शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

WhatsApp चा लाखो युजर्सना झटका! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर घातली बंदी, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 14:27 IST

WhatsApp News : WhatsApp ने आपल्या लाखो युजर्सना मोठा धक्का दिला आहे. जुलैमध्ये भारतातील 23 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली.

WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र आता WhatsApp ने आपल्या लाखो युजर्सना मोठा धक्का दिला आहे. नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत जुलैमध्ये भारतातील 23 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली. कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. भारतात जुलै महिन्यात WhatsApp वर 574 तक्रारी आल्या आणि 27 वर कारवाई करण्यात आली. देशातील 40 कोटींहून अधिक युजर्स असलेल्या या प्लॅटफॉर्मने जूनमध्ये खराब रेकॉर्ड असलेल्या 22 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी घातली होती.

कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, IT नियम 2021 नुसार, आम्ही जुलै 2022 साठी आमचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. मासिक रिपोर्टमध्ये नोंदवल्याप्रमाणे, WhatsApp ने जुलै महिन्यात 2.3 मिलियन म्हणजेच 23 लाखांहून (2387,000) अधिक अकाऊंटवर बंदी घातली आहेत.

माहिती तंत्रज्ञान नियम 2021 च्या 4(1) (d) नुसार प्रकाशित, अहवालात भारतातील युजर्सकडून आलेल्या तक्रारींवर WhatsApp ने केलेल्या कारवाईचा डेटा आहे. तक्रार यंत्रणेद्वारे आक्षेप प्राप्त झाले आणि सेवा अटींचे उल्लंघन केल्याबद्दल अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. IT नियम 2021 अंतर्गत, 50 लाखांहून अधिक युजर्स असलेल्या प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मासिक रिपोर्ट प्रकाशित करणे आवश्यक आहे. 

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवांमधील गैरवापर रोखण्यासाठी Whatspp अग्रणी आहे. वर्षानुवर्षे, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा प्रक्रियांमध्ये गुंतवणूक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान