शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात २०९ फेरबदल

By धीरज परब | Updated: October 25, 2023 20:08 IST

फेरबदलासह आराखडा राज्य शासनाचा कोर्टात अंतिम मंजुरीसाठी

मीरारोड -  गेल्या अनेक वर्षां पासून प्रतीक्षेत असलेला मीरा भाईंदर महापालिकेचा सुधारित प्रारूप विकास आराखडा २०९ बदलांसह प्रसिद्ध करून तो अंतिम मंजुरी साठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागा कडे पाठवण्यात आला आहे . शासनाच्या मंजुरी नंतर आराखडा अंतिम होऊन अमलात येणार आहे . 

मीरा भाईंदर शहराचा विकास आराखडा १९९७ साली मीअंतिम करण्यात येऊन त्याची २० वर्षांची मुदत २०१६ सालीच संपुष्टात आली होती .  त्या नंतर विविध कारणांनी तसेच घोटाळा , आरोपांच्या फैरीत वादग्रस्त ठरला . २२ ऑक्टोबर २०२२ रोजी ठाणे सहायक संचालक नगररचना किशोर पाटील यांनी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता .  त्यावर सुमारे ५ हजार २०० इतक्या हरकती व सूचना आल्या असल्या तरी त्यात दुबार अर्जाची संख्या मोठी होती . त्यावर महापालिकेत सुनावणी घेण्यात आली होती . हरकती सूचनांचा विचार करून एमआरटीपी अधिनियम अंतर्गत  नियोजन समितीने अहवाल १८ ऑक्टोबर २०२३ रोजी नियुक्त अधिकारी यांच्या कडे सादर केला होता . 

नियोजन समितीने सादर केलेला अहवाल मान्य करण्यासाठी व शासन कडे मंजुरीसाठी पाठवण्याचा ठराव १९ ऑक्टोबर २०२३ रोजी  केला गेला . तर कलम २८ ( ४ ) नुसार केलेले फेरबदल हे नागरिकांच्या अवलोकनार्थ बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले आहेत . महापालिका मुख्यालयात व नगररचना ठाणे कार्यालयात बदल केलेले प्रारूप आराखड्याचे नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत . या शिवाय सदर नकाशे व आराखड्यात केलेले २०९ फेरबदल हे पालिकेच्या संकेत स्थळावर नागरिकांना पाहता येणार आहेत . ३० दिवसां साठी हे नकाशे व फेरबदलाची माहिती सदर दोन्ही कार्यालयात नागरिकांना पाहता येणार आहे . 

फेरबदलासह प्रसिद्ध केलेल्या ह्या प्रारूप आराखड्या वरून नवीन वादंग व आरोपांच्या फैरी झाडण्याची शक्यता आहे . कारण प्रारूप आराखडा हा शहर व नागरिकांच्या हिताचा नसून बिल्डर व राजकारणी बिल्डर यांच्या फायद्याचा असल्याचे आरोप होऊ लागले आहेत . 

सदर प्रारूप सुधारित विकास आराखडा हा शासना कडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून शासनास तो अंतिम मंजुरी करीता १ वर्षांची मुदत राहणार आहे . तर ज्या नागरिकांनी हरकती - सूचना दिल्या होत्या त्यावर सुनावणी होऊन नेमका काय निर्णय झाला ? याची माहिती मात्र नागरिकांना सध्या मिळणार नाही . शासनाने अंतिम मान्यता दिल्यावर ती माहिती नागरिकांना मिळू शकेल असे किशोर पाटील यांनी सांगितले . 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर