शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

१५ टक्के मालमत्ताकरवाढीची तलवार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 23:31 IST

१० टक्के दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडून बासनात; शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केल्याचा विरोधकांचा आरोप

ठाणे : मालमत्ताकरामध्ये ३४ टक्के केलेली करवाढ ही १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा सत्ताधारी शिवसेनेने केली होती. परंतु, प्रशासनाने तिला केराची टोपली दाखवून ठाणे खाडीत बुडविल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण प्रशासनाने १० टक्के नाही तर आपला १५ टक्के करवाढीचा ठराव कायम ठेवून यावर्षी त्यानुसारच ठाणेकरांना बिले पाठवली असल्याचे बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले. प्रशासनाच्या या भूमिकेचे खापर मात्र सत्ताधारी शिवसेनेवर फुटले असून शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.मालमत्ताकरामध्ये ३४ टक्के करवाढ करण्याच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला विरोध करून तो रद्दच करण्याचा ठराव शिवसेनेने महासभेत केला होता. पालिका आयुक्तांनी मात्र त्याला केराची टोपली दाखवून करवाढीचा प्रस्ताव रद्द न करता ती ३४ टक्क्यांहून १५ टाक्यांवर आणली होती.पाण्याच्या मुद्यावरून बुधवारी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला. शिवसेनेने जर ३४ टक्के करवाढीचा ठराव रद्द करून तो १० टक्के केला होता, तर मग यावर्षी ठाणेकरांना १५ टक्के कारवाढीने बिले कशी आली असे सांगून त्यांनी शिवसेनेची चांगलीच गोची केली. मात्र, प्रशासनाने १५ टक्के करवाढीचा ठरावच असल्याचे स्पष्ट करून त्यानुसार ही बिले पाठविल्याचे स्पष्ट केले. यावर मुल्ला यांनी १५ टक्यांचा ठराव जर सभागृहात झाला असेल तर त्याची प्रत किंवा इतिवृत्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जर प्रशासनाने ही माहिती दिली नाही तर मग ठराव झाला कुठे असा प्रश्नही त्यांनी केला.सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रशासनाच्या ३४ टक्के करवाढीच्या विरोधात प्रस्तावाची सूचना मांडली होती. परंतु, प्रत्यक्षात हा ठरावच झाला नसल्याचे मत विरोधकांनी त्यावेळच्या महासभेत मांडले होते. विशेष म्हणजे परिवहनच्या अर्थसकंल्पात हा ठराव घुसवूनन त्याला मंजुरी घेतल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केला होता.नरेश म्हस्के यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या सूचनेनुसार ही करवाढ १० टक्के करावी असे सूचित करण्यात आले होते. परंतु, ठाणेकरांवर करवाढीचा बोजा हवाच कशाला असे सडेतोड मत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही व्यक्त केले होते.विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी करवाढीचे दोन्ही ठराव रद्द करण्यासंदर्भातील नवा ठराव मांडला. त्याला भाजपाने अनुमोदनदेखील दिले होते. तसेच महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही या ठरावाला अनुकुलता दर्शवून करवाठ कमी करावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते.प्रशासनाने १० टक्के नव्हे तर १५ टक्के करवाढीचा ठराव कायम ठेवून, यावर्षी त्यानुसारच ठाणेकरांना बिले पाठवली.सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव गुंडाळलाप्रशासनाने मालमत्ताकराच्या जललाभ कर, मल:निसारण कर, मल:निसारण लाभ कर आणि रस्ता करांमध्ये १९ टक्यांची कपात केली होती.त्यानुसार ती ३४ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा आपला निर्णय प्रशासनाने कायम ठेवला असून सत्ताधाºयांचा १० टक्के कारवाढीचा प्रस्ताव बासनात गुंडाळला असल्याचे बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे