शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भयंकर! रुग्णालयात १२ तासांत गेले १८ जीव; डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नसल्याने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 05:57 IST

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/मुंबई : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.  त्यानंतर रविवार सकाळपर्यंत म्हणजे १२ तासांत आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात असून, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही कात्रीत पकडून जाब विचारला आहे.

आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मृत्यू झालेले रुग्ण ३ ऑगस्ट ते १२ ऑगस्टदरम्यान रुग्णालयात दाखल झाले होते. १३ रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर पाच रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. या वृत्तास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या दाव्यानुसार मृत्यू झालेले रुग्ण ३३ ते ८३ वर्षांचे होते. काही वयोवृद्ध तर नऊ रुग्ण खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ अवस्थेत शेवटच्या क्षणी दाखल करण्यात आले होते.

रुग्णांना होते गंभीर आजार?

दगावलेल्या रुग्णांपैकी काही अपघातग्रस्त होते. अल्सर, लिव्हर खराब होणे, न्यूमोनिया, विष प्राशन, डायलिसिस, डोक्याला मारहाण, युरिन इन्फेक्शन, ऑक्सिजनची कमतरता, बीपी कमी होणे, ताप आदींमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश असून, त्याचा मृत्यू कसा झाला, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.  

दोन दिवसात दोषींवर कारवाई : आरोग्यमंत्री 

पुणे : रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशाप्रकारे रुग्णांच्या जिवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल पाहून दाेषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात दिली. मृत्यू झालेल्यांपैकी १३ रुग्ण आयसीयू वॉर्डमधील, तर चार रुग्ण जनरल वाॅर्डमधील आहेत. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे गुलदस्त्यात आहे. याबाबत आराेग्यमंत्री सावंत म्हणाले की, ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमकं काय घडलं? हा विषय समजून घेऊ, त्यानंतर दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त झाला की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

चौकशी समिती नियुक्त 

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमण्यात आली. समितीत आरोग्यसेवेचे आयुक्त, आरोग्य संचालक, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जे.जे. रुग्णालयाचे तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक आदींचा समावेश आहे.

उपचारांचा प्रश्न गंभीर का? 

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याने उपचारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानादेखील प्रशासनाला जाग आली नाही. ही अतिशय दुर्दैवी बाब असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.

मी माझ्या भावाला उपचारासाठी कल्याण येथून आणून या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे त्याचा मृत्यू झाला. सकाळपासून शवविच्छेदनाची मागणी करत आहे. ती पूर्ण होत नाही. - नीता राजे, रुग्णाचे नातेवाईक.

माझ्या मुलाने रॉकेल पिल्यामुळे चार दिवसांपासून तो येथे उपचार घेत होता. परंतु तो गंभीर आहे का? याबद्दल डॉक्टरांनी काही माहिती दिली नाही. रात्री त्याला मृत घोषित केले. - सुनील गोडे, मृत रुग्णाचे वडील

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल