शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पालघरात वाटले २१ कोटींचे मुद्रा कर्ज

By admin | Updated: October 6, 2016 02:36 IST

मुद्रा कर्ज योजना जिल्ह्यातील तरुण व्यावसायिकांसाठी संजीवनी ठरली असून सुमारे ४५०० लाभार्थ्यांनी सुमारे २१ कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे.

हितेन नाईक/ निखिल मेस्त्री, पालघर/ नंडोरेमुद्रा कर्ज योजना जिल्ह्यातील तरुण व्यावसायिकांसाठी संजीवनी ठरली असून सुमारे ४५०० लाभार्थ्यांनी सुमारे २१ कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात शिशु गटामध्ये ३८५१ लाभार्थ्यांना ८ कोटी, किशोर गटात ३३१ जणांना ६.६० कोटी तर तरुण या गटात ८७ लाभार्थ्यांना ६ कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे.या मुद्रा योजनेचे व्यवसायाच्या स्वरूपाने शिशु, किशोर व तरुण असे तीन प्रकार असून व्यवसायाच्या व्यापाकतेनुसार या प्रकारात रोजगाराच्या साधनांवर कर्ज ठरवले जाते. या योजनेमध्ये शिशु कर्जाअंतर्गत लाभार्थी ५ ते ५० हजारापर्यंत, किशोर कर्जाअंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत व तरु ण कर्जाअंतर्गत ५ लाखांपासून ते १०लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. योजनेच्या निकषाप्रमाणे हे कर्ज व्यवसायासाठी लाभाथ्यांना दिले जात असून हे कर्ज विनाअनुदानीत तत्वावर असून लाभार्थ्यांना ही कर्जे शहानिशा करून तात्काळ वाटप केली जातात. या योजनेत दिलेले मुद्राकार्ड मुख्यत: कृषि क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतु नुकतेच कृषि क्षेत्राला पूरक असणाऱ्या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळणार आहे. छोटे व्यवसाय जसे भाजीपाला विक्री, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीने, खानावळ, ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारचा कुठलाही लघु उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करु न देण्यात येते. या मुद्रा योजनेचा लाभ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी बँका, पतसंस्थांमधून घेता येईल. (वार्ताहर)जिल्ह्यातील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही ही योजना प्रभावीपणे राबविली पाहिजे.जिल्ह्यातील आदिवासी भागात मुद्रा कर्ज योजनेचा हवा तसा प्रभाव नाही. जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची गरज असून यासाठी जिल्हास्तरीय दिशा समितीत याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून व संबंधित बँकांकडून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत आजतागायत दिलेली कर्जे ही खूपच कमी आहेत याउपर जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना या योजनेत सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - चिंतामण वनगा, खासदारमुद्रा कर्ज योजना प्रशंसनीय असून या योजनेला आणखीन मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन तिचा प्रचार करणार असून कौशल्य विकास कार्यक्रमाबरोबरीं विकासाची संधी उपलब्ध होण्यासाठी मुद्रा योजनेची आवश्यकता आहे. गरजूंनी या मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. आतापर्यंत वाटप केलेल्या कर्जापेक्षा जास्त लक्षांक लाभ याअंतर्गत द्यावयाचा असून बँकांना यासाठी टार्गेट देण्याचे विचाराधीनही आहे. - अभिजित बांगर, जिल्हाधिकारी ही योजना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी चांगली आहेच. लाभार्थी व बँकर्स यामध्ये योग्य समन्वय व निकटता असल्यास ही योजना व्यवस्थित फलद्रुप होऊन गरजू, होतकरू व बेरोजगार स्वत:च्या पायावर उभे राहतील. - अनिल.बा.सावंत, व्यवस्थापक (जिल्हा अग्रणी बँक)