शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘दिव्या’ची १८ तास ‘बत्ती गुल’, महावितरणची पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 00:21 IST

कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली.

ठाणे : कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली. त्यामुळे जवळपास १८ तास दिव्यातील काही भागांची बत्तीगुल झाली होती. पंधरा दिवसांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, विद्युत वाहिनी तोडल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, एकीक डे लोडशेडिंगची टांगती तलवार दिव्यातील नागरिकांवर असताना, मागील पंधरा दिवसांत दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैैराण झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून दिव्यात सकाळी साडेचार तास आणि सायंकाळी अडीच तास असे दिवसातून सात तासांचे लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यातच शनिवारी सकाळी दहा वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. लोडशेडिंगमुळे वीजपुरवठा खंडित झालेला असावा, असे प्रारंभी नागरिकांनी गृहीत धरले. मात्र, सायंकाळची रात्र झाली तरी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक हैैराण झाले.दरम्यान, कल्याणफाटा ते खिडकाळी येथे एमएसआरडीसीमार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी वापरण्यात येणाºया जेसीबीमुळे भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्याचे समोर आले. तुटलेल्या केबलचे काम पूर्ण होईपर्यंत रविवारी पहाटेचे चार वाजले. त्यामुळे सायंकाळचे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.मागील पंधरा दिवसांत एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दोन वेळा विद्युत केबल वाहिनी तोडण्यात आली आहे. केबल वाहिनी तोडल्याप्रकरणी शनिवारी शीळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे महावितरण अधिकाºयांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ती दखलपात्र गुन्ह्यामध्ये वळती करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र अशा घटनांमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.लोडशेडिंगबाबत दिव्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊनही दुर्लक्ष केले जाते. दिव्यातून जेवढी वसुली केली जाते, तेवढ्या प्रमाणात सुविधा मिळत नाही. दिव्यात वीजचोरीचे प्रमाण प्रचंड आहे. ते रोखण्यात महावितरणला यश आले तर, लोडशेडिंगची गरजच भासणार नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुंढे यांनी दिली.>या भागात होता अंधारदिव्यातील गणेशनगर, मुंब्रा कॉलनी, विकास म्हात्रे गेट, धर्मवीरनगर, वक्रतुंडनगर, सिद्धिविनायक नगर, सुदाम रिजेन्सी आणि खर्डीपासून शीळ गाव आदी भागात जवळपास १८ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी केले जाणारे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आले.