शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या २० टक्के महागल्या, शेतकरी संपाचा परिणाम, आवक १५ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:10 IST

राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

ठाणे : राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. अगोदरच इंधनदरवाढीमुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय यांचे कंबरडे मोडले असताना आता रोजच्या जेवणातील भाजीपाला महागण्यास सुरुवात झाली आहे.ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी आवश्यक ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, दूध वेळेत पोहोचावे, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याकरिता पोलिसांबरोबरच अन्य संबंधित अधिकाºयांच्या बैठका घेतल्या जात आहेत, असे ठाणे जिल्हा उपनिबंधक एस.एम. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. त्यांचा हा संप सुमारे १० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यातच, पाऊस सुरू झाला, तर शेतातील भाजीपाला खराब होऊन टंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे बाजारात गेल्यावर अर्धा ते एक किलो भाजी खरेदी करणारा ग्राहक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे, तर हॉटेल व्यावसायिक भविष्यात संप चिघळल्यास भाज्यांचे दर वाढतील, या भीतीपोटी अतिरिक्त भाजीपाला खरेदी करत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे.इंधनांचे दर सामान्यांना महागाईचे चटके देत असताना शेतकरी संपामुळे रोजच्या जेवणाचेही गोरगरिबांचे वांदे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेले भाजपाचे नेते या भडकलेल्या महागाईबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मात्र, महिलांकडून या महागाईविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान भाजीपाला,फळे, अन्नधान्य, दूधपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस व संबंधित मार्केट कमिट्यांच्या बैठका सुरू आहेत. वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, उल्हासनगर आदी ठिकाणच्या शेतमालपुरवठ्याची आवक १५ टक्के कमी झाली आहे.ठाणे शहरात भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. संपाचा नेमका परिणाम सोमवारी जाणवू शकतो, असे भाजीविक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.शेतकरी संपाचा कल्याणच्या एपीएमसीलाही फटकाराज्यातील शेतकरी शुक्रवारपासून संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) शनिवारी केवळ ९८ ट्रक मालाची आवक झाली. त्यामुळे समितीला ६० हजार रुपयांचा फटका बसला.वाशी येथील बाजार समितीपाठोपाठ कल्याण एपीएमसी मोठी समिती आहे. येथे दिवसाला १५० पेक्षा जास्त ट्रक माल येतो. शुक्रवारी पहिल्या दिवशी संपाचा फारसा फटका बसला नाही.मात्र नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा येथून ७८ तर परराज्यातून २२ ट्रक आले. त्यात भाजीपाल्याचे १८ ट्रक व ३० टेम्पो होते. पालेभाज्यांचे पाच टेम्पो आले. अन्नधान्याचे १२ ट्रक, फुलांचे नऊ टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला.एकूण चार हजार ६३० क्विंटल मालाची आवक झाली. ही आवक निम्म्याहून कमी आहे. परिणामी, भाज्यांचे भाव प्रतिकिलो साधारण तीन ते आठ रुपयांपर्यंत वाढले. मिरची आणि टोमॅटोचे भाव आठ रुपयांनी वाढले होते.

टॅग्स :thaneठाणेvegetableभाज्या