शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

विजेशिवाय चालणार भन्नाट फ्रिज! कोविड वॅक्सीन अपव्यय टाळणार आणि सैनिकांना देणार थंड पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:05 IST

उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका अशा फ्रिजची निर्मिती केली आहे जो विजेशिवाय चालतो.  

नवी दिल्ली: भारतात कोविड वॅक्सीनचं वितरण करणं कठीण काम आहे, कारण लस योग्य त्या तापमानावर साठवून ठेवावी लागते. तापमान वाढल्यास लस खराब होऊ शकते. त्यामुळे दुर्गम भागात किंवा जिथे वीज नाही अशा भागात लस पोहोचवतना अनेक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजीनियरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने सौर उर्जेवर चालणाऱ्या रेफ्रिजरेटरची निर्मिती केली आहे.  

समरजीत सिंह असं या विद्यार्थ्याचं नाव आहे, तो सध्या कानपुरमधील अ‍ॅक्सिस कॉलेजमध्ये बी.टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. समरजीतनं आरोग्य केंद्रांवर विजेचा अभाव असल्याच्या समस्येवर उपाय शोधला आहे. सौर उर्जेवर चालणारा हा रेफ्रिजरेटर जीवनावश्यक औषध आणि लसी सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. जिथे वीज नाही किंवा वीज वारंवार जाते अशा ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी हा फ्रिज खूप उपयुक्त ठरेल.  

हा फ्रिज चार तास उन्हात चार्ज केल्यावर 12 तास आतील वस्तू थंड ठेवण्याचे काम करतो. यासाठी फ्रिजमध्ये अतिरिक्त बॅटरी देण्यात आली आहे. याची क्षमता 5 लिटर ठेवण्यात आली आहे. वजन कमी असल्यामुळे हा कुठेही सहज नेता येतो. समरजीतनं फ्रिजमध्ये कंप्रेसरच्या ऐवजी थर्मोइलेक्ट्रिकचा वापर केला आहे. या फ्रिजला विजेची आवश्यकता नाही.  

समरजीतनं या फ्रिजच्या पेटंटसाठी देखील अर्ज दिला आहे. “मी एक सौर फ्रिज बनवला आहे. यात कंप्रेसरचा वापर न करता डिवाइसचा प्रोटोटाइप बनवला आहे,” असं समरजीतनं म्हटलं आहे. हा डिवाइस सौर उर्जेचा वापर करतो त्यामुळे पर्यावरणाची देखील रक्षा होते. हा डिवाइस बनवण्यासाठी 3,000 ते 3,500 रुपये खर्च आला आहे.  

समरजीतनं म्हटलं आहे की, सौर पॅनलचा वापर करणारा हा रेफ्रिजरेटर वीज नसलेल्या भागांमध्ये आपल्या देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी देखील उपयुक्त ठरेल. या डिवाइसमधून सैनिकांना थंड पाणी तर मिळेलच परंतु आवश्यक असलेली इंजेक्शन, औषधं आणि खाण्यापिण्याचे पदार्थ देखील थंड राहतील.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान