शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

सतत फोन बदलल्यामुळे होतं युजरचं नुकसान; अशाप्रकारे लोकांना फसवत आहेत कंपन्या, जाणून घ्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:56 IST

दरवर्षी नवीन स्मार्टफोन घेण्याचं विचार अनेकांच्या मनात येतो. कंपन्या देखील जुना फोन एक्सचेंज केल्यास सूट देतात. परंतु यामुळे खरंच ग्राहकांचा फायदा होतो का?  

स्मार्टफोन हल्ली आपल्या आयुष्याचा मोठा भाग बनला आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या या डिवाइसची सवय झालेली असते. काही वर्षांनी युजर्स आपला स्मार्टफोन बदलतात तर काही युजर्स दरवर्षी आपला स्मार्टफोन अपग्रेड करत असतात. यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स देखील बायबॅकचा पर्याय देऊन ग्राहकांना दरवर्षी नवीन डिवाइस घेण्यासाठी आकर्षित करतात. अनेकदा कोणतंही कारण नसताना स्मार्टफोन बदलणं तोट्याचं ठरू शकतं. कंपन्या देखली स्मार्टफोन अपग्रेड करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत आहेत.  

नवीन फोन घेण्याची घाई 

नवीन स्मार्टफोन आल्यावर ग्राहकांना तो विकत घेण्याचा मोह आवरत नाही. परंतु सामान्य ग्राहकांच्या एक बाब लक्षात येत नाही, ती म्हणजे नवीन स्मार्टफोन्सची किंमत जास्त असते. परंतु हाच फोन नंतर कमी किंमतीत विकला जातो. तसेच हेच स्मार्टफोन एखाद्या ऑनलाईन सेलमध्ये देखील मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात.  

फीचर्समध्ये जास्त बदल नसतो  

दरवर्षी स्मार्टफोनमध्ये इतकाही मोठा बदल झालेला नसतो. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवा मॉडेल काही एक्सट्रा फीचर्ससह येतो. याचं मोठं उदाहरण म्हणजे Apple iPhone. कंपनी जास्त बदल न करता नवीन स्मार्टफोन सादर करत असते, असा आरोप कंपनीचे चाहते देखील करतात. त्यामुळे अनेकदा अपग्रेड हा घाट्याचा सौदा वाटतो.  

विशेष म्हणजे Apple आपल्या जुन्या डिव्हाइसेसना देखील वेळच्या वेळी iOS अपडेट देतं. त्यामुळे नव्या हँडसेटमध्ये नवीन फीचर्स मिळत नाहीत. तरीही आकर्षक एक्सचेंज ऑफर देऊन कंपनी ग्राहकांना अपग्रेड करण्यास तयार करते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन