शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

भिवंडी पालिका क्षेत्रात १३११ इमारती धोकादायक; शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला

By नितीन पंडित | Updated: June 10, 2024 16:39 IST

अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.

भिवंडी: शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला धोकादायक व अति धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शहरात १३११ इमारती धोकादायक व अति धोकादायक असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.यात सुमारे ३ हजार कुटुंबातील १५ हजार नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.

          भिवंडीतील इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आता पर्यंत ९० हुन अधिक बळी गेले आहेत.त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक व अती धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश असताना लोकसभा निवडणूक कामात अनेक पालिका कर्मचारी दोन महिने व्यस्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले होते.भिवंडी पालिका क्षेत्रातील पाच प्रभाग समिती अंतर्गत १३११ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. ज्यामध्ये २८७ इमारती अती धोकादायक आहेत.यामध्ये इमारतींसह कौलारू घरे,यंत्रमाग कारखाना यांचा समावेश आहे. 

          प्रभाग समिती क्रमांक एक अंर्तगत १२५ धोकादायक इमारती आहेत ज्यामध्ये अती धोकादायक सी १ श्रेणीतील इमारतींची संख्या ३२ आहे.तर इमारत निर्मनुष्य करून दुरुस्ती करण्याच्या सी २ ए श्रेणीत १७,इमारती मध्ये राहून दुरुस्ती करण्याच्या सी २ बी  श्रेणीत ६६ तर किरकोळ डागडुजी करण्यालायक सी ३ श्रेणीत १० इमारतींचा समावेश आहे .प्रभाग समिती क्रमांक दोन अंर्तगत ३१० इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत .ज्यामध्ये सी १ च्या श्रेणीत ४१ इमारती,सी २ ए श्रेणीत १९५,सी २ बी श्रेणीत ७० तर सी ३ श्रेणीत ४ इमारतींचा समावेश आहे.         प्रभाग समिती क्रमांक तीन अंर्तगत २३४ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.या मध्ये सी १ श्रेणीत ६०,सी २ ए श्रेणीत ४२,सी २ बी श्रेणीत ९९ तर सी ३ श्रेणीत ३३ इमारतींचा समावेश आहे.प्रभाग समिती क्रमांक चार अंर्तगत २८४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.सी १ श्रेणीत  ८४ इमारती,सी २ ए श्रेणीत १९९,सी २ बी प्रणित ८९ तर सी ३ श्रेणीत १ इमारतींचा समावेश आहे.तर प्रभाग समिती क्रमांक पांच अंर्तगत सर्वाधिक ३५८ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.यामध्ये सी १ श्रेणीत ८० इमारती असून सी २ ए श्रेणीत ११८,सी २ बी श्रेणीत १५८ व सी ३ श्रेणीत २ इमारतींचा समावेश आहे.          अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.यातील अनेक इमारती अनधिकृत पद्धतीने उभ्या राहिल्या असतानाच जमीन मालक व पगडी पद्धतीने फ्लॅट्स घेतलेले कुटुंबीय यांच्या वादात असंख्य इमारती निर्मनुष्य करण्यात अडचणी येत आहेत.धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज असून संभाव्य दुर्घटना होण्याच्या भीतीने अनेक धोकादायक इमारती खाली करण्यासाठी संबंधित कुटुंबीयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.तर अनेक धोकादायक इमारती निर्मनुष्य करण्यात आल्या असून अशा इमारतींचा वापर होऊ नये यासाठी  तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.तर धोकादायक व अती धोकादायक इमारतींच्या दर्शनी भागावर सदर इमारत धोकादायक असल्या बाबतचे बोर्ड लावण्यात आले आहेत अशी माहिती पालिका प्रशासना कडून देण्यात आली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी