शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

१४ एप्रिल २०१८ पर्यंत डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणार?, केडीएमसीच्या उपअभियंत्यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:10 IST

 प्रशिक सामाजिक संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवली शहरात का लावला जात नाही? ही मागणी करत केडीएमसीच्या उपविभागीय इमारतीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला.

डोंबिवली-  प्रशिक सामाजिक संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा डोंबिवली शहरात का लावला जात नाही? ही मागणी करत केडीएमसीच्या उपविभागीय इमारतीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. त्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांचे निवदेन मोर्चेक-यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत १४ एप्रिल २०१८ पर्यंत बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येइल असे आश्वासन त्यांनी दिले.

'बाबासाहब के सन्मान मे फिर से मैदान मे' या घोषवाक्याखाली निषेध मोर्चा काढण्यात आला होता. डॉ. आंबेडकरांचा प्रश्न आला की तो सहजासहजी सुटत नाही, त्यासाठी आंदोलनं का करावी लागतात, असा सवाल यावेळी करण्यात आला. महापालिकेत ठराव संमत होऊनही अनेक वर्षांपासून डोंबिवली शहरात या प्रस्तावाची अंमलबजावणी का केली जात नाही? असा सवाल संतप्त मोर्चेक-यांनी केला. महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधा-यांची ही नामुष्की असून ती खंत व्यक्त करण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आल्याचे उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष मिलिंद साळवे यांनी सांगितले. याच मागणीसाठी ३१ ऑगस्ट २०१५ मध्ये याच ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत तातडीने स्थायीच्या सभेत या मागणीसाठी निधी मंजूर केला होता, तो निधी गेला कुठे? त्याचे पुढे काय झाले हे कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले. तेव्हापासून संस्थेचे शिष्ठमंडळ वेळोवेळी महापालिका अधिका-यांच्या भेटी घेत आहे, पण त्यासंदर्भात कोणीही काहीही बोलत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, युवक आघाडी, झोपडपट्टी, आणि रिपब्लिकन सेना आदींनी पाठींबा दर्शवला. या आंदोलनाला शहरातील आंबडेकरी अनुयायांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.