शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पीकविम्यापासून २० हजार शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 06:29 IST

टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे.

ठाणे : टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे. यातील केवळ पालघर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित शेतकरी लाभापासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एकाही शेतक-यास नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. यामुळे ती त्वरीत देऊन त्यासाठी लावलेले निकषही स्पष्ट करावेत, अशी तंबी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दोन्ही जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना दिली आहे. यामुळे विमा कंपन्याचे धाबे दणाणले आहेत.बँकेने गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ६३६ शेतकºयांच्या १२ हजार ५६१.९० हेक्टरसाठी बँकेने ६८ कोटी ५३ लाख ५५ हजार रूपये पीककर्ज वाटप केले आहे. पण ऑगस्टपासून काही ठिकाणी अत्यल्प तर काही भागात अजिबात पाऊस पडला नाही. भात, नागली पीक काही ठिकाणी उन्हामुळे पूर्ण जळून गेले तर काही ठिकाणी पिकास लोंबीच आली नाही, काही ठिकाणी लहान लोंबी तर काहींमध्ये दाणाच भरलेला नाही. यामुळे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आल्याने शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील पीकविमा कंपन्यांनी शेतक-यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवल्याने ती त्वरीत देण्यासाठी पाटील यांनी इफफो टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील कर्जदार तसेच बिगरकर्जदार १४ हजार १८७ शेतक-यांनी त्यांच्या ११ हजार ९७.५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत काढला आहे. मात्र, शेतकºयांना या विम्याव्दारे अद्यापही भरपाई मिळाली नसल्याचे पाटील यांनी विमा कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी