शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भाज्या २० टक्के महागल्या, शेतकरी संपाचा परिणाम, आवक १५ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:10 IST

राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

ठाणे : राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. अगोदरच इंधनदरवाढीमुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय यांचे कंबरडे मोडले असताना आता रोजच्या जेवणातील भाजीपाला महागण्यास सुरुवात झाली आहे.ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी आवश्यक ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, दूध वेळेत पोहोचावे, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याकरिता पोलिसांबरोबरच अन्य संबंधित अधिकाºयांच्या बैठका घेतल्या जात आहेत, असे ठाणे जिल्हा उपनिबंधक एस.एम. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. त्यांचा हा संप सुमारे १० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यातच, पाऊस सुरू झाला, तर शेतातील भाजीपाला खराब होऊन टंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे बाजारात गेल्यावर अर्धा ते एक किलो भाजी खरेदी करणारा ग्राहक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे, तर हॉटेल व्यावसायिक भविष्यात संप चिघळल्यास भाज्यांचे दर वाढतील, या भीतीपोटी अतिरिक्त भाजीपाला खरेदी करत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे.इंधनांचे दर सामान्यांना महागाईचे चटके देत असताना शेतकरी संपामुळे रोजच्या जेवणाचेही गोरगरिबांचे वांदे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेले भाजपाचे नेते या भडकलेल्या महागाईबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मात्र, महिलांकडून या महागाईविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान भाजीपाला,फळे, अन्नधान्य, दूधपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस व संबंधित मार्केट कमिट्यांच्या बैठका सुरू आहेत. वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, उल्हासनगर आदी ठिकाणच्या शेतमालपुरवठ्याची आवक १५ टक्के कमी झाली आहे.ठाणे शहरात भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. संपाचा नेमका परिणाम सोमवारी जाणवू शकतो, असे भाजीविक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.शेतकरी संपाचा कल्याणच्या एपीएमसीलाही फटकाराज्यातील शेतकरी शुक्रवारपासून संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) शनिवारी केवळ ९८ ट्रक मालाची आवक झाली. त्यामुळे समितीला ६० हजार रुपयांचा फटका बसला.वाशी येथील बाजार समितीपाठोपाठ कल्याण एपीएमसी मोठी समिती आहे. येथे दिवसाला १५० पेक्षा जास्त ट्रक माल येतो. शुक्रवारी पहिल्या दिवशी संपाचा फारसा फटका बसला नाही.मात्र नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा येथून ७८ तर परराज्यातून २२ ट्रक आले. त्यात भाजीपाल्याचे १८ ट्रक व ३० टेम्पो होते. पालेभाज्यांचे पाच टेम्पो आले. अन्नधान्याचे १२ ट्रक, फुलांचे नऊ टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला.एकूण चार हजार ६३० क्विंटल मालाची आवक झाली. ही आवक निम्म्याहून कमी आहे. परिणामी, भाज्यांचे भाव प्रतिकिलो साधारण तीन ते आठ रुपयांपर्यंत वाढले. मिरची आणि टोमॅटोचे भाव आठ रुपयांनी वाढले होते.

टॅग्स :thaneठाणेvegetableभाज्या