शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात निर्माण होणार २१ थीम पार्क

By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि खऱ्या अर्थाने ठाण्याला स्मार्ट शहर बनविणारी जवळपास २१ थीम पार्क लवकरच ठाणे शहरात साकार होणार आहेत. ही थीम पार्क पीपीपी

ठाणे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि खऱ्या अर्थाने ठाण्याला स्मार्ट शहर बनविणारी जवळपास २१ थीम पार्क लवकरच ठाणे शहरात साकार होणार आहेत. ही थीम पार्क पीपीपी, बीओटी, प्रायोजकांमार्फत तर काही पालिका स्वत: उभारणार आहे. गुरुवारी या योजनांच्या संकल्पचित्रांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ग्रीन सिग्नल दिला. येत्या वर्षभरात ती साकारण्याचा पालिकेचा मानस आहे.ठाणे शहरात थीम पार्क बनविण्यासाठी महापालिकेने आठ उद्यानविशारदांची नेमणूक केली असून त्या सर्वांनी आयुक्तांसमोर त्यांनी बनविलेल्या संकल्पचित्रांचे सादरीकरण केले. या थीम पार्कमध्ये बाराबंगला, वर्तकनगरमधील लक्ष्मी पार्क, जवाहरबाग येथील नेहरू बालोद्यान, सावरकरनगर येथील नाना-नानी पार्क, कावेसर, उथळसर येथील डॉ. सलीम अली ऋतुचक्र उद्यान, केदारेश्वर मंदिर उद्यान, लोकमान्यनगर पाडा नं. ४ येथील उद्यान, कोलशेत तलाव, पारसिकनगर, माजिवडा-मानपाडा, वडवली, खारेगाव, रूणवाल प्लाझा, वर्तकनगर आदीसह एकूण २१ ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे.ही थीम पार्क बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी), लोकसहभागातून (पीपीपी) आणि महापालिका निधी अथवा प्रायोजकाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणार असून या थीम पार्कमध्ये फूड कोर्ट, मनोरंजनाची साधने, अ‍ॅम्फीथिएटर, संगीताची साधने, लहान मुलांसाठी गेम झोन, छोटे मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प, हरित कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प आदी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने एंजल्स पॅराडाइज, स्मृतीवन, जॉगर्स पार्क, जुने ठाणे, बॉलीवूड यासह अनेक विविध थीम योजनांचा समावेश आहे. उद्यान विशारदांनी सादर केलेल्या सर्व संकल्पचित्रांना आयुक्तांनी मान्यता दिली असून या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, याबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर, एका वर्षाच्या आत ठाणेकरांना हे थीम पार्क भेटीला येणार आहे. या थीम पार्कयोजनेमुळे ठाणे शहरातील अस्तित्वात असलेल्या उद्यानांचा चेहरामोहरा बदलणार असून त्या ठिकाणी आता नियोजनबद्ध पद्धतीने विविध सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनाची साधने नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हरित ठाण्याचे चित्र अधिक समृद्ध होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. (प्रतिनिधी)