७ कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित धरले आहे. चार महिन्यांनी घेणार पुन्हा आढावासध्या पालिकेचे आर्थिक उत्पन्न घटलेले आहे. ते नव्याने किती वाढणार आहे, याचा अंदाज नाही. त्यामुळे अंदाजावर नव्या प्रकल्पांची घोषणा करणे अयोग्य असल्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी किंवा आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी माझ्या हातात कोणतीही जादूची कांडी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुढील दोन महिन्यांत उत्पन्न किती वाढते, तर नंतरच्या दोन महिन्यांत एकूणच ताळमेळ बघूनच नव्या प्रकल्पांसाठी काय करता येईल? याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग