शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वनप्लस, रिअलमी भारतातून काढता पाय घेणार? टीव्ही उत्पादन, विक्री अचानक केली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 11:52 IST

टीव्हीच्या विक्रीत वाढ झालेली असताना दोन्ही कंपन्यांनी टीव्ही बिझनेस का सोडला असा सवाल उपस्थित होत आहे.

चीनची आघाडीची इलेक्ट्रॉनिक कंपनी बनलेल्या वनप्लस आणि रिअलमी यांनी भारतात टीव्हींचे उत्पादन आणि विक्री दोन्ही अचानक बंद केली आहे. दोन्ही कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत चांगले स्थान मिळविलेले होते. मात्र, अचानक भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. याचा फायदा आता टीव्ही बिझनेसमध्ये नंबर वन असलेल्या शाओमीला होणार आहे. 

वनप्लस आणि रिअलमी या कंपन्या स्मार्टफोन बाजारात राहणार आहेत. टीव्हीच्या विक्रीत वाढ झालेली असताना दोन्ही कंपन्यांनी टीव्ही बिझनेस का सोडला असा सवाल उपस्थित होत आहे. या कंपन्यांनी भारतात टीव्ही विक्री चॅनेल आणि ब्रँडिंगमध्ये गुंतवणूक केली होती. इंटरनेटच्या तेजीमुळे आणि डेटाच्या किमती कमी झाल्यामुळे देशातील स्मार्ट टीव्ही मार्केटला अलीकडेच वेग आला आहे. तसेच ओटीटी प्लॅटफ़ॉर्मचा बिझनेसही वाढल्याने या टीव्हींना चांगली मागणी होती. 

क्रिकेट विश्वचषकामुळे देशात टीव्हीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच फेस्टिव्ह सिझन असल्याने कंपन्या दणकून ऑफर्स देत आहेत. अशावेळीच या कंपन्यांनी टीव्ही मार्केटपासून दूर जाण्याचा निर्णय़ घेतला आहे. महागाईचा परिणाम टीव्हीसह सर्वच वस्तूंच्या किंमतीवर झाला आहे. 

या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशातील डीलर्सना ४५ लाख टीव्ही पाठवण्यात आले आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी जास्त आहे. टीव्ही विक्रीतील ऑनलाइन विक्रीचा हिस्सा 39 टक्क्यांवर पोहोचला आहे. Xiaomi, OnePlus, Realme, TCL आणि iFalcon या चिनी कंपन्या आहेत. या कंपन्यांनी एलजी, सॅमसंग आणि सोनी पेक्षा 30 ते 50 टक्के स्वस्त टीव्ही लाँच केले होते. यामुळे त्यांना जास्त प्रमाणावर पाय रोवता आले होते. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलrealmeरियलमी