शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

टंचाईग्रस्त १९५ गावांच्या १३३ पाणीयोजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 03:59 IST

ग्रामीणसाठी १७१ कोटी : मंत्र्यांची माहिती

ठाणे : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला केंद्र शासनाने दिलेली स्थगिती तब्बल १३ वर्षांनी उठवल्याने ठाणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे यावर्षी या योजनेंतर्गत १९५ गावांसाठी १३३ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी एकूण १७१ कोटी २३ लक्ष इतका निधी मंजूर केल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २००५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील दोन वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ताबाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकारचे निर्देश होते. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये खूप कमी योजना राज्यामध्ये मंजूर केल्या होत्या. ही स्थगिती उठवण्यासाठी लोणीकर यांनी सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून ३ डिसेंबर २०१७ रोजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांची दिल्लीत भेट घेऊन बंदी उठवण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी देऊन त्यानुसार आराखडा तयार केला. या आराखड्यात विधिमंडळ सदस्य, सरपंच यांनी सुचवलेल्या योजनांना समाविष्ट करून यावर्षी जिल्ह्यातील १९५ वाड्या/वस्त्यांसाठी १३३ योजनांचा समावेशक असा आराखडा तयार केला. याकरिता, एकूण ८५ कोटी ४५ लक्ष रु पये एवढा खर्च होणार आहे. यामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी हा मोठा आराखडा मंजूर केलेला आहे. यामध्ये मागील व चालू असलेल्या योजनांसाठी ४३ कोटी ७४ लाख रु पयांची तरतूद केली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा २१५ गावे/वाड्यांसाठी १४२ योजनांसाठी एकूण १२९ कोटी १९ लाख रु पयांचा आराखडा अंतिमत: मान्य केलेला आहे.मुख्यमंत्री पेयजल योजनेतूनही १० योजनायाअगोदर ठाणे जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून २९ गावांसाठी १० योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी ४१ कोटी १४ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यामध्ये सर्व गावे हगणदारीमुक्त झाल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीतजास्त गावांचा समावेश या योजनेच्या आराखड्यात केला आहे. 

टॅग्स :WaterपाणीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका