शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘दिव्या’ची १८ तास ‘बत्ती गुल’, महावितरणची पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 00:21 IST

कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली.

ठाणे : कल्याण फाटा ते खिडकाळी या रस्त्याच्या कामामुळे भूमिगत विद्युत केबल वाहिनी तुटल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रविवारी पहाट उजाडली. त्यामुळे जवळपास १८ तास दिव्यातील काही भागांची बत्तीगुल झाली होती. पंधरा दिवसांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, विद्युत वाहिनी तोडल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, एकीक डे लोडशेडिंगची टांगती तलवार दिव्यातील नागरिकांवर असताना, मागील पंधरा दिवसांत दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैैराण झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून दिव्यात सकाळी साडेचार तास आणि सायंकाळी अडीच तास असे दिवसातून सात तासांचे लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यातच शनिवारी सकाळी दहा वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. लोडशेडिंगमुळे वीजपुरवठा खंडित झालेला असावा, असे प्रारंभी नागरिकांनी गृहीत धरले. मात्र, सायंकाळची रात्र झाली तरी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक हैैराण झाले.दरम्यान, कल्याणफाटा ते खिडकाळी येथे एमएसआरडीसीमार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी वापरण्यात येणाºया जेसीबीमुळे भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्याचे समोर आले. तुटलेल्या केबलचे काम पूर्ण होईपर्यंत रविवारी पहाटेचे चार वाजले. त्यामुळे सायंकाळचे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.मागील पंधरा दिवसांत एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दोन वेळा विद्युत केबल वाहिनी तोडण्यात आली आहे. केबल वाहिनी तोडल्याप्रकरणी शनिवारी शीळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे महावितरण अधिकाºयांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ती दखलपात्र गुन्ह्यामध्ये वळती करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र अशा घटनांमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.लोडशेडिंगबाबत दिव्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊनही दुर्लक्ष केले जाते. दिव्यातून जेवढी वसुली केली जाते, तेवढ्या प्रमाणात सुविधा मिळत नाही. दिव्यात वीजचोरीचे प्रमाण प्रचंड आहे. ते रोखण्यात महावितरणला यश आले तर, लोडशेडिंगची गरजच भासणार नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुंढे यांनी दिली.>या भागात होता अंधारदिव्यातील गणेशनगर, मुंब्रा कॉलनी, विकास म्हात्रे गेट, धर्मवीरनगर, वक्रतुंडनगर, सिद्धिविनायक नगर, सुदाम रिजेन्सी आणि खर्डीपासून शीळ गाव आदी भागात जवळपास १८ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी केले जाणारे अडीच तासांचे लोडशेडिंग रद्द करण्यात आले.