शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

ठाण्यात निर्माण होणार २१ थीम पार्क

By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि खऱ्या अर्थाने ठाण्याला स्मार्ट शहर बनविणारी जवळपास २१ थीम पार्क लवकरच ठाणे शहरात साकार होणार आहेत. ही थीम पार्क पीपीपी

ठाणे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि खऱ्या अर्थाने ठाण्याला स्मार्ट शहर बनविणारी जवळपास २१ थीम पार्क लवकरच ठाणे शहरात साकार होणार आहेत. ही थीम पार्क पीपीपी, बीओटी, प्रायोजकांमार्फत तर काही पालिका स्वत: उभारणार आहे. गुरुवारी या योजनांच्या संकल्पचित्रांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ग्रीन सिग्नल दिला. येत्या वर्षभरात ती साकारण्याचा पालिकेचा मानस आहे.ठाणे शहरात थीम पार्क बनविण्यासाठी महापालिकेने आठ उद्यानविशारदांची नेमणूक केली असून त्या सर्वांनी आयुक्तांसमोर त्यांनी बनविलेल्या संकल्पचित्रांचे सादरीकरण केले. या थीम पार्कमध्ये बाराबंगला, वर्तकनगरमधील लक्ष्मी पार्क, जवाहरबाग येथील नेहरू बालोद्यान, सावरकरनगर येथील नाना-नानी पार्क, कावेसर, उथळसर येथील डॉ. सलीम अली ऋतुचक्र उद्यान, केदारेश्वर मंदिर उद्यान, लोकमान्यनगर पाडा नं. ४ येथील उद्यान, कोलशेत तलाव, पारसिकनगर, माजिवडा-मानपाडा, वडवली, खारेगाव, रूणवाल प्लाझा, वर्तकनगर आदीसह एकूण २१ ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे.ही थीम पार्क बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी), लोकसहभागातून (पीपीपी) आणि महापालिका निधी अथवा प्रायोजकाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणार असून या थीम पार्कमध्ये फूड कोर्ट, मनोरंजनाची साधने, अ‍ॅम्फीथिएटर, संगीताची साधने, लहान मुलांसाठी गेम झोन, छोटे मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प, हरित कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प आदी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने एंजल्स पॅराडाइज, स्मृतीवन, जॉगर्स पार्क, जुने ठाणे, बॉलीवूड यासह अनेक विविध थीम योजनांचा समावेश आहे. उद्यान विशारदांनी सादर केलेल्या सर्व संकल्पचित्रांना आयुक्तांनी मान्यता दिली असून या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, याबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर, एका वर्षाच्या आत ठाणेकरांना हे थीम पार्क भेटीला येणार आहे. या थीम पार्कयोजनेमुळे ठाणे शहरातील अस्तित्वात असलेल्या उद्यानांचा चेहरामोहरा बदलणार असून त्या ठिकाणी आता नियोजनबद्ध पद्धतीने विविध सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनाची साधने नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हरित ठाण्याचे चित्र अधिक समृद्ध होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. (प्रतिनिधी)