शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार; मोबाईलवर बोलणे महागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 18:25 IST

या महिन्याच्या सुरुवातीलाच जियो, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियानं टॅरिफमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील वर्षी देखील या किंमती अजून वाढणार आहेत.  

नवीन वर्षात तुमचा प्री पेड रिचार्ज आणि पोस्टपेड बिल वाढू शकतं. टेलीकॉम कंपन्या पुन्हा एकदा टॅरिफ बढ़ा वाढवू शकतात. टेलिकॉम इंडस्ट्रीमधील तिन्ही बड्या कंपन्यांनी 1 डिसेंबर 2021 पासून आपल्या प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती. यावर्षी 20-25 टक्के वाढ करूनही पुढील वर्षी मोबाईलवर बोलणे महागणार आहे. यामागे भारतात येणारं 5G नेटवर्क कारण असू शकतं.  

2022 मध्ये देशात 5G नेटवर्क सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला काही मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल. विशेष म्हणजे ट्रायल बेसिसच्या ऐवजी ही सेवा थेट ग्राहकांना उपलब्ध होईल. 5जी मुळे टेलीकॉम कंपन्यांच्या उत्पनात वाढ होईल. परंतु त्यासाठी कंपन्यांना तेवढाच खर्च देखील करावा लागेल.  

आधीच कर्जात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना 2022 मध्ये 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभाग घ्यावा लागेल. यावर मोठी रक्कम खर्च होणे अपेक्षित आहे. हा पैसे कंपन्या टॅरिफ वाढवून परत मिळवू शकतात. सध्या भारत जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा प्लॅन असलेल्या देशांपैकी एक देश आहे. परंतु पुढील वर्ष हे चित्र बदलू शकतं.  

यावर्षी केलेल्या भाववाढीमुळे एयरटेल आणि जियोकडे पैसे आले आहेत, परंतु वोडाफोन-आयडिया मात्र अजूनही सावरलेली नाही, अशी माहिती फिच रेटिंग्सचे सीनियर डायरेक्टर नितिन सोनी यांनी दिली आहे. त्यांनी पुढील 12 महिन्यात टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करतील, असा अंदाज वर्तवला आहे.  

हे देखील वाचा: 

WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

OnePlus फॅन्ससाठी बॅड न्यूज! भारतातील 3 मॉडेल्स होणार बंद, यावर्षी लाँच झालेल्या वनप्लसचाही समावेश

टॅग्स :technologyतंत्रज्ञान