शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

ठाण्यात १०० कोटींच्या रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST

ठाणे : वारंवार पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून शहरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ठाणेकरांकडून तीव्र संताप ...

ठाणे : वारंवार पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून शहरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ठाणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहराच्या विविध मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर शेकडो खड्डे असूनही महापालिकेने सध्या अवघे ११२ खड्डे असल्याचा दावा केला आहे. तर प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गेल्या वर्षी स्थानिकांना डावलून दिल्लीतील ज्या ठेकेदारास १०० कोटींची कामे कमी दराने दिली होती, त्याच रस्त्यांना आता खड्डे पडले असून, सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील म्हणून त्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याची चर्चा आहे.

दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र तरीसुद्धा जुन्या व नव्या रस्त्यांचीदेखील यंदाच्या पावसात चाळण झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात दोन हजार ८३६ खड्डे असून, त्यातील दोन हजार ७२४ खड्डे भरले आहेत. तर आजही ११२ खड्डे बुजविणे शिल्लक आहे.

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या जोडीने शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात आजघडीला २१ लाख ३८ हजार ६७ वाहने आहेत. परंतु, काही रस्त्यांचे रुंदीकरण झाले तर काहींची नव्याने बांधणी केली आहे. त्यानुसार शहरातील एकूण रस्त्यांची लांबी जी पूर्वी ३५६ किमी होती, त्यात २०१८-१९ मध्ये वाढ होऊन ती ३७० किमी एवढी झाली आहे. शहरात एकूण १४ प्रमुख रस्ते आहेत. त्यांचे क्षेत्रफळ ३०.७६ हेक्टर एवढे आहे. शहरात डांबरी रस्ते २१२.४९ किमीचे तर सिमेंट रस्ते १४६.९९ किमीचे आहेत. यातील काही रस्ते नव्याने विकसित केले आहेत.

तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खड्ड्यांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी नव्या पद्धतीने रस्ते विकसित करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार या रस्त्यांची कामे झाली जरी असली तरी त्या रस्त्यांवरही आता खड्डेच खड्डे असे चित्र आहे. शहरातील घोडबंदर, तीनहातनाका, नितीन कंपनी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, घोडबंदर सेवा रस्ता, माजिवडा, कापुरबावडी, कॅसल मिल तसेच येथील उड्डाणपूल या सर्वांवरच तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत.

यंदा खड्डे बुजविण्यासाठी अडीच कोटींचा खर्च महापालिकेने केला आहे. परंतु, या खड्ड्यांना तात्पुरता मुलामा लावला जात असल्याने या रस्त्यांची चाळण होत आहे. रस्ते तयार करण्यासाठी ज्या ज्या ठेकेदारांना ही कामे दिली होती त्यांच्याकडून ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे आता उघड झाले आहे. परंतु, त्यांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी महापालिका पुन्हा पुन्हा त्यांनाच रस्त्यांची कामे देत आहे. त्यातही एखादा रस्ता तयार करायचा झाला तर त्या रस्त्याच्या ठिकाणी किती लेयर असणे आवश्यक आहे, डांबर कशा प्रकारे वापरले गेले पाहिजे, त्याचे निकष - नियम काय आहेत यालाही कोलदांडा दाखवून ठेकेदारांकडून काम मिळविण्यासाठी आणि टक्केवारी देण्यासाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते केले जात आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडू नयेत म्हणून महापालिकेकडून यू टी डब्ल्यू टी अत्याधुनिक काँक्रिट यासह विविध प्रयोग करण्यात येत आहेत. मात्र, तरीही रस्त्यांची चाळण होत आहे.

रस्ते उभारणीत कामचुकारपणा किंवा ढिलाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ठामपा आयुक्तांकडून देण्यात येते. परंतु, कोणावरही कारवाई केली जात नाही. याचेही आश्चर्य वाटत आहे.

......