शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

१५ टक्के मालमत्ताकरवाढीची तलवार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 23:31 IST

१० टक्के दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडून बासनात; शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केल्याचा विरोधकांचा आरोप

ठाणे : मालमत्ताकरामध्ये ३४ टक्के केलेली करवाढ ही १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा सत्ताधारी शिवसेनेने केली होती. परंतु, प्रशासनाने तिला केराची टोपली दाखवून ठाणे खाडीत बुडविल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण प्रशासनाने १० टक्के नाही तर आपला १५ टक्के करवाढीचा ठराव कायम ठेवून यावर्षी त्यानुसारच ठाणेकरांना बिले पाठवली असल्याचे बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले. प्रशासनाच्या या भूमिकेचे खापर मात्र सत्ताधारी शिवसेनेवर फुटले असून शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.मालमत्ताकरामध्ये ३४ टक्के करवाढ करण्याच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला विरोध करून तो रद्दच करण्याचा ठराव शिवसेनेने महासभेत केला होता. पालिका आयुक्तांनी मात्र त्याला केराची टोपली दाखवून करवाढीचा प्रस्ताव रद्द न करता ती ३४ टक्क्यांहून १५ टाक्यांवर आणली होती.पाण्याच्या मुद्यावरून बुधवारी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला. शिवसेनेने जर ३४ टक्के करवाढीचा ठराव रद्द करून तो १० टक्के केला होता, तर मग यावर्षी ठाणेकरांना १५ टक्के कारवाढीने बिले कशी आली असे सांगून त्यांनी शिवसेनेची चांगलीच गोची केली. मात्र, प्रशासनाने १५ टक्के करवाढीचा ठरावच असल्याचे स्पष्ट करून त्यानुसार ही बिले पाठविल्याचे स्पष्ट केले. यावर मुल्ला यांनी १५ टक्यांचा ठराव जर सभागृहात झाला असेल तर त्याची प्रत किंवा इतिवृत्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जर प्रशासनाने ही माहिती दिली नाही तर मग ठराव झाला कुठे असा प्रश्नही त्यांनी केला.सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रशासनाच्या ३४ टक्के करवाढीच्या विरोधात प्रस्तावाची सूचना मांडली होती. परंतु, प्रत्यक्षात हा ठरावच झाला नसल्याचे मत विरोधकांनी त्यावेळच्या महासभेत मांडले होते. विशेष म्हणजे परिवहनच्या अर्थसकंल्पात हा ठराव घुसवूनन त्याला मंजुरी घेतल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केला होता.नरेश म्हस्के यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या सूचनेनुसार ही करवाढ १० टक्के करावी असे सूचित करण्यात आले होते. परंतु, ठाणेकरांवर करवाढीचा बोजा हवाच कशाला असे सडेतोड मत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही व्यक्त केले होते.विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी करवाढीचे दोन्ही ठराव रद्द करण्यासंदर्भातील नवा ठराव मांडला. त्याला भाजपाने अनुमोदनदेखील दिले होते. तसेच महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही या ठरावाला अनुकुलता दर्शवून करवाठ कमी करावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते.प्रशासनाने १० टक्के नव्हे तर १५ टक्के करवाढीचा ठराव कायम ठेवून, यावर्षी त्यानुसारच ठाणेकरांना बिले पाठवली.सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव गुंडाळलाप्रशासनाने मालमत्ताकराच्या जललाभ कर, मल:निसारण कर, मल:निसारण लाभ कर आणि रस्ता करांमध्ये १९ टक्यांची कपात केली होती.त्यानुसार ती ३४ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा आपला निर्णय प्रशासनाने कायम ठेवला असून सत्ताधाºयांचा १० टक्के कारवाढीचा प्रस्ताव बासनात गुंडाळला असल्याचे बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे