शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

१३२० बालकांचे आरटीईचे प्रवेश पालकांनी नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:17 IST

या सोडतीमध्ये निवड होऊनही बहुतांशी बालकांचे प्रवेश संबंधित पालकांनी विविध कारणांमुळे दिलेल्या शाळा नाकारल्या आहेत.

ठाणे : शिक्षणाचा हक्क या कायद्याखालील २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेशासाठी दुसऱ्या राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ बालकांची निवड झाली. मात्र, यातील एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित एक हजार ३२० बालकांचेप्रवेश घेण्यासाठी संबंधित पालक दिलेल्या शाळांकडे फिरकलेच नसल्याने त्यांनी शालेय प्रवेश घेणे टाळल्याचे अहवालावरूनउघड झाले आहे. शुक्रवारी तिसºया राउंडच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सोडत काढून प्रवेशासाठी निवड केली जाणार आहेया २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेश ६५२ शाळांमध्ये घेतले जात आहेत. यासाठी दुसºया राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची सोडत काढून निवड करण्यात आली.यापैकी एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळेत घेण्यात आले. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील १५२ विद्यार्थ्यांसह भिवंडी शहरातील ८३, भिवंडी ग्रामीणमधील ३६, कल्याण ग्रामीणचे १३५, केडीएमसी शहरातील १४६, मीरा-भार्इंदरमधील १५, मुरबाडचे आठ, नवी मुंबईतील ३८८, शहापूरचे ५२, ठाणे मनपा २६२ आणि उल्हासनगर शहरातील ३७ विद्यार्थ्यांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत.ही आहेत पालकांच्या नकाराची कारणेया सोडतीमध्ये निवड होऊनही बहुतांशी बालकांचे प्रवेश संबंधित पालकांनी विविध कारणांमुळे दिलेल्या शाळा नाकारल्या आहेत. यामध्ये लांब असलेली शाळा नाकारण्यासह कागदपत्रांचा अभाव, त्यातील त्रुटी, भविष्यात येणारा शालेय खर्च भरण्याची भीती, दरमहा बसभाडे भरण्याची क्षमता नसणे आदी कारणांमध्ये बहुतांशी पालकांनी बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेणे नाकारल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नवी मुंबईतील सर्वाधिक ४४१ बालकांचे प्रवेश पालकांनी नाकारले आहे. याखालोखाल ठाणे मनपा-२ क्षेत्रातील २१८, तर सर्वाधिक कमी मुरबाड तालुक्यात चार बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळांमध्ये घेण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा