शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील  १०,९४७ विद्यार्थी नापास; गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त नापास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 08:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ८७,७४९ उत्तीर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ८७,७४९ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १०,९४७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. नापासांमध्ये कल्याण-डोंबिवली सर्वाधिक तर मुरबाड सर्वांत मागे आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त विद्यार्थी नापास झाले आहेत. 

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल मुरबाड भागाचा लागला आहे. नापास होण्यात मुरबाड सर्वांत मागे राहिला आहे. कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरामध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कल्याण ग्रामीण भागात १५४ विद्यार्थी, अंबरनाथमधून ६५२, भिवंडीमध्ये ४२०, मुरबाडमध्ये ६७, शहापूरमध्ये ३९५, ठाणे शहरात २०५९, नवी मुंबईत १६४०, भाईंदरमध्ये ६३६, कल्याण-डोंबिवलीमध्ये २७६०, उल्हासनगरमध्ये १२६४ तर भिवंडीमध्ये ९०० विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यात ४४८९६ उत्तीर्ण मुलांपैकी ६८९५ मुले, तर ४२८५३ मुलींपैकी ४०५२ मुली नापास झाल्या आहेत. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील ९५४२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ६९८९ विद्यार्थी नापास झाले.

नवी मुंबईचा निकाल घटलानवी मुंबई : बारावीत गेल्यावर्षीपेक्षा यंदा नवी मुंबईचा निकाल घटला. गेल्या वर्षी ९५.१६ टक्के असलेला निकाल यंदा ९०.६४ टक्क्यांवर आला. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली. ६० हून अधिक महाविद्यालयांतून १५,८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,७२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून १४,०८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ४० टक्के लागला आहे. 

पालघरमध्ये मोखाडा पुढे, तर डहाणू सर्वात मागे

पालघर : बारावीत पालघर जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला. उत्तीर्णांच्या टक्केवारीत मुलींनी (९२.५९ टक्के) मुलांवर (८९.२६ टक्के) बाजी मारल्याचे दिसून आले. सर्वाधिक निकाल मोखाडा तालुक्याचा (९४.७३ टक्के), तर सर्वांत कमी निकाल डहाणू तालुक्याचा (८५.१३ टक्के) लागला आहे. पालघर जिल्ह्यात २७,१९८ मुलांपैकी २४,२७७ उत्तीर्ण झाली असून २२,२५० मुलींपैकी २०,६०२ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.२६ टक्के असून, मुलींचे ९२.५९ टक्के आहे.

भाईंदरच्या विद्यार्थ्यांची बाजी

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर आदी क्षेत्रांतील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मुरबाडमधील ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुरबाडपाठोपाठ भाईंदर शहरातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या भागाचा निकाल ९१.४९ टक्के लागला.

रायगडचा झेंडा फडकला

अलिबाग : रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.५३ टक्के लागला आहे. यंदाही मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्यात ८९.५७ टक्के मुले, तर ९४.४८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. जिल्ह्याच्या निकालात तळा तालुका अव्वल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात जिल्ह्याची अडीच टक्क्यांनी घसरण झाली आहे. परीक्षेसाठी ३१ हजार ६४८ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. यापैकी ३१ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २८ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल