शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:37 IST

भारतीय बाजारात शाओमीची विक्री दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. व्हिवो, सॅमसंग, ओप्पो या कंपन्यांनी शाओमीचे मार्केट हलवून टाकले आहे.

भारतात जेव्हा फोरजी सुरु झाले तेव्हा रिलायन्स जिओ आणि शाओमी हे समीकरणच बनले होते. त्यापूर्वीपासून शाओमीचे फोन प्रत्येकाच्या हातात दिसत होते. परंतू, आता शाओमी खूपच मागे पडली आहे. काही वर्षांपूर्वी नोकियाचे जे झाले होते ते आता शाओमीसोबत होताना दिसत आहे. भारतातून शाओमी कमी होऊ लागली आहे. 

भारतीय बाजारात शाओमीची विक्री दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. व्हिवो, सॅमसंग, ओप्पो या कंपन्यांनी शाओमीचे मार्केट हलवून टाकले आहे. एकेकाळी शाओमीची विक्री सर्वाधिक होती, ती आता तळाला जाताना दिसत आहे. कमी होत चाललेली शिपमेंट, गोठलेला पैसा आणि वाढत्या नियामक दबावांमुळे शाओमी भारतीय बाजारात झगडत आहे. 

 नुकत्याच आलेल्या आयडीसी रिपोर्टनुसार शाओमीच्या शिपमेंट भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत २३.५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. एवढेच नाहीतर शाओमी पहिल्या पाचातूनही बाहेर पडली आहे. रेडमी ब्रँड देखील फारसा चालत नाहीय. रेडमीचे मार्केट ओप्पो, वनप्लसचा सहकारी ब्रँड रिअलमीने संपविले आहे. नाही म्हणायला पोको तेवढा थोडाफार दिसत आहे. मध्यम ते प्रिमिअम श्रेणीतील फोनची विक्री मोठ्या प्रमाणावर घटली आहे. या श्रेणीचा ग्राहक ओप्पो, व्हिवो, वनप्लस या कंपन्यांकडे वळू लागला आहे.  

आयकर विभाग, ईडी आणि इतर एजन्सींच्या चौकशीमुळे कंपनीचे ४७०० कोटी रुपये अडकलेले आहेत. २०२२ पासून अनेक प्रमुख व्यक्तींनी कंपनी सोडली आहे. ब्रँडने त्यांचे मार्केटिंग खर्च देखील कमी केले आहेत. जेव्हा फोरजी आलेले तेव्हा कंपनीचा जगातील उत्पन्नाचा ४५ टक्के वाटा हा भारतातून येत होता. आता हा आकडा एका आकड्यावर येऊन ठेपला आहे. शाओमीने आता भारतातून लक्ष काढून घेतल्याचेच हे संकेत दिसत आहेत. 

टॅग्स :xiaomiशाओमी