शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भिवंडी पालिका क्षेत्रात १३११ इमारती धोकादायक; शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला

By नितीन पंडित | Updated: June 10, 2024 16:39 IST

अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.

भिवंडी: शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला धोकादायक व अति धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शहरात १३११ इमारती धोकादायक व अति धोकादायक असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.यात सुमारे ३ हजार कुटुंबातील १५ हजार नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.

          भिवंडीतील इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आता पर्यंत ९० हुन अधिक बळी गेले आहेत.त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक व अती धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश असताना लोकसभा निवडणूक कामात अनेक पालिका कर्मचारी दोन महिने व्यस्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले होते.भिवंडी पालिका क्षेत्रातील पाच प्रभाग समिती अंतर्गत १३११ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. ज्यामध्ये २८७ इमारती अती धोकादायक आहेत.यामध्ये इमारतींसह कौलारू घरे,यंत्रमाग कारखाना यांचा समावेश आहे. 

          प्रभाग समिती क्रमांक एक अंर्तगत १२५ धोकादायक इमारती आहेत ज्यामध्ये अती धोकादायक सी १ श्रेणीतील इमारतींची संख्या ३२ आहे.तर इमारत निर्मनुष्य करून दुरुस्ती करण्याच्या सी २ ए श्रेणीत १७,इमारती मध्ये राहून दुरुस्ती करण्याच्या सी २ बी  श्रेणीत ६६ तर किरकोळ डागडुजी करण्यालायक सी ३ श्रेणीत १० इमारतींचा समावेश आहे .प्रभाग समिती क्रमांक दोन अंर्तगत ३१० इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत .ज्यामध्ये सी १ च्या श्रेणीत ४१ इमारती,सी २ ए श्रेणीत १९५,सी २ बी श्रेणीत ७० तर सी ३ श्रेणीत ४ इमारतींचा समावेश आहे.         प्रभाग समिती क्रमांक तीन अंर्तगत २३४ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.या मध्ये सी १ श्रेणीत ६०,सी २ ए श्रेणीत ४२,सी २ बी श्रेणीत ९९ तर सी ३ श्रेणीत ३३ इमारतींचा समावेश आहे.प्रभाग समिती क्रमांक चार अंर्तगत २८४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.सी १ श्रेणीत  ८४ इमारती,सी २ ए श्रेणीत १९९,सी २ बी प्रणित ८९ तर सी ३ श्रेणीत १ इमारतींचा समावेश आहे.तर प्रभाग समिती क्रमांक पांच अंर्तगत सर्वाधिक ३५८ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.यामध्ये सी १ श्रेणीत ८० इमारती असून सी २ ए श्रेणीत ११८,सी २ बी श्रेणीत १५८ व सी ३ श्रेणीत २ इमारतींचा समावेश आहे.          अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.यातील अनेक इमारती अनधिकृत पद्धतीने उभ्या राहिल्या असतानाच जमीन मालक व पगडी पद्धतीने फ्लॅट्स घेतलेले कुटुंबीय यांच्या वादात असंख्य इमारती निर्मनुष्य करण्यात अडचणी येत आहेत.धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज असून संभाव्य दुर्घटना होण्याच्या भीतीने अनेक धोकादायक इमारती खाली करण्यासाठी संबंधित कुटुंबीयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.तर अनेक धोकादायक इमारती निर्मनुष्य करण्यात आल्या असून अशा इमारतींचा वापर होऊ नये यासाठी  तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.तर धोकादायक व अती धोकादायक इमारतींच्या दर्शनी भागावर सदर इमारत धोकादायक असल्या बाबतचे बोर्ड लावण्यात आले आहेत अशी माहिती पालिका प्रशासना कडून देण्यात आली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी