शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ठाणेकरांसाठी ११९१ कोटींचे स्मार्ट सिटी प्रकल्प नवीन वर्षातील सहा महिन्यांत येणार पूर्णत्वास!

By सुरेश लोखंडे | Updated: December 31, 2022 19:00 IST

देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

ठाणे : देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून रस्त्यांसह, उद्याने, तलाव, पार्र्किं ग, वृक्ष, सीसीटीव्ही आदींव्दारे शहर सुशोभीकरणासह सर्व सोयीसुविधा युक्त करण्यासाठी १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातून अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाल्याचा अहवाल आहे. परंतु या नवीन वर्षातील आगामी सहा महिन्यात म्हणजे जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करणार, असा संकल्प ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त व स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ संदीप माळवी यांनी लोकमतला सांगितले.

 स्मार्ट सिटी मिशन हे केंद्र शासनाची योजना आहे. याव्दारे पंतप्रधानांनी जून २०१५ रोजी भारतातील एकूण १०० शहरांना स्मार्ट सिटीचा दर्जा दिला आहे. त्यात राज्यातील १० शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये ठाणे शहराचा समावेश आहे. ठाणे महापालिकने ठाणे स्मार्ट सिटी लि. या कंपनीची स्थापना करून त्याव्दारे विविध स्वरूपाचे १९ प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमध्ये शहराच्या विकासात्मक कामांचा समावेश आहे. क्षेत्रधारीत विकास, पॅन सिटी सोल्युशन, ठाणे रेल्वे स्थानक परिसर,नौपाडा, पांचपाखाडी, खारकर आळी उथळसर आदी भागांमधील रस्ते, सोयी सुविधाचा समावेश आहे. याशिवाय त्यामध्ये मुख्यत्वे सॅटीस ठाणे (पू). वॉटरफ्रंट, मॅटल हॉस्पिटल नजीक नवीन रेल्वे स्टेशन, पायाभूत सुविधा, सौरऊर्जा छतांचा अंतर्भाव आहे. तर पॅन सिटी सोल्युशन मध्ये वायफाय, स्मार्ट मिटरींग, डिजी ठाणे, सीसीटीव्ही या प्रकल्पांच्या कामांचा समावेश या स्माट सिटीत केलेला आहे. यासाठी अंदाज एक हाजर १९१ कोटींचा खर्च निश्चित केला आहे.

             या हजार कोटींच्या खर्चातून आतापर्यंत अवघे पाच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यावर ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झालेला आहे. मात्र अजूनही तब्बल छोटेमोठे १४ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण या कामाला आधीच उशिर झालेला आहे. त्यामुळे नवीन वर्षातील जूनपर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस माळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाणेकरांना या नवीन वर्षात स्मार्ट सिटीच्या या सर्व प्रकल्पांच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी फक्त जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तत्पुर्वी बहुतांशी प्रकल्पही पूर्णत्वास आली आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत जरी या पाच कामांचा उल्लेख झालेला असला तरी सर्व प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी फक्त जूनपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे सुतोवाच मोळवी यांनी केले आहे.

या प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या एक हजार १९१ कोटींच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान आणि स्वत: ठाणे महापालिकेने तजविज केली आहे. यामध्ये केंद्राकडून ५०० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा आहे. त्यातून आतापर्यंत ३४३ कोटी प्राप्त झाले. तर राज्य शासनाकडून २५० कोटींची अपेक्षा असून त्यापैकी १७१ कोटी प्राप्त झाले आहेत. तर महापालिकेने स्वत: २०० कोटींची तजवीज आदी मिळून ७१४ कोटीं प्राप्त अनुदान आहे. यातून तब्बल ६२९ कोटी ९६ लाखांचा खर्च झाल्याचे आढळून आले आहेत. हाती घेतलेल्या प्रकल्पातून बहुतांशी प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरट्यवर आहे. फक्त सॅटीसह नवीन रेल्वे स्टेशन हे दोन प्रकल्प रखडणार असल्याचे प्रतिपादन माळवी यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे