शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? कोणता सर्वाधिक खपतोय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:23 IST

जर तुम्हाला ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन कोणता किंवा कोणती कंपनी हे माहिती आहे का?

गेल्या दोन वर्षांपासूनच देशात फाईव्ह जी येणार असल्याचे वारे सुरु झाले होते. यामुळे कंपन्याही काहीच कल्पना नसताना फाईव्हजी फोन लाँच करत होत्या. आताच आलेल्या एका रिपोर्टनुसार शाओमीचे दोन फोन जिओचे फाईव्ह जी नेटवर्क वापरण्यास असमर्थ आहेत. आता देशात फाईव्ही जी लाँच झाले आहेत. यामुळे लोकांचा हे फोन घेण्याकडे सर्वाधिक कल आहे. १० हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंत फोन उपलब्ध आहेत. 

जर तुम्हाला ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन कोणता किंवा कोणती कंपनी हे माहिती आहे का? Xiaomi आणि Realme चे 5G स्मार्टफोन भारतात सर्वाधिक पसंत केले जात आहेत. यामध्ये 10 हजार ते 20 हजार रुपयांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. देशात २० हजारांच्या आतील ५जी स्मार्टफोन सर्वाधिक विकले जात आहेत. 

या रेंजमधील एकूण स्मार्टफोनचा वाटा हा सध्या ८० टक्के आहे. Airtel आणि Jio द्वारे वापरकर्त्यांना 5G सेवा मोफत दिली जात आहे. ही सेवा सध्या विस्तारत आहे. लोकांना ५जीची रेंज असताना क़ॉलिंगवेळी समस्या येत आहे. अनेकदा फोन लागत नाहीय, लागलाच तर एका बाजुचाच आवाज ऐकायला येतोय अशा समस्या आहेत. या समस्या दूर करून एका वर्षात 5G नेटवर्क देशभरात आणले जाईल.

महागड्या 5G स्मार्टफोनमध्ये Samsung, Vivo आणि Oppo चा बोलबाला आहे. तर Apple प्रीमियम 5G स्मार्टफोन बाजारात यशस्वी आहे. सायबरमीडिया रिसर्चच्या अहवालानुसार २०२३ च्या अखेरीपर्यंत शिपमेंटमधील ५जी फोनची संख्या ७० टक्क्यांवर जाईल. २०२२ मध्ये हा वाटा ४५ टक्के असू शकतो. 2022 मध्येच 100 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. 

 

टॅग्स :5G५जी