शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संजय गांधी निराधार योजनेचे १२,३९९ लाभार्थी , सर्वाधिक समावेश महिलांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:44 IST

समाजातील वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त, निराधार अशा १३ प्रवर्गांतील नागरिकांना लाभ दिला जातो

ठाणे : समाजातील वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त, निराधार अशा १३ प्रवर्गांतील नागरिकांना लाभ दिला जातो. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात सुमारे १२ हजार ४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या अंबरनाथ तालुक्यात आहे. लाभार्थ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.निराधारांना आधार मिळावा, यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. या योजनेत समाजातील निराधार, विधवा, देवदासी, तृतीयपंथीय, अपंग, अनाथ, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, घटस्फोटित, ज्यांचे पती तुरु ंगात शिक्षा भोगत आहेत, अशा महिला, ३५ वर्षांवरील अविवाहित महिला, दुर्धर आजारी, एचआयव्हीग्रस्त अशा १३ वर्गांना या योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, एका लाभार्थ्याला ६०० रु पये अनुदान देण्यात येते. ही योजना, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत असून सध्या तिचे जिल्ह्यात १२ हजार ३९९ लाभार्थी आहेत. यामध्ये सर्वात कमी लाभार्थी मुरबाड तालुक्यात असून सर्वाधिक लाभार्थी अंबरनाथ तालुक्यात आहेत.शहरी भागात प्रमाण अधिकया योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक असल्याचे दिसते. यामध्ये उल्हासनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लाभार्थी जास्त आहेत. तर, भिवंडी महापालिकेपेक्षा ग्रामीण भागात लाभार्थी अधिक आहेत. मुरबाड आणि शहापूर या ग्रामीण भागांत अवघे एक हजार ६८६ लाभार्थी आहेत.जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा तक्तातालुक्याचे नाव लाभार्थीठाणे ग्रामीण ६२८ठाणे मनपा १२५६कल्याण ग्रामीण ३४३कल्याण मनपा १३४२अंबरनाथ ग्रामीण ४७४अंबरनाथ नपा २३१४भिवंडी ग्रामीण १४३०भिवंडी मनपा ८४२शहापूर १०४७मुरबाड ६३९उल्हासनगर २०८४एकूण १२३९९

टॅग्स :thaneठाणे