शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पीकविम्यापासून २० हजार शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 06:29 IST

टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे.

ठाणे : टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे. यातील केवळ पालघर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित शेतकरी लाभापासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एकाही शेतक-यास नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. यामुळे ती त्वरीत देऊन त्यासाठी लावलेले निकषही स्पष्ट करावेत, अशी तंबी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दोन्ही जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना दिली आहे. यामुळे विमा कंपन्याचे धाबे दणाणले आहेत.बँकेने गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ६३६ शेतकºयांच्या १२ हजार ५६१.९० हेक्टरसाठी बँकेने ६८ कोटी ५३ लाख ५५ हजार रूपये पीककर्ज वाटप केले आहे. पण ऑगस्टपासून काही ठिकाणी अत्यल्प तर काही भागात अजिबात पाऊस पडला नाही. भात, नागली पीक काही ठिकाणी उन्हामुळे पूर्ण जळून गेले तर काही ठिकाणी पिकास लोंबीच आली नाही, काही ठिकाणी लहान लोंबी तर काहींमध्ये दाणाच भरलेला नाही. यामुळे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आल्याने शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील पीकविमा कंपन्यांनी शेतक-यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवल्याने ती त्वरीत देण्यासाठी पाटील यांनी इफफो टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील कर्जदार तसेच बिगरकर्जदार १४ हजार १८७ शेतक-यांनी त्यांच्या ११ हजार ९७.५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत काढला आहे. मात्र, शेतकºयांना या विम्याव्दारे अद्यापही भरपाई मिळाली नसल्याचे पाटील यांनी विमा कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी