शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विजेशिवाय चालणार भन्नाट फ्रिज! कोविड वॅक्सीन अपव्यय टाळणार आणि सैनिकांना देणार थंड पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:05 IST

उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका अशा फ्रिजची निर्मिती केली आहे जो विजेशिवाय चालतो.  

नवी दिल्ली: भारतात कोविड वॅक्सीनचं वितरण करणं कठीण काम आहे, कारण लस योग्य त्या तापमानावर साठवून ठेवावी लागते. तापमान वाढल्यास लस खराब होऊ शकते. त्यामुळे दुर्गम भागात किंवा जिथे वीज नाही अशा भागात लस पोहोचवतना अनेक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजीनियरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने सौर उर्जेवर चालणाऱ्या रेफ्रिजरेटरची निर्मिती केली आहे.  

समरजीत सिंह असं या विद्यार्थ्याचं नाव आहे, तो सध्या कानपुरमधील अ‍ॅक्सिस कॉलेजमध्ये बी.टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. समरजीतनं आरोग्य केंद्रांवर विजेचा अभाव असल्याच्या समस्येवर उपाय शोधला आहे. सौर उर्जेवर चालणारा हा रेफ्रिजरेटर जीवनावश्यक औषध आणि लसी सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. जिथे वीज नाही किंवा वीज वारंवार जाते अशा ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी हा फ्रिज खूप उपयुक्त ठरेल.  

हा फ्रिज चार तास उन्हात चार्ज केल्यावर 12 तास आतील वस्तू थंड ठेवण्याचे काम करतो. यासाठी फ्रिजमध्ये अतिरिक्त बॅटरी देण्यात आली आहे. याची क्षमता 5 लिटर ठेवण्यात आली आहे. वजन कमी असल्यामुळे हा कुठेही सहज नेता येतो. समरजीतनं फ्रिजमध्ये कंप्रेसरच्या ऐवजी थर्मोइलेक्ट्रिकचा वापर केला आहे. या फ्रिजला विजेची आवश्यकता नाही.  

समरजीतनं या फ्रिजच्या पेटंटसाठी देखील अर्ज दिला आहे. “मी एक सौर फ्रिज बनवला आहे. यात कंप्रेसरचा वापर न करता डिवाइसचा प्रोटोटाइप बनवला आहे,” असं समरजीतनं म्हटलं आहे. हा डिवाइस सौर उर्जेचा वापर करतो त्यामुळे पर्यावरणाची देखील रक्षा होते. हा डिवाइस बनवण्यासाठी 3,000 ते 3,500 रुपये खर्च आला आहे.  

समरजीतनं म्हटलं आहे की, सौर पॅनलचा वापर करणारा हा रेफ्रिजरेटर वीज नसलेल्या भागांमध्ये आपल्या देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी देखील उपयुक्त ठरेल. या डिवाइसमधून सैनिकांना थंड पाणी तर मिळेलच परंतु आवश्यक असलेली इंजेक्शन, औषधं आणि खाण्यापिण्याचे पदार्थ देखील थंड राहतील.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान