शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

‘साईराज’च्या १६१ विस्थापित कुटुंबांचा २१ वर्षांचा वनवास संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 05:31 IST

कोलशेत येथे मिळणार वनविभागाची जागा : नगरविकास विभागाने हरकती व सूचना मागविल्या

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोलशेत येथील वनविभागाच्या मालकीचा ५०५०.०४ चौरस मीटरचा भूखंड रहिवास विभागात समावेश करण्यास नगरविकास विभागाने २३ आॅगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली आहे.या निर्णयामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीमधील विस्थापित १६१ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या २१ वर्षांपासून या कुटुंबांचे पुनर्वसन रखडले होते. मात्र, आता हा भूखंड वनविभागावरून रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

१९९८ साली वागळे इस्टेट भागातील साईराज इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १६१ कुटुंबे विस्थापित झाली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी साईराजनजीकच्या इतर पाच इमारतीही धोकादायक ठरवून तेथील रहिवाशांची घरे खाली केली करून त्यांना लवकरच मोफत घरे किंवा जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आजपर्यंत मिळालेले नाही.

या विस्थापितांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या ‘स्वामी समर्थ को-आॅप. हाउसिंग सोसायटी’साठी कोलशेत येथे जागा देण्यात आली होती. मात्र, सरकारच्या मालकीची ही जागा परस्पर मूळ मालकाला परत करण्यात आल्याने साईराज इमारतीच्या विस्थापितांना आजपर्यंत भूखंड मिळालेला नव्हता. शासनाने जागा दिल्यानंतर या विस्थापितांनी त्यासाठी ७६ लाख रु पये भरले होते. मात्र, अजूनही ती जागा त्यांना मिळालेली नव्हती. २००८ मध्ये ही जमीन पुनर्वसनासाठी दिलेली होती. मात्र, याविरोधात जागेचा मूळ मालक उच्च न्यायालयात गेला होता. त्यावर या जमीन हस्तांतरणास न्यायालयाने स्थगिती दिली होती. तेव्हापासून हे विस्थापित हक्काच्या घरासाठी जागेच्या शोधात होते. मधल्या काळात या रहिवाशांना २००२ साली ठाणे महापालिकेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रेंटल हाउसिंगच्या संक्रमण शिबिरात हलवले होते. तेव्हापासून ते तेथेच राहत आहेत.रोमा बिल्डरच्याजागेतून होणार ये-जाआता नगरविकास विभागाने वनविभागाच्या विनंतीवरून त्यांच्या मालकीचा कोलशेत येथील सिटी सर्व्हे क्रमांक २०२/८५ वरील ५०५०.०४ चौरस मीटरचा भूखंड रहिवासी क्षेत्रास मान्यता दिली आहे. याशिवाय, या रहिवाशांंना कोलशेतच्याच सिटी सर्व्हे १४७/१ या रोमा बिल्डरच्या मालकीच्या भूखंडावरून येजा करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, असे सूचित केले आहे.बिल्डर, वास्तुविशारदास तीन वर्षांची शिक्षामधल्या काळात ठाणे न्यायालयाने फेबु्रवारी २०१८ मध्ये साईराज इमारत दुर्घटनेप्रकरणी तिचा बिल्डर शरदभाई मानसिंग पवार आणि आर्किटेकट आनंद अष्टपुत्रे यांना दोषी ठरवून तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तर, उर्वरित किमान तीन महिलांसह सुमारे अर्धा डझन आरोपींना दोषमुक्त केले होते.च्जागा दिल्यानंतर या विस्थापितांनी त्यासाठी ७६ लाख रु पये भरले होते. मात्र, अजूनही ती जागा त्यांना मिळालेली नव्हती.च्२००८ मध्ये ही जमीन पुनर्वसनासाठी दिलेली होती. मात्र, याविरोधात जागेचा मूळ मालक उच्च न्यायालयात गेला होता.