शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Davis Cup: तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तान दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 17:26 IST

भारत-पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकिय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते.

मुंबई: भारत-पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकिय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2012 वर्षानंतर एकही द्विदेशीय मालिका झालेली नाही. शिवाय पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यासाठी व्हिसाही अनेकदा नाकारल्याच्या घटना आहेत. पण, आता तब्बल 55 वर्षांनी भारताचा टेनिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. 

भारतीय टेनिस संघ पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये जाऊन डेविस कप खेळणार आहे. पाकिस्तान आणि भारत संघाचा सामना 1964 साली लाहोरमध्ये झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 4- 0 फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर 2006मध्ये दोन्ही देशांचा टेनिस सामना मुंबईत झाला होता. या सामन्यात देखील भारताने पाकिस्तानला 3- 2ने पराभूत केले होते. यामुळे 13 वर्षानंतर डेविस कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. 

यावर पाकिस्तानचा दिग्गज टेनिसपटू अकिल खानने मान्य केले आहे की, भारताने टेनिस खेळामध्ये पाकिस्तानच्या तुलनेने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे भारतासमोर विजय मिळवणे कठीण असणार आहे, पण अशक्य नाही. परंतू इस्लामाबाद येथे होणाऱ्या डेविस कपमध्ये आम्ही भारताला नमवून विजय मिळवू शकतो असा विश्वास त्याने व्यक्त केला. 

त्याचप्रमाणे भारत- पाकिस्तान टेनिस संघात सामना होत असल्याचा आनंद आहे. तसेच पाकिस्तानात या सामन्याची खूप उत्सुकता लागली आहे. या दौऱ्यामध्ये भारताचा संघ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पाकिस्तानच्या टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष सलीम सैफुल्लाह खान यांनी सांगितले.    

टॅग्स :Davis Tennis Cupडेव्हिस टेनिस कपPakistanपाकिस्तानIndiaभारत