शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षात मीरा भाईंदर मधील हरित क्षेत्र १३.६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ

By धीरज परब | Updated: January 29, 2025 22:48 IST

हवेतील कार्बन आणि तापमानात मोठी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर शहरात निसर्गाची अतोनात हानी आणि बांधकामांचा धुमाकूळ प्रशासन , राजकारणी , विकासक , भरणी माफिया यांच्या अभद्र संगनमताने होत असल्याच्या आरोपांना आता पालिकेनेच खरे ठरवले आहे . हवामान कृती आराखडा जाहीर करताना शहरातील हरित क्षेत्र १३ . ६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे . हवेतील कार्बन आणि तापमानात मोठी वाढ झाल्याचे मान्य केले आहे. 

शहरातील प्रदुषणाला आळा घालून २०४७ पर्यंत शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या संयुक्त विद्यमाने हवामान कृती आराखडा तयार केला आहे . बुधवार २९ जानेवारी रोजी वांद्रे येथे आयोजित हवामान आराखडा कृती कार्यशाळेत जाहीर करण्यात आला आहे.  

ह्यावेळी  महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाली आणि आगा खान एजन्सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा, आयुक्त संजय काटकर ,  उपायुक्त  कल्पिता पिंपळे व प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, सहायक संचालक पुरषोत्तम शिंदे , नगर सचिव वासुदेव शिरवळकर, मुख्यलेखापरिक्षक सुधीर नाकाडी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.   शिवाय विविध कंपन्यांचे सामाजिक दायीत्त्व विभागाचे प्रतिनिधी, विचारवंत आणि हवामान तज्ज्ञ यांच्यासह महाराष्ट्र राज्य हवामान कृती सेल, सी४० सिटीज, आणि युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट्स प्रोग्राम यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.  

२००५ ते २०२२ दरम्यान शहरातील बांधकाम क्षेत्रफळ ५०.०५% ने वाढले असून हरित क्षेत्र १३.६% पर्यंत घटले आहे . या शहरी विस्तारामुळे वार्षिक तापमान ०.४६°C ने वाढले आहे. त्यामुळे पूरस्थिती, पाणी समस्या, वाहतूक कोंडी आदी समस्या वाढल्या आहेत. 

शहरात विविध प्रकारे कार्बनचे उत्सर्जन होत असते.  ग्रीन हाऊस गॅस मूल्यांकनानुसार स्थिर ऊर्जेमुळे ६२% कार्बनचे तर वाहतुकीमुळे २२% आणि कचरा क्षेत्रामुळे १६% कार्बनचे उत्सर्जन होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या संयुक्त विद्यमाने हवामान कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी इनोव्हेशन सेलच्या माध्यमातूम, सीइजीपी फाउंडेशनने ज्ञान भागीदार म्हणून योगदान दिले आहे . 

शहराला २०४७ पर्यंत विकासित शहराचा दृष्टीकोन साध्य करण्यासाठी, ऊर्जा व्यवस्थापन आणि निर्मिती, पाणीपुरवठा, पूरस्थिती, शहरी हरितीकरण, जैवविविधता, गतिशीलता, हवेची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन आदी विषय केंद्रस्थानी ठेवून उपाययोजना केल्या जाणार आहेत. याशिवाय, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून नियोजित २३% उत्सर्जन कपात आणि हरित आवरण वाढवून ४१% कार्बन शोषण करण्याचे लक्ष्य आहे.

यावेळी प्रवीण परदेशी म्हणाले कि , मुंबई आणि त्यांच्या सलग्न शहरांमध्ये विविध शहरी समस्या निर्माण झाल्या असून, नवी आव्हाने समोर येत आहेत. जगातील प्रमुख शहरांची तुलना मुंबईसह केल्यावर लक्षात येते मुंबईत सर्वाधिक हरित पट्टा आहे, मात्र तरी वायू प्रदुषणात आपले स्थान सर्वोच्च याचे कारण वाढती वाहने यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तसेच शाश्वत विकासाच्या दृष्टीने नियोजनपूर्ण उपाययोजनात्मकअंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून त्यासाठी विविध प्रकारची पावले उचलली जात आहेत.मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले कि ,  शहरात शाश्वत विकास व्हावा, सिटी क्लायमेट अॅक्शन प्लॅनद्वारे विविध उपाययोजनात्मक पावले उचलून शहरात प्रत्यक्ष पर्यावरणपूरक जीवनशैली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच होम@२० सारख्या उपक्रमांद्वारे, उत्सर्जन कमी केले जाणार आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी विशेष मॉडेल

गृह वापरातील वीज वापर हा उत्सर्जनाचा ४०.५% भाग आहे. महानगरपालिकेने येथील नवयुवन हाउसिंग सोसायटीतील प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवून ६०% पेक्षा अधिक उत्सर्जन कपात केली आहे. यासाठी सौर उर्जा पीव्ही प्रणाली, बीएलडीसी फॅन, एलईडी दिवे आणि पाण्याच्या बचतीसाठी उपकरणे आदींचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल यशस्वी ठरले असून त्याचा शहरात अंमलबजावणी केली जाणार आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर