शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:37 IST

भारतीय बाजारात शाओमीची विक्री दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. व्हिवो, सॅमसंग, ओप्पो या कंपन्यांनी शाओमीचे मार्केट हलवून टाकले आहे.

भारतात जेव्हा फोरजी सुरु झाले तेव्हा रिलायन्स जिओ आणि शाओमी हे समीकरणच बनले होते. त्यापूर्वीपासून शाओमीचे फोन प्रत्येकाच्या हातात दिसत होते. परंतू, आता शाओमी खूपच मागे पडली आहे. काही वर्षांपूर्वी नोकियाचे जे झाले होते ते आता शाओमीसोबत होताना दिसत आहे. भारतातून शाओमी कमी होऊ लागली आहे. 

भारतीय बाजारात शाओमीची विक्री दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. व्हिवो, सॅमसंग, ओप्पो या कंपन्यांनी शाओमीचे मार्केट हलवून टाकले आहे. एकेकाळी शाओमीची विक्री सर्वाधिक होती, ती आता तळाला जाताना दिसत आहे. कमी होत चाललेली शिपमेंट, गोठलेला पैसा आणि वाढत्या नियामक दबावांमुळे शाओमी भारतीय बाजारात झगडत आहे. 

 नुकत्याच आलेल्या आयडीसी रिपोर्टनुसार शाओमीच्या शिपमेंट भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत २३.५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. एवढेच नाहीतर शाओमी पहिल्या पाचातूनही बाहेर पडली आहे. रेडमी ब्रँड देखील फारसा चालत नाहीय. रेडमीचे मार्केट ओप्पो, वनप्लसचा सहकारी ब्रँड रिअलमीने संपविले आहे. नाही म्हणायला पोको तेवढा थोडाफार दिसत आहे. मध्यम ते प्रिमिअम श्रेणीतील फोनची विक्री मोठ्या प्रमाणावर घटली आहे. या श्रेणीचा ग्राहक ओप्पो, व्हिवो, वनप्लस या कंपन्यांकडे वळू लागला आहे.  

आयकर विभाग, ईडी आणि इतर एजन्सींच्या चौकशीमुळे कंपनीचे ४७०० कोटी रुपये अडकलेले आहेत. २०२२ पासून अनेक प्रमुख व्यक्तींनी कंपनी सोडली आहे. ब्रँडने त्यांचे मार्केटिंग खर्च देखील कमी केले आहेत. जेव्हा फोरजी आलेले तेव्हा कंपनीचा जगातील उत्पन्नाचा ४५ टक्के वाटा हा भारतातून येत होता. आता हा आकडा एका आकड्यावर येऊन ठेपला आहे. शाओमीने आता भारतातून लक्ष काढून घेतल्याचेच हे संकेत दिसत आहेत. 

टॅग्स :xiaomiशाओमी