शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये ६७० जणांना वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:54 IST

अतिवृष्टीमुळे पूल खचले; एनडीआरएफ, कोस्टगार्ड जवानांची कामगिरी

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील पूल खचल्याने आणि पाणी साचून राहिल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या ६७० लोकांची सुखरूप सुटका एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे स्वत: आपल्या विविध टीमसह घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेत आहेत.मुसळधार पाऊस, समुद्राला आलेली मोठी भरती, त्यातच विविध धरणांतून पाण्याचा होणारा विसर्ग अशा तिहेरी संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेले हजारो नागरिक आपल्या घराकडे जाताना मध्येच अडकून पडल्याच्या घटना घडल्या. वाडा तालुक्यातील केलटन भागात पाणी शिरल्याने ४० जण अडकले. मनोर (टेण)-वाडा रस्त्यावरील करळगाव येथे ४, वसई तालुक्यातील राजोडीमधून ३००, मोरीगावातून १८९, भाताणे १०, नवघर (पूर्व) मिठागर भागातील ४७, अर्नाळामधून ८८ अशा पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण ६७० जणांच्या सुखरूप सुटकेसाठी एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व घडामोडींकडे जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन जातीने लक्ष देत आहेत.वैतरणा खाडीच्या मध्ये असणारे वाढीव गाव शनिवारपासून पाण्याखाली असून गुडघाभर पाणी प्रत्येक घरात आहे. दोन दिवस हे गाव अंधारात असून एकाही घरात शनिवारपासून चूल पेटलेली नाही. याच गावातील बेबी बाई भोईर या ६० वर्षीय महिला १ आॅगस्ट रोजी वैतरणा पुलावरून खाडीच्या पाण्यात पडल्या असून आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांच्याशी संपर्कसाधून अंधारात वनचरांचा धोका पाहता वीजपुरवठा करण्याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे.वसईत ४०० जणांना वाचवलेवसई पूर्वेस असलेली मिठागर वसाहत या परिसरात साधारण ४०० जण अडकले होते. त्या सर्वांना वसई तहसीलदार, महापालिका, अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.वसई पूर्वेस मोरी, सारजा मोरी, कामण आदी गावे आहेत. मात्र येथे दोन नद्यांची पात्रे असून या भागात साधारणपणे २०० जण राहतात. रविवारी या ठिकाणी ७० ते ८० ग्रामस्थ अडकून बसले होते. त्यांच्या मदतीसाठी तहसीलदार व जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने एनडीआरएफची टीम बोलावली. त्यांना बोटीतून सुरक्षितस्थळी आणले असून बचावकार्य सुरू आहे.जनावरे गेली वाहूनवाडा तालुक्यातील गांध्रे येथे वैतरणा नदीजवळ प्रभाकर भोईर (४० म्हशी), अरुण ठाकरे (१० म्हशी), विवेक ठाकरे (३ जर्शीगाई) यांचे तबेले होते. वैतरणा नदीला आलेल्या महापुरात या तबेल्यांत पाणी जाऊन काही जनावरे वाहून गेली, तर काही पुराच्या पाण्यात अडकली आहेत. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या मदतीने येथील सहा कामगारांना पुराच्या पाण्यातून सुखरूप काढले आहे.

टॅग्स :Rainपाऊस