शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पालघरमध्ये ६७० जणांना वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:54 IST

अतिवृष्टीमुळे पूल खचले; एनडीआरएफ, कोस्टगार्ड जवानांची कामगिरी

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील पूल खचल्याने आणि पाणी साचून राहिल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या ६७० लोकांची सुखरूप सुटका एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे स्वत: आपल्या विविध टीमसह घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेत आहेत.मुसळधार पाऊस, समुद्राला आलेली मोठी भरती, त्यातच विविध धरणांतून पाण्याचा होणारा विसर्ग अशा तिहेरी संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेले हजारो नागरिक आपल्या घराकडे जाताना मध्येच अडकून पडल्याच्या घटना घडल्या. वाडा तालुक्यातील केलटन भागात पाणी शिरल्याने ४० जण अडकले. मनोर (टेण)-वाडा रस्त्यावरील करळगाव येथे ४, वसई तालुक्यातील राजोडीमधून ३००, मोरीगावातून १८९, भाताणे १०, नवघर (पूर्व) मिठागर भागातील ४७, अर्नाळामधून ८८ अशा पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण ६७० जणांच्या सुखरूप सुटकेसाठी एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व घडामोडींकडे जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन जातीने लक्ष देत आहेत.वैतरणा खाडीच्या मध्ये असणारे वाढीव गाव शनिवारपासून पाण्याखाली असून गुडघाभर पाणी प्रत्येक घरात आहे. दोन दिवस हे गाव अंधारात असून एकाही घरात शनिवारपासून चूल पेटलेली नाही. याच गावातील बेबी बाई भोईर या ६० वर्षीय महिला १ आॅगस्ट रोजी वैतरणा पुलावरून खाडीच्या पाण्यात पडल्या असून आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांच्याशी संपर्कसाधून अंधारात वनचरांचा धोका पाहता वीजपुरवठा करण्याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे.वसईत ४०० जणांना वाचवलेवसई पूर्वेस असलेली मिठागर वसाहत या परिसरात साधारण ४०० जण अडकले होते. त्या सर्वांना वसई तहसीलदार, महापालिका, अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.वसई पूर्वेस मोरी, सारजा मोरी, कामण आदी गावे आहेत. मात्र येथे दोन नद्यांची पात्रे असून या भागात साधारणपणे २०० जण राहतात. रविवारी या ठिकाणी ७० ते ८० ग्रामस्थ अडकून बसले होते. त्यांच्या मदतीसाठी तहसीलदार व जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने एनडीआरएफची टीम बोलावली. त्यांना बोटीतून सुरक्षितस्थळी आणले असून बचावकार्य सुरू आहे.जनावरे गेली वाहूनवाडा तालुक्यातील गांध्रे येथे वैतरणा नदीजवळ प्रभाकर भोईर (४० म्हशी), अरुण ठाकरे (१० म्हशी), विवेक ठाकरे (३ जर्शीगाई) यांचे तबेले होते. वैतरणा नदीला आलेल्या महापुरात या तबेल्यांत पाणी जाऊन काही जनावरे वाहून गेली, तर काही पुराच्या पाण्यात अडकली आहेत. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या मदतीने येथील सहा कामगारांना पुराच्या पाण्यातून सुखरूप काढले आहे.

टॅग्स :Rainपाऊस