शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2025 09:46 IST

जितेंद्र कालेकर - ठाणे :  पोलिस तपासातील त्रुटींमुळे तीन वर्षे नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि तिच्या हत्येच्या गुन्ह्यातील ...

जितेंद्र कालेकर -

ठाणे :  पोलिस तपासातील त्रुटींमुळे तीन वर्षे नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि तिच्या हत्येच्या गुन्ह्यातील रामकिरत गौड या सुरक्षारक्षकाला झालेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. गेली १२ वर्षे तो तुरुंगात खितपत होता. रामकिरत निर्दोष ठरल्याने त्याच्या आयुष्यातील या १२ वर्षांची भरपाई कोण आणि कशी करणार? अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपामुळे रामकिरतपासून त्याची पत्नी, मुलगी दुरावली असेल. 

कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झाले असेल. त्याच्या संसाराची विस्कटलेली घडी कोण बसवून देणार? तुरुंगात कुप्रसिद्ध गुंडांसोबत त्याला राहावे लागले. त्याच्यावर हल्ले, अत्याचार झाले असतील. त्या जखमा कशा भरणार? रामकिरत हा वॉचमन असल्याने त्याने हे सर्व सोसलेच पाहिजे का? समजा, त्याच्या जागी कुणा बड्या नेत्याचा, बिल्डर-उद्योगपतीचा किंवा अभिनेत्याचा मुलगा असता तर ठाणे पोलिसांनी याच बेफिकिरीने तपास करून त्याला तुरुंगात डांबले असते का? याचा जाब ठाणे पोलिसांनी दिलाच पाहिजे.

ठाण्यातील वाघबीळ गावात ३० सप्टेंबर २०१३ राेजी घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. दाेनच दिवसांनी घराजवळील पाण्याच्या डबक्यात तिचा मृतदेह आढळला. यामध्ये रामकिरतला अटक झाली. तेव्हापासून ताे तुरुंगातच हाेता. 

कासारवडवली पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध खटलाही दाखल केला.  त्याला ८ मार्च २०१९ राेजी फाशीची शिक्षा सुनावली. याच शिक्षेवर २५ नाेव्हेंबर २०२१ राेजी उच्च न्यायालयानेही शिक्कामाेर्तब केले. 

आराेपीच्या चपलेला लागलेला  चिखल आणि मुलीचा मृतदेह सापडलेल्या डबक्यातील चिखल यांच्यातील साधर्म्य आणि आराेपीने त्याच्या मुकादमाकडे दिलेली कबुली तसेच पीडितेसाेबत आराेपीला तीन साक्षीदारांनी पाहिल्याची साक्ष हे खालच्या दाेन्ही न्यायालयांनी गुन्हा सिद्धी व शिक्षेसाठी ग्राह्य धरलेले पुरावे सर्वोच्च न्यायालयाने तकलादू आणि अविश्वसनीय ठरवले.

पोलिसांकडून सखोल तपास गरजेचाकाही पाेक्साे गुन्ह्यांत आराेपी न मिळाल्याने भलताच आराेपी पकडला जाताे. सरकार, नागरिकांचे पाेलिसांवर अशा गुन्ह्यामध्ये प्रचंड दबाव असताे. त्यामुळे निर्दोष आराेपीला पकडले जाण्याची अनेकदा शक्यता असते. पाेलिसांनी सखाेल तपास करणे आवश्यक आहे. ॲड. सुनील रवाणे, ठाणे.

पोक्सो प्रकरणातील दबावापोटी कारवाईबलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात दीर्घकाळ आरोपी सापडला नाही तर जनक्षोभ वाढतो. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणात झटपट आरोपीच्या मुसक्या आवळल्या, हे दाखवून देण्यासाठी पोलिस घिसाडघाईने कारवाई करतात, हेच या प्रकरणात अधोरेखित झाले.

 रामकिरत निर्दोष असेल तर याचा अर्थ त्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा खरा आरोपी मोकाट आहे. १२ वर्षे खरा आरोपी पोलिसांनी शोधला नाही हे दुर्दैवी आहे. गोरगरीब व्यक्तीला थर्ड डिग्री दाखवून पोलिस अनेकदा गुन्हे कबूल करायला लावतात. मात्र न्यायालयात पोलिसांचे हे ढोंग टिकत नाही. त्याचाच हा पुरावा.  

पाेक्साेसारख्या गुन्ह्यात आराेपीला पकडण्यासाठी पाेलिसांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे घाईतच एखाद्या निरपराधालाही अटक हाेते. या प्रकरणात आराेपीला नुकसानभरपाई मिळणेही अपेक्षित असल्याचे मत काही वकिलांनी व्यक्त केले.  

अन्य प्रकरणांतही दोषसिद्धीत अपयश ठाणे पोलिसांची बेअब्रू होण्याचे हे एकमेव प्रकरण नाही. वागळे इस्टेट परिसरातील ४० वर्षे जुन्या सोन्या-चांदीच्या पेढीच्या मालकिणीने पेढीतील तीन तरुण कारागिरांवर २०१८ मध्ये वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला हाेता. यात ठाणे न्यायालयाने दिवाकर साठ (२५) आणि संजीव मैती (२४) यांची अलीकडेच निर्दाेष मुक्तता केली. 

आपल्याच पाच महिन्यांचा मुलाचा खून केल्याच्या आराेपातून शांतीबाई चव्हाण या महिलेची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दोषसिद्धीतील अपयशाची ही प्रकरणे पोलिस तपासातील उणिवा स्पष्ट करतात.

टॅग्स :jailतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय