शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

भाज्या २० टक्के महागल्या, शेतकरी संपाचा परिणाम, आवक १५ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:10 IST

राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

ठाणे : राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. अगोदरच इंधनदरवाढीमुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय यांचे कंबरडे मोडले असताना आता रोजच्या जेवणातील भाजीपाला महागण्यास सुरुवात झाली आहे.ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी आवश्यक ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, दूध वेळेत पोहोचावे, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याकरिता पोलिसांबरोबरच अन्य संबंधित अधिकाºयांच्या बैठका घेतल्या जात आहेत, असे ठाणे जिल्हा उपनिबंधक एस.एम. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. त्यांचा हा संप सुमारे १० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यातच, पाऊस सुरू झाला, तर शेतातील भाजीपाला खराब होऊन टंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे बाजारात गेल्यावर अर्धा ते एक किलो भाजी खरेदी करणारा ग्राहक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे, तर हॉटेल व्यावसायिक भविष्यात संप चिघळल्यास भाज्यांचे दर वाढतील, या भीतीपोटी अतिरिक्त भाजीपाला खरेदी करत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे.इंधनांचे दर सामान्यांना महागाईचे चटके देत असताना शेतकरी संपामुळे रोजच्या जेवणाचेही गोरगरिबांचे वांदे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेले भाजपाचे नेते या भडकलेल्या महागाईबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मात्र, महिलांकडून या महागाईविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान भाजीपाला,फळे, अन्नधान्य, दूधपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस व संबंधित मार्केट कमिट्यांच्या बैठका सुरू आहेत. वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, उल्हासनगर आदी ठिकाणच्या शेतमालपुरवठ्याची आवक १५ टक्के कमी झाली आहे.ठाणे शहरात भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. संपाचा नेमका परिणाम सोमवारी जाणवू शकतो, असे भाजीविक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.शेतकरी संपाचा कल्याणच्या एपीएमसीलाही फटकाराज्यातील शेतकरी शुक्रवारपासून संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) शनिवारी केवळ ९८ ट्रक मालाची आवक झाली. त्यामुळे समितीला ६० हजार रुपयांचा फटका बसला.वाशी येथील बाजार समितीपाठोपाठ कल्याण एपीएमसी मोठी समिती आहे. येथे दिवसाला १५० पेक्षा जास्त ट्रक माल येतो. शुक्रवारी पहिल्या दिवशी संपाचा फारसा फटका बसला नाही.मात्र नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा येथून ७८ तर परराज्यातून २२ ट्रक आले. त्यात भाजीपाल्याचे १८ ट्रक व ३० टेम्पो होते. पालेभाज्यांचे पाच टेम्पो आले. अन्नधान्याचे १२ ट्रक, फुलांचे नऊ टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला.एकूण चार हजार ६३० क्विंटल मालाची आवक झाली. ही आवक निम्म्याहून कमी आहे. परिणामी, भाज्यांचे भाव प्रतिकिलो साधारण तीन ते आठ रुपयांपर्यंत वाढले. मिरची आणि टोमॅटोचे भाव आठ रुपयांनी वाढले होते.

टॅग्स :thaneठाणेvegetableभाज्या