शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

संजय गांधी निराधार योजनेचे १२,३९९ लाभार्थी , सर्वाधिक समावेश महिलांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:44 IST

समाजातील वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त, निराधार अशा १३ प्रवर्गांतील नागरिकांना लाभ दिला जातो

ठाणे : समाजातील वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त, निराधार अशा १३ प्रवर्गांतील नागरिकांना लाभ दिला जातो. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात सुमारे १२ हजार ४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या अंबरनाथ तालुक्यात आहे. लाभार्थ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.निराधारांना आधार मिळावा, यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. या योजनेत समाजातील निराधार, विधवा, देवदासी, तृतीयपंथीय, अपंग, अनाथ, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, घटस्फोटित, ज्यांचे पती तुरु ंगात शिक्षा भोगत आहेत, अशा महिला, ३५ वर्षांवरील अविवाहित महिला, दुर्धर आजारी, एचआयव्हीग्रस्त अशा १३ वर्गांना या योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, एका लाभार्थ्याला ६०० रु पये अनुदान देण्यात येते. ही योजना, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबवण्यात येत असून सध्या तिचे जिल्ह्यात १२ हजार ३९९ लाभार्थी आहेत. यामध्ये सर्वात कमी लाभार्थी मुरबाड तालुक्यात असून सर्वाधिक लाभार्थी अंबरनाथ तालुक्यात आहेत.शहरी भागात प्रमाण अधिकया योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक असल्याचे दिसते. यामध्ये उल्हासनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लाभार्थी जास्त आहेत. तर, भिवंडी महापालिकेपेक्षा ग्रामीण भागात लाभार्थी अधिक आहेत. मुरबाड आणि शहापूर या ग्रामीण भागांत अवघे एक हजार ६८६ लाभार्थी आहेत.जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा तक्तातालुक्याचे नाव लाभार्थीठाणे ग्रामीण ६२८ठाणे मनपा १२५६कल्याण ग्रामीण ३४३कल्याण मनपा १३४२अंबरनाथ ग्रामीण ४७४अंबरनाथ नपा २३१४भिवंडी ग्रामीण १४३०भिवंडी मनपा ८४२शहापूर १०४७मुरबाड ६३९उल्हासनगर २०८४एकूण १२३९९

टॅग्स :thaneठाणे