शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

सोशल मीडियावर माणसं अस्वस्थ का?; सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 8:31 AM

राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं.

ऑनलाईन जगात जशी धमाल असते, अगणित फायदे असतात, गॉसिप असतं, दोस्ती असते तसाच प्रचंड रागही असतो आणि तो सातत्याने दिसत असतो. मग, ते ट्रोलिंग असो, हेट कॉमेन्ट्स असोत नाहीतर गॉसिपच्या नावाखाली सातत्याने व्यक्त होणारा राग असो. ऑनलाईन जगात वावरताना हा राग सतत दिसतो, जाणवतो आणि त्याचा त्रासही भोगण्याची वेळ येऊ शकते. 

राग ही आदिम भावना आहे आणि तो आपल्या सगळ्यांना येतो. पण, सोशल मीडियावर त्याचं रूप ओंगळवाणं बनून जातं. अनोळखी माणसांवर विनाकारण आपण का रागावलेलो असतो हे समजून घेतलंच पाहिजे. सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. आपलं हटकेपण, वेगळेपण सिद्ध करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं. प्रत्यक्ष जगातही माणसं हे करतातच पण, ऑनलाईन जगात हे अस्त्र मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. स्वतःचं वेगळेपण जगाला दाखवण्याच्या नादात सतत इतर कुणाला तरी नावं ठेवली जातात आणि हे करता करता मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला जातो. 

सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. सतत रागावलेली असतात. चिडलेली असतात. कारण सतत ऑनलाईन असण्याचा जबरदस्त थकवा येऊ शकतो. आपल्याला हव्या त्या पद्धतीने तिथे गोष्टी घडल्या नाहीत तर, चिडचिड होऊ शकते आणि त्यातून येणारा राग प्रत्यक्ष आणि आभासी जगात निघायला सुरुवात होते. सतत ऑनलाईन असण्याच्या नादात मद्यपान, वेळेवर न खाणं, अति खाणं, पुरेशी झोप न होणं हे सगळे प्रकार घडतात. त्यातून एकूण शरीर स्वास्थ्य बिघडतं. परिणाम राग. अजून एक कारण म्हणजे ऑनलाईन होणाऱ्या चर्चा. यात माणसांचा पेशन्स चटकन संपतो आणि भांडाभांडी, रागराग सुरु होतो.

ऑनलाईन राग ही अतिशय कॉमन भावना आहे. कारण एकतर इथे निनावी वावरता येतं आणि नाव घेऊन वावरलं तरी लगेच कुणी दात तोडायला येणार नसतं. जी काही हाणामारी असते ती फक्त शाब्दिक असते, त्यामुळे ती काहीशी सेफ वाटते. मग, आपण अधिकच रागवायला आणि राग सतत व्यक्त करायला लागतो.  ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंटची आज जवळपास प्रत्येकाला गरज आहे. हा विषय नवा असला तरी टाळता येण्यासारखा नाहीये. कशी करावी ऑनलाईन ॲन्गर मॅनेजमेंट. बघूया पुढच्या भागात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया