शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये ६७० जणांना वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:54 IST

अतिवृष्टीमुळे पूल खचले; एनडीआरएफ, कोस्टगार्ड जवानांची कामगिरी

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील पूल खचल्याने आणि पाणी साचून राहिल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या ६७० लोकांची सुखरूप सुटका एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे स्वत: आपल्या विविध टीमसह घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेत आहेत.मुसळधार पाऊस, समुद्राला आलेली मोठी भरती, त्यातच विविध धरणांतून पाण्याचा होणारा विसर्ग अशा तिहेरी संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेले हजारो नागरिक आपल्या घराकडे जाताना मध्येच अडकून पडल्याच्या घटना घडल्या. वाडा तालुक्यातील केलटन भागात पाणी शिरल्याने ४० जण अडकले. मनोर (टेण)-वाडा रस्त्यावरील करळगाव येथे ४, वसई तालुक्यातील राजोडीमधून ३००, मोरीगावातून १८९, भाताणे १०, नवघर (पूर्व) मिठागर भागातील ४७, अर्नाळामधून ८८ अशा पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण ६७० जणांच्या सुखरूप सुटकेसाठी एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व घडामोडींकडे जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन जातीने लक्ष देत आहेत.वैतरणा खाडीच्या मध्ये असणारे वाढीव गाव शनिवारपासून पाण्याखाली असून गुडघाभर पाणी प्रत्येक घरात आहे. दोन दिवस हे गाव अंधारात असून एकाही घरात शनिवारपासून चूल पेटलेली नाही. याच गावातील बेबी बाई भोईर या ६० वर्षीय महिला १ आॅगस्ट रोजी वैतरणा पुलावरून खाडीच्या पाण्यात पडल्या असून आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांच्याशी संपर्कसाधून अंधारात वनचरांचा धोका पाहता वीजपुरवठा करण्याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे.वसईत ४०० जणांना वाचवलेवसई पूर्वेस असलेली मिठागर वसाहत या परिसरात साधारण ४०० जण अडकले होते. त्या सर्वांना वसई तहसीलदार, महापालिका, अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.वसई पूर्वेस मोरी, सारजा मोरी, कामण आदी गावे आहेत. मात्र येथे दोन नद्यांची पात्रे असून या भागात साधारणपणे २०० जण राहतात. रविवारी या ठिकाणी ७० ते ८० ग्रामस्थ अडकून बसले होते. त्यांच्या मदतीसाठी तहसीलदार व जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने एनडीआरएफची टीम बोलावली. त्यांना बोटीतून सुरक्षितस्थळी आणले असून बचावकार्य सुरू आहे.जनावरे गेली वाहूनवाडा तालुक्यातील गांध्रे येथे वैतरणा नदीजवळ प्रभाकर भोईर (४० म्हशी), अरुण ठाकरे (१० म्हशी), विवेक ठाकरे (३ जर्शीगाई) यांचे तबेले होते. वैतरणा नदीला आलेल्या महापुरात या तबेल्यांत पाणी जाऊन काही जनावरे वाहून गेली, तर काही पुराच्या पाण्यात अडकली आहेत. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या मदतीने येथील सहा कामगारांना पुराच्या पाण्यातून सुखरूप काढले आहे.

टॅग्स :Rainपाऊस