शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

उल्हासनगरात मलनिस्सारण केंद्राची भिंत कोसळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 10:50 IST

कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली.

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली. यामध्ये 15 वर्षीच्या मुलाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले. पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन धोकादायक भिंती काढण्याचे काम भर पावसात सुरू केले आहे.उल्हासनगर कॅम्प नं - 3 येथील वडोलगाव शेजारी मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्राचे काम करतेवेळी निघालेली माती, दगड भिंती शेजारी टाकण्यात आली. संततधार पावसामुळे मातीचा भार भिंतीवर आल्याने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घायवट त्यांच्या घरावर कोसळली. भिंत कोसळल्याने परिसरात एकच आक्रोश सुरू झाला. स्थानिक नगरसेवक गजानन शेळके, कविता तोरणे-रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घायवट कुटुंबाला नातीच्या ढिगाऱ्या खालून काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने घरात भिंतीशेजारी झोपलेला 15 वर्षाचा किरण धायवट याचा जागीच मृत्यू झाला, तर काका सूर्यकांत घायवट गंभीर जखमी झाले. आई आशा किरकोळ जखमी झाली.महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर घरावर कोलमडलेली भिंत बाजूला करण्याचे काम सुरू केले. महापालिका व मलनिस्सारण केंद्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एकाच बळी गेल्याचा आरोप शिवाजी रगडे यांनी केला. महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी रगडे यांनी करून कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. वडोळगावला जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने शालेय मुलासह नागरिकांना 3 ते 4 किमीचा वळसा घालून अंबरनाथ पुलावर जावे लागते. पालिकेने शालेय मुलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर