शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

आदिवासींच्या पोषण आहारावर १५३ कोटींचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 04:26 IST

कोरोनाच्या नावाने निधीत कपात; महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

- नारायण जाधव ठाणे : कोरोनाकाळात नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध सरकारांकडून विशेष पॅकेजसह विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने नवे पॅकेज देणे सोडाच; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाशी लढा देत असलेल्या राज्याच्या आदिवासी भागांतील गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या अमृत पोषण आहारासाठीच्या अनुदानावरच डल्ला मारला आहे.कोरोनाच्या नावाने वित्त विभागाच्या अटींचे कारण पुढे करून या आहारासाठीचे अनुदान तब्बल १५३ कोटी २० लाख ४९ हजार रुपयांनी कमी केले आहे. यामुळे आदिवासी भागांतील कुपोषण कसे कमी होईल, असा प्रश्न रविवारच्या आदिवासी दिनी करण्यात येत आहे.राज्याच्या आदिवासी भागातील कु पोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने आदिवासी भागातील गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि एक ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार देण्यात येतो.तो दिल्यामुळे राज्यात एकेकाळी ४५ टक्क्यांवर असलेले कुपोषणाचे प्रमाण ३४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्याचेच अनुदान आता ठाकरे सरकारने ७५ टक्क्यांनी कमी केले आहे.ठाणे-पालघर जिल्ह्यांना बसला मोठा फटकाचालू आर्थिक वर्षासाठी राज्यासाठी २०४ कोटी २७ लाख ३३ हजार रुपयांची भरीव तरतूद केली होती. यापैकी १७ कोटी दोन लाख २७ हजार अनुदान यापूर्वीच वितरित केले आहे. तर, आता ३४ कोटी चार लाख ५५ हजार अनुदान वितरित करण्यात आले आहे. याचा मोठा फटका आदिवासीबहुल असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही बसला आहे. ठाण्याला १२ कोटी १० लाखांपैकी तीन कोटी २५ लाख, तर पालघरला ३२ कोटी रुपयांपैकी आठ कोटी रुपये मिळाले आहेत.अमृत पोषण आहाराचा निधी कमी केला, हे जरी खरे असले तरी त्याचा फरक पडणार नाही. शासनाने ठाणे जि.प.ला आधी जो निधी दिला आहे, त्यासह जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मातांना पोषण आहारासह बालकांना खजुराचा पुरवठा केला जाणार आहे. याशिवाय, उत्पन्न वाढल्यानंतर उर्वरित निधी शासन टप्प्याटप्प्याने देणार आहे.- सुभाष पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, ठाणेसाडेसहा लाख बालकांचे कुपोषण निर्मूलन होईल कसे?राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील साडेसहा लाखांहून अधिक मुले आणि सव्वा लाख मातांना हा पोषण आहार देण्यात येतो. यात आशा कार्यकर्त्या-अंगणवाडीसेविकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शासनाकडून वेळेत अनुदान न मिळाल्याने त्या आधी पदरमोड करून वेळेत संबंधित माता आणि बालकांना हा आहार पोहोचवित असतात. परंतु महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या नावाने १५३ कोटींहून अधिक अनुदान कमी केल्याने कुपोषण निर्मूलन होईल कसे, असा प्रश्न करण्यात येत आहे.