शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

‘स्पीड गन’मुळे २० हजार वाहनांना ब्रेक! वर्षभरात दोन कोटी ७१ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 23:53 IST

ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई, चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील उपवन येथेही एका महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्येही सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  

जितेंद्र कालेकरठाणे : भरधाव वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेने बडगा उगारला आहे. ‘स्पीड गन’ असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत २०,७१ वाहन चालकांकडून दोन कोटी ७१ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.रस्ता मोकळा मिळो अथवा न मिळो, अत्याधुनिक मोटारी व दुचाकी वेगात चालवल्या जातात. काही अपवाद वगळता कधी कधी तर नाहक ती जोरदार वेगाने पळविली जातात. त्यामुळे अनेकदा अपघात होतो. यात कधी रस्त्यात आलेल्या दुसऱ्या वाहनाला किंवा एखाद्या पादचाऱ्याला चुकविताना हे अपघात होतात. त्यामुळे ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर जोर लावल्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटते. त्यातच अनेकदा चालक किंवा सह प्रवाशाला जीव गमवावा लागतो.

चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील उपवन येथेही एका महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्येही सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.   ठाण्यात शहर वाहतूक पोलिसांकडून अशा शहरांतर्गत आणि राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे नजर ठेवली जाते. यात वाहनाचा वेग, वेळ आणि क्रमांकही अचूक टिपला जातो. दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेग आढळल्यानंतर थेट ई-चालानद्वारे ही कारवाई केली जाते, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

धावत्या वाहनांचा मोजला जातो वेग  भरघाव वाहन चालविणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनांमधील स्पीड गनद्वारे लेझरने पॉइंट आऊट केले जाते. त्यातून वाहनाचा वेग, तसेच चालक आणि सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला की नाही, हेही पडताळले जाते. विहित मर्यादेपेक्षा जास्त वेग असेल तर संबंधितांवर ई-चालानद्वारे ऑनलाइन कारवाई केली जाते, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 

अति वेगामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात होतात. शहरात ताशी ३० ते ४० किमी, राष्ट्रीय महामार्गावर ताशी ७० ते ८० किमीचा वेग अपेक्षित आहे. तो नसल्यास अशा वाहनांवर स्पीड गनद्वारे एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते. - बाळासाहेब पाटील,  पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस