शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

१३२० बालकांचे आरटीईचे प्रवेश पालकांनी नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:17 IST

या सोडतीमध्ये निवड होऊनही बहुतांशी बालकांचे प्रवेश संबंधित पालकांनी विविध कारणांमुळे दिलेल्या शाळा नाकारल्या आहेत.

ठाणे : शिक्षणाचा हक्क या कायद्याखालील २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेशासाठी दुसऱ्या राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ बालकांची निवड झाली. मात्र, यातील एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित एक हजार ३२० बालकांचेप्रवेश घेण्यासाठी संबंधित पालक दिलेल्या शाळांकडे फिरकलेच नसल्याने त्यांनी शालेय प्रवेश घेणे टाळल्याचे अहवालावरूनउघड झाले आहे. शुक्रवारी तिसºया राउंडच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सोडत काढून प्रवेशासाठी निवड केली जाणार आहेया २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेश ६५२ शाळांमध्ये घेतले जात आहेत. यासाठी दुसºया राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची सोडत काढून निवड करण्यात आली.यापैकी एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळेत घेण्यात आले. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील १५२ विद्यार्थ्यांसह भिवंडी शहरातील ८३, भिवंडी ग्रामीणमधील ३६, कल्याण ग्रामीणचे १३५, केडीएमसी शहरातील १४६, मीरा-भार्इंदरमधील १५, मुरबाडचे आठ, नवी मुंबईतील ३८८, शहापूरचे ५२, ठाणे मनपा २६२ आणि उल्हासनगर शहरातील ३७ विद्यार्थ्यांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत.ही आहेत पालकांच्या नकाराची कारणेया सोडतीमध्ये निवड होऊनही बहुतांशी बालकांचे प्रवेश संबंधित पालकांनी विविध कारणांमुळे दिलेल्या शाळा नाकारल्या आहेत. यामध्ये लांब असलेली शाळा नाकारण्यासह कागदपत्रांचा अभाव, त्यातील त्रुटी, भविष्यात येणारा शालेय खर्च भरण्याची भीती, दरमहा बसभाडे भरण्याची क्षमता नसणे आदी कारणांमध्ये बहुतांशी पालकांनी बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेणे नाकारल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नवी मुंबईतील सर्वाधिक ४४१ बालकांचे प्रवेश पालकांनी नाकारले आहे. याखालोखाल ठाणे मनपा-२ क्षेत्रातील २१८, तर सर्वाधिक कमी मुरबाड तालुक्यात चार बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळांमध्ये घेण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा