शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

ठाणेकरांसाठी ११९१ कोटींचे स्मार्ट सिटी प्रकल्प नवीन वर्षातील सहा महिन्यांत येणार पूर्णत्वास!

By सुरेश लोखंडे | Updated: December 31, 2022 19:00 IST

देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

ठाणे : देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून रस्त्यांसह, उद्याने, तलाव, पार्र्किं ग, वृक्ष, सीसीटीव्ही आदींव्दारे शहर सुशोभीकरणासह सर्व सोयीसुविधा युक्त करण्यासाठी १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातून अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाल्याचा अहवाल आहे. परंतु या नवीन वर्षातील आगामी सहा महिन्यात म्हणजे जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करणार, असा संकल्प ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त व स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ संदीप माळवी यांनी लोकमतला सांगितले.

 स्मार्ट सिटी मिशन हे केंद्र शासनाची योजना आहे. याव्दारे पंतप्रधानांनी जून २०१५ रोजी भारतातील एकूण १०० शहरांना स्मार्ट सिटीचा दर्जा दिला आहे. त्यात राज्यातील १० शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. ठाणे महापालिकने ठाणे स्मार्ट सिटी लि. या कंपनीची स्थापना करून त्याव्दारे विविध स्वरूपाचे १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमध्ये शहराच्या विकासात्मक कामांचा समावेश आहे. क्षेत्रधारीत विकास, पॅन सिटी सोल्युशन, ठाणे रेल्वे स्थानक परिसर,नौपाडा, पांचपाखाडी, खारकर आळी उथळसर आदी भागांमधील रस्ते, सोयी सुविधाचा समावेश आहे. याशिवाय त्यामध्ये मुख्यत्वे सॅटीस ठाणे (पू). वॉटरफ्रंट, मॅटल हॉस्पिटल नजीक नवीन रेल्वे स्टेशन, पायाभूत सुविधा, सौरऊर्जा छतांचा अंतर्भाव आहे. तर पॅन सिटी सोल्युशन मध्ये वायफाय, स्मार्ट मिटरींग, डिजी ठाणे, सीसीटीव्ही या प्रकल्पांच्या कामांचा समावेश या स्माट सिटीत केलेला आहे. यासाठी अंदाज एक हाजर १९१ कोटींचा खर्च निश्चित केला आहे.

             या हजार कोटींच्या खर्चातून आतापर्यंत अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यावर ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झालेला आहे. मात्र अजूनही तब्बल छोटेमोठे १४ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण या कामाला आधीच उशिर झालेला आहे. त्यामुळे नवीन वर्षातील जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस माळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाणेकरांना या नवीन वर्षात स्मार्ट सिटीच्या या सर्व प्रकल्पांच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी फक्त जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तत्पुर्वी बहुतांशी प्रकल्पही पूर्णत्वास आली आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत जरी या पाच कामांचा उल्लेख झालेला असला तरी सर्व प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी फक्त जूनपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे सुतोवाच मोळवी यांनी केले आहे.

या प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या एक हजार १९१ कोटींच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान आणि स्वत: ठाणे महापालिकेने तजविज केली आहे. यामध्ये केंद्राकडून ५०० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा आहे. त्यातून आतापर्यंत ३४३ कोटी प्राप्त झाले. तर राज्य शासनाकडून २५० कोटींची अपेक्षा असून त्यापैकी १७१ कोटी प्राप्त झाले आहेत. तर महापालिकेने स्वत: २०० कोटींची तजवीज आदी मिळून ७१४ कोटीं प्राप्त अनुदान आहे. यातून तब्बल ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झाल्याचे आढळून आले आहेत. हाती घेतलेल्या प्रकल्पातून बहुतांशी प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरट्यवर आहे. फक्त सॅटीसह नवीन रेल्वे स्टेशन हे दोन प्रकल्प रखडणार असल्याचे प्रतिपादन माळवी यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे