शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

भारताला एकेरीतील उत्कृष्ट खेळाडूंची गरज - विजय अमृतराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:20 IST

भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.

चेन्नई - भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.भारताचा नुकताच विश्व डेव्हिस प्ले आॅफ लढतीत सर्बियाकडून ०-४ ने पराभव झाला होता. या पराभवानंतर अमृतराज यांनी केलेले वक्तव्य सूचक असून, देशाचे लक्ष एकेरीत खेळाडू घडविण्यावर असायला हवे. आमच्याकडे चांगले एकेरीचे खेळाडू असायला हवेत. दुहेरीत खेळाडू कितीही चांगले असले तरी काही अर्थ नाही. आमच्याकडे पुरेशा प्रमाणावर एकेरीचे खेळाङू नसल्याने आम्ही एलिट ग्रुपसाठी पात्र ठरत नाही.’भारत आता १८ संघाचा सहभाग असलेल्या डेव्हिस कप फायनलच्या पात्रता मोहिमेंतर्गत पुढील वर्षीच्या स्थानिक आणि विदेशी प्रकारासाठी खेळणार आहे. रामकुमार रामनाथन आणि यूकी भांबरी या खेळाडूंच्या कामगिरीवर अमृतराज म्हणाले,‘दोन्ही युवा खेळाडू चांगले खेळले, पण त्यांनी फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे आहे. यूकीने आतापर्यंत प्रभावी खेळ केला, पण त्याची समस्या अशी की तो वर्षभर खेळत नाही. त्याने फिटनेसकडे अधिक लक्ष द्यायला हवे. रामकुमारनेदेखील काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ केला, पण त्याच्यासोबतही फिटनेसची समस्या कायम असल्याचे अमृतराज यांनी सांगितले.अलीकडे तामिळनाडू टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले अमृतराज पुढे म्हणाले,‘टेनिसपटूंनी इतके फिट असायला हवे की १५ व्या चेंडूपर्यंत रॅली चालली तरी त्याने पहिल्या चेंडूइतकाच वेग कायम राखायला शिकले पाहिजे.’ (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Tennisटेनिसnewsबातम्या