शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

भारताला एकेरीतील उत्कृष्ट खेळाडूंची गरज - विजय अमृतराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:20 IST

भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.

चेन्नई - भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.भारताचा नुकताच विश्व डेव्हिस प्ले आॅफ लढतीत सर्बियाकडून ०-४ ने पराभव झाला होता. या पराभवानंतर अमृतराज यांनी केलेले वक्तव्य सूचक असून, देशाचे लक्ष एकेरीत खेळाडू घडविण्यावर असायला हवे. आमच्याकडे चांगले एकेरीचे खेळाडू असायला हवेत. दुहेरीत खेळाडू कितीही चांगले असले तरी काही अर्थ नाही. आमच्याकडे पुरेशा प्रमाणावर एकेरीचे खेळाङू नसल्याने आम्ही एलिट ग्रुपसाठी पात्र ठरत नाही.’भारत आता १८ संघाचा सहभाग असलेल्या डेव्हिस कप फायनलच्या पात्रता मोहिमेंतर्गत पुढील वर्षीच्या स्थानिक आणि विदेशी प्रकारासाठी खेळणार आहे. रामकुमार रामनाथन आणि यूकी भांबरी या खेळाडूंच्या कामगिरीवर अमृतराज म्हणाले,‘दोन्ही युवा खेळाडू चांगले खेळले, पण त्यांनी फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे आहे. यूकीने आतापर्यंत प्रभावी खेळ केला, पण त्याची समस्या अशी की तो वर्षभर खेळत नाही. त्याने फिटनेसकडे अधिक लक्ष द्यायला हवे. रामकुमारनेदेखील काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ केला, पण त्याच्यासोबतही फिटनेसची समस्या कायम असल्याचे अमृतराज यांनी सांगितले.अलीकडे तामिळनाडू टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले अमृतराज पुढे म्हणाले,‘टेनिसपटूंनी इतके फिट असायला हवे की १५ व्या चेंडूपर्यंत रॅली चालली तरी त्याने पहिल्या चेंडूइतकाच वेग कायम राखायला शिकले पाहिजे.’ (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Tennisटेनिसnewsबातम्या