शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कॉरिडोरमध्ये १२८ गावे, भूसंपादन प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:47 IST

ठाण्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून जाणाऱ्या विरार-अलिबाग बहुउपयुक्त महामार्गाच्या (मल्टिमोडल कॉरिडोर) ‘नवघर ते चिरनेर’ या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी एक कोटी ८५ लाख १५ हजार ५७१ चौरसमीटर जागेच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : ठाण्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून जाणाऱ्या विरार-अलिबाग बहुउपयुक्त महामार्गाच्या (मल्टिमोडल कॉरिडोर) ‘नवघर ते चिरनेर’ या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी एक कोटी ८५ लाख १५ हजार ५७१ चौरसमीटर जागेच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबतची जनसुनावणी शुक्रवारी डोंबिवलीत झाली.जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, बहुउपयुक्त महामार्गांचे जाळे ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पसरणार आहे. त्यासाठी शेतजमिनीसह वनखाते, शासन आदींच्या जमिनीचे संपादन सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील जमिनीसाठी ठाणे जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी शुक्रवारी डोंबिवली येथील वरदसिद्धिविनायक सेवा भवनमध्ये जनसुनावणी घेतली.या बहुउपयुक्त महामार्गांसाठी संपादित होणाºया जमिनीपैकी ठाणे जिल्ह्यातील २७ गावांच्या शेतकºयांची ३२ लाख ५३ हजार ३९८.१३ चौ.मी. शेतजमीन बाधित होणार आहे. यामध्ये भिवंडी तालुक्याच्या १३ गावांतील शेतकºयांची २० लाख २६ हजार ५१७.४६ चौ.मी. शेतजमिनीससह ठाणेच्या एका गावातील शेतकºयांची ३२ हजार ९६६.८७ चौ.मी. शेतजमीन, कल्याणच्या आठ गावांमधील ७ लाख ०२ हजार ६४०.४९ चौ.मी. आणि अंबरनाथच्या पाच गावांतील शेतकºयांची ४लाख ९१ हजार २७३.३१ चौ.मी. खाजगी शेतजमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. याशिवाय, शासकीय तीन लाख ५६ हजार ५३०.५३ चौ.मी., मिठागराची सुमारे १३ हजार ३५१.८६ चौ.मी. आणि रेल्वे व इतर विभागांची एक हजार ४८१.२२ चौ.मी. जागेचे संपादन हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील वनविभागाची जमीन मात्र बाधित होत नसल्याची माहिती आहे.याशिवाय, पालघर जिल्ह्यातील वसई येथील सात गावांमधील शेतकºयांची २ लाख ५६ हजार २८३.४९ चौ.मी. शेतजमीन, शासकीय ४० हजार ४१४.५६ चौ.मी., वनविभागाची ९७ हजार ५२३.०७ चौ.मी., मिठागरांची २ हजार ७७२.३५ चौ.मी. आणि रेल्वेसह इतर विभागांची ६ हजार ३९४.१७ चौ.मी. जमीन बाधित होत आहे.रायगड जिल्ह्यातील पनवेलची ४३ गावे, उरणची ११ गावे, पेणची २१ आणि अलिबागची १९ आदी ९४ गावांतील शेतकºयांची ७६लाख १८ हजार २७१.५१ चौ.मी. शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे. या जिल्ह्यातील शासकीय मालकीची १०लाख १४ हजार १६२.३७ चौ.मी., वनविभागाची ५ लाख ६८ हजार २४६.७७ चौ.मी., मिठागरांची ३५ हजार ३४७.०७ चौ.मी. आणि रेल्वेसह अन्य विभागांच्या मालकीची २१ हजार ७५८ चौ.मी. जमीन संपादित करण्याचे काम सुरू झाले आहे.जेएनपीटी बंदराला होणार फायदाविरार ते अलिबाग या कॉरिडोअरमुळे पालघर-ठाणे-रायगड तिन्ही जिल्हे जवळ येणार असून याचा सर्वाधिक फायदा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटी बंदराला होणार आहे. येथील कंटेनर वाहतूक शीघ्रगतीने यामुळे पश्चिम किनारपट्टीसह ठाणे आणि भिवंडीतील गोदामपट्ट्यात आणणे सोपे होणार आहे.मेट्रोही धावणारया मार्गालगत मेट्रोचे नियोजन असून त्यासाठी ३२ स्थानके प्रस्तावित आहेत. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल,पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत. यामुळे विरार ते अलिबाग हे प्रवासाचे अंतर निम्म्याने कमी होणार आहे.प्रकल्पाचा खर्च दुप्पटएमएमआरडीएने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला, तेव्हा तो १२९७५ कोटी रुपयांचा होता. यात पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर हा ७९ किमीचा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित असून त्यावर ९३२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर, दुसºया टप्प्यातील चिरनेर ते अलिबाग ४७ किमी मार्गाच्या बांधणीसाठी ३६४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. परंतु, आता विहित मुदतीत या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने त्याचा खर्च २२,३०० कोटींवर गेला असून त्याकरिता एमएमआरडीएने जागतिक बँकेकडे निधीची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या