शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पीकविम्यापासून २० हजार शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 06:29 IST

टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे.

ठाणे : टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे. यातील केवळ पालघर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित शेतकरी लाभापासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एकाही शेतक-यास नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. यामुळे ती त्वरीत देऊन त्यासाठी लावलेले निकषही स्पष्ट करावेत, अशी तंबी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दोन्ही जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना दिली आहे. यामुळे विमा कंपन्याचे धाबे दणाणले आहेत.बँकेने गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ६३६ शेतकºयांच्या १२ हजार ५६१.९० हेक्टरसाठी बँकेने ६८ कोटी ५३ लाख ५५ हजार रूपये पीककर्ज वाटप केले आहे. पण ऑगस्टपासून काही ठिकाणी अत्यल्प तर काही भागात अजिबात पाऊस पडला नाही. भात, नागली पीक काही ठिकाणी उन्हामुळे पूर्ण जळून गेले तर काही ठिकाणी पिकास लोंबीच आली नाही, काही ठिकाणी लहान लोंबी तर काहींमध्ये दाणाच भरलेला नाही. यामुळे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आल्याने शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील पीकविमा कंपन्यांनी शेतक-यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवल्याने ती त्वरीत देण्यासाठी पाटील यांनी इफफो टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील कर्जदार तसेच बिगरकर्जदार १४ हजार १८७ शेतक-यांनी त्यांच्या ११ हजार ९७.५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत काढला आहे. मात्र, शेतकºयांना या विम्याव्दारे अद्यापही भरपाई मिळाली नसल्याचे पाटील यांनी विमा कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी