शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

ठाणे जिल्ह्यातील  १०,९४७ विद्यार्थी नापास; गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त नापास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 08:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ८७,७४९ उत्तीर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ८७,७४९ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १०,९४७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. नापासांमध्ये कल्याण-डोंबिवली सर्वाधिक तर मुरबाड सर्वांत मागे आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त विद्यार्थी नापास झाले आहेत. 

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल मुरबाड भागाचा लागला आहे. नापास होण्यात मुरबाड सर्वांत मागे राहिला आहे. कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरामध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कल्याण ग्रामीण भागात १५४ विद्यार्थी, अंबरनाथमधून ६५२, भिवंडीमध्ये ४२०, मुरबाडमध्ये ६७, शहापूरमध्ये ३९५, ठाणे शहरात २०५९, नवी मुंबईत १६४०, भाईंदरमध्ये ६३६, कल्याण-डोंबिवलीमध्ये २७६०, उल्हासनगरमध्ये १२६४ तर भिवंडीमध्ये ९०० विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यात ४४८९६ उत्तीर्ण मुलांपैकी ६८९५ मुले, तर ४२८५३ मुलींपैकी ४०५२ मुली नापास झाल्या आहेत. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील ९५४२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ६९८९ विद्यार्थी नापास झाले.

नवी मुंबईचा निकाल घटलानवी मुंबई : बारावीत गेल्यावर्षीपेक्षा यंदा नवी मुंबईचा निकाल घटला. गेल्या वर्षी ९५.१६ टक्के असलेला निकाल यंदा ९०.६४ टक्क्यांवर आला. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली. ६० हून अधिक महाविद्यालयांतून १५,८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,७२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून १४,०८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ४० टक्के लागला आहे. 

पालघरमध्ये मोखाडा पुढे, तर डहाणू सर्वात मागे

पालघर : बारावीत पालघर जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला. उत्तीर्णांच्या टक्केवारीत मुलींनी (९२.५९ टक्के) मुलांवर (८९.२६ टक्के) बाजी मारल्याचे दिसून आले. सर्वाधिक निकाल मोखाडा तालुक्याचा (९४.७३ टक्के), तर सर्वांत कमी निकाल डहाणू तालुक्याचा (८५.१३ टक्के) लागला आहे. पालघर जिल्ह्यात २७,१९८ मुलांपैकी २४,२७७ उत्तीर्ण झाली असून २२,२५० मुलींपैकी २०,६०२ उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.२६ टक्के असून, मुलींचे ९२.५९ टक्के आहे.

भाईंदरच्या विद्यार्थ्यांची बाजी

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर आदी क्षेत्रांतील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मुरबाडमधील ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुरबाडपाठोपाठ भाईंदर शहरातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या भागाचा निकाल ९१.४९ टक्के लागला.

रायगडचा झेंडा फडकला

अलिबाग : रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.५३ टक्के लागला आहे. यंदाही मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्यात ८९.५७ टक्के मुले, तर ९४.४८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. जिल्ह्याच्या निकालात तळा तालुका अव्वल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात जिल्ह्याची अडीच टक्क्यांनी घसरण झाली आहे. परीक्षेसाठी ३१ हजार ६४८ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. यापैकी ३१ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २८ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल