शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्मार्ट सिटींचे 112 प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:04 IST

smart cities : गेल्या तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे महापालिकेने ११३ कोटी २३ लाख रुपयांचे २० प्रकल्प, तर सर्वात तळाला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार कोटी ६६ लाख रुपयांचे तीन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत.

- नारायण जाधवठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटीअंतर्गत महाराष्ट्रातील औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या आठ शहरांची चार फेऱ्यांमधून जानेवारी २०१६ ते जून २०१८ या काळात स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली. यात एकूण २३ हजार ३० काेटी रुपयांचे २८२ प्रकल्प मान्यतेसाठी धाडले. यापैकी ९ जुलै २०२१ पर्यंत राज्याचे तीन हजार ४७१ कोटी ३४ लाख १२८ रुपयांचे प्रकल्पच पूर्ण झाले आहेत. यासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत आपल्या हिश्श्याचा दोन हजार १२८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला असून, त्यातील या शहरांनी एक हजार ९२० कोटी ९२ लाख रुपये खर्च केले. अजूनही १३ हजार ४०२ कोटी ३९ लाख रुपयांचे ११२ प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे महापालिकेने ११३ कोटी २३ लाख रुपयांचे २० प्रकल्प, तर सर्वात तळाला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार कोटी ६६ लाख रुपयांचे तीन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. ठाणे महापालिकेच्या एकूण सहा हजार १०२ कोटी ४७ लाख रुपयांच्या ४१ प्रकल्पांपैकी पाच हजार ७५० कोटी रुपयांचे २०, तर कल्याण-डोंबविली महापालिकेचे एक हजार ५५५ कोटी १५ लाख रुपयांच्या १९ प्रकल्पांपैकी एक हजार तीनशे ९५ कोटी ४८ लाख रुपयांचे १३ प्रकल्प कार्यादेशाच्या प्रतीक्षेत आहेत, तर निविदा प्रक्रियेत ठाणे महापालिका २३९ कोटींचा एक, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे १५५ कोटींचे तीन प्रकल्प आहेत.

नागपूर पालिकेची बाजीस्मार्ट सिटीअंतर्गत राज्यात सर्वाधिक प्रकल्प नागपूर महापालिकेने ९९४ कोटी ४१ लाख रुपयांचे तीन प्रकल्प, तर पुणे महापालिकेने ८३७ कोटी ८५ लाख रुपयांचे २७ प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्याखालोखाल नाशिक महापालिका ६४९ कोटी २२ लाखांचे २६ प्रकल्प, औरंगाबाद महापालिका ४४१ कोटी ४७ लाखांचे १२ प्रकल्प, सोलापूर महापालिका ३२५ कोटी ८४ लाखांचे २८ प्रकल्प पूर्ण केले आहेत.

आठ महापालिकांची चिंता वाढलीऔरंगाबाद २८३ कोटींचे १० प्रकल्प, कल्याण-डोंबिवली महापालिका एक हजार तीनशे ९५ कोटी ४८ लाख रुपयांचे १३ प्रकल्प, ठाणे महापालिकेचे पाच हजार ७५० कोटी रुपयांचे २० प्रकल्प, नागपूर महापालिका दोन हजार ४२ कोटींचे चार प्रकल्प, नाशिक महापालिका २७४ कोटी ५० लाखांचे दोन प्रकल्प, पिंपरी-चिंचवड महापालिका ८३ कोटींचे दोन प्रकल्प, पुणे महापालिका दोन हजार १३९ काेटी ८२ लाखांचे १२ प्रकल्प, सोलापूर ९९६ कोटी पाच लाखांच्या १३ प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आधीच कोविडमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील या आठ महापालिकांना आता निविदा प्रक्रियेतील आणि कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेतील प्रकल्प कसे पूर्ण करायचे याची चिंता सतावू लागली आहे.

टॅग्स :thaneठाणे