शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू!

By सुरेश लोखंडे | Updated: February 10, 2024 19:00 IST

४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे.

ठाणे: जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे. त्यापैकी यंदा ११ ग्राम पंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यंचा कार्यकाळ संपणार आहे. तेथे मुदत पूर्व निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यास अनुसरून प्रभाग रचना आधीच झाली असता आता आरक्षण सोडत काढण्याचे काम जिल्ह्यातील संबंधीत तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींचीा जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपत आहे. त्यांच्या या निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेण्यास अनुसरून तेथे आधीच प्रभाग रचना निश्चित करण्यात आलेल्या असून आता संबंधीत उपविभागीय अधिाकारी आणि तहसीलदार यांच्या नियंत्रणात आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम कल्याण, भिवंडी, शहापूर, आणि मुरबाड तालुक्यातील या ११ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची ही पूर्व तयारी सुरू करण्यात आलेली आहे.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये कल्याणमधील चवरे-म्हसरुंडी, दहागाव, रोहण-अंताडे, पोई या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर भिवंडीमधील महापोली, अनगाव ग्राम पंचायती आहे. शहापूरच्या साकुली, सावरोली बुद्रक ग्रा.पं. आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातीलझाडघर, न्याहाडी, दहिगाव ग्राम पंचायतींसाठी सध्या आरक्षण सोडतचा कार्यक्रम जारी करण्यात आलेला आहे.

प्रभाग निहाय आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे नियोजनआदेश जारी झाल्याप्रमाणे विशेष ग्राम सभेची सुचना ७ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर ९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण सोडत काढण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. तर या आरक्षण सोडतच्या प्रारूप अधिसुचनेला ठाणे जिल्हाधिकारी १२ जानेवारीपर्यंत मान्यता देणार आहे. यानंतर १३ फेब्रुवारीला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद होईल. त्यावर हरकती व सुचाना १६ फेब्रुवारीपर्यंत घेतल्या जात आहे. त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय देऊन त्यास जिल्हाधिकारी यांनी २३ फेब्रुवारीपपर्यंत मान्यता देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेgram panchayatग्राम पंचायत