शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या २० टक्के महागल्या, शेतकरी संपाचा परिणाम, आवक १५ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:10 IST

राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

ठाणे : राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. अगोदरच इंधनदरवाढीमुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय यांचे कंबरडे मोडले असताना आता रोजच्या जेवणातील भाजीपाला महागण्यास सुरुवात झाली आहे.ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी आवश्यक ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, दूध वेळेत पोहोचावे, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याकरिता पोलिसांबरोबरच अन्य संबंधित अधिकाºयांच्या बैठका घेतल्या जात आहेत, असे ठाणे जिल्हा उपनिबंधक एस.एम. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. त्यांचा हा संप सुमारे १० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यातच, पाऊस सुरू झाला, तर शेतातील भाजीपाला खराब होऊन टंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे बाजारात गेल्यावर अर्धा ते एक किलो भाजी खरेदी करणारा ग्राहक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे, तर हॉटेल व्यावसायिक भविष्यात संप चिघळल्यास भाज्यांचे दर वाढतील, या भीतीपोटी अतिरिक्त भाजीपाला खरेदी करत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे.इंधनांचे दर सामान्यांना महागाईचे चटके देत असताना शेतकरी संपामुळे रोजच्या जेवणाचेही गोरगरिबांचे वांदे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेले भाजपाचे नेते या भडकलेल्या महागाईबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मात्र, महिलांकडून या महागाईविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान भाजीपाला,फळे, अन्नधान्य, दूधपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस व संबंधित मार्केट कमिट्यांच्या बैठका सुरू आहेत. वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, उल्हासनगर आदी ठिकाणच्या शेतमालपुरवठ्याची आवक १५ टक्के कमी झाली आहे.ठाणे शहरात भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. संपाचा नेमका परिणाम सोमवारी जाणवू शकतो, असे भाजीविक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.शेतकरी संपाचा कल्याणच्या एपीएमसीलाही फटकाराज्यातील शेतकरी शुक्रवारपासून संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) शनिवारी केवळ ९८ ट्रक मालाची आवक झाली. त्यामुळे समितीला ६० हजार रुपयांचा फटका बसला.वाशी येथील बाजार समितीपाठोपाठ कल्याण एपीएमसी मोठी समिती आहे. येथे दिवसाला १५० पेक्षा जास्त ट्रक माल येतो. शुक्रवारी पहिल्या दिवशी संपाचा फारसा फटका बसला नाही.मात्र नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा येथून ७८ तर परराज्यातून २२ ट्रक आले. त्यात भाजीपाल्याचे १८ ट्रक व ३० टेम्पो होते. पालेभाज्यांचे पाच टेम्पो आले. अन्नधान्याचे १२ ट्रक, फुलांचे नऊ टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला.एकूण चार हजार ६३० क्विंटल मालाची आवक झाली. ही आवक निम्म्याहून कमी आहे. परिणामी, भाज्यांचे भाव प्रतिकिलो साधारण तीन ते आठ रुपयांपर्यंत वाढले. मिरची आणि टोमॅटोचे भाव आठ रुपयांनी वाढले होते.

टॅग्स :thaneठाणेvegetableभाज्या