शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

शहरात आजपासून १५% पाणी कपात

By admin | Updated: November 1, 2015 00:10 IST

ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी., जलसंपदा विभाग व स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडील पाणी साठयाचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून

ठाणे : ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी., जलसंपदा विभाग व स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडील पाणी साठयाचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून शहरात रोज १५ टक्के पाणी पाणी कपात लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय पूर्वी जाहिर केल्याप्रमाणे शहरातील पाणीपुरवठा बुधवार आणि शुक्रवारी बंद राहणार आहे.ठाणे शहराला आजच्या घडीला ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. परंतु पाण्याच्या नियोजनातील अभाव आणि पाणी गळती यामुळे आधीच शहरातील काही भागांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात आता पुन्हा महापालिकेने पाणी कपात जाहीर केल्याने या भागांना पाणी टंचाईच्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेम कंपनीकडून होणारा पाणी पुरवठयात आठवडयातील ६ दिवसाकरीता १५ टक्के प्रतीदिन कपात व प्रत्येक बुधवारी पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कालावधीत ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर व घोडबंदर रोड या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच एम.आय.डी.सी.कडून होणाऱ्या पाणी पुरवठयातही आठवडयातील ६ दिवसाकरीता १५ टक्के प्रतीदिन कपात करण्यात येणार असून प्रत्येक शुक्र वारी पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कालावधीत कळवा, मुंब्रा व दिवा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.