शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विजेशिवाय चालणार भन्नाट फ्रिज! कोविड वॅक्सीन अपव्यय टाळणार आणि सैनिकांना देणार थंड पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:05 IST

उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका अशा फ्रिजची निर्मिती केली आहे जो विजेशिवाय चालतो.  

नवी दिल्ली: भारतात कोविड वॅक्सीनचं वितरण करणं कठीण काम आहे, कारण लस योग्य त्या तापमानावर साठवून ठेवावी लागते. तापमान वाढल्यास लस खराब होऊ शकते. त्यामुळे दुर्गम भागात किंवा जिथे वीज नाही अशा भागात लस पोहोचवतना अनेक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील इंजीनियरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने सौर उर्जेवर चालणाऱ्या रेफ्रिजरेटरची निर्मिती केली आहे.  

समरजीत सिंह असं या विद्यार्थ्याचं नाव आहे, तो सध्या कानपुरमधील अ‍ॅक्सिस कॉलेजमध्ये बी.टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. समरजीतनं आरोग्य केंद्रांवर विजेचा अभाव असल्याच्या समस्येवर उपाय शोधला आहे. सौर उर्जेवर चालणारा हा रेफ्रिजरेटर जीवनावश्यक औषध आणि लसी सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. जिथे वीज नाही किंवा वीज वारंवार जाते अशा ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी हा फ्रिज खूप उपयुक्त ठरेल.  

हा फ्रिज चार तास उन्हात चार्ज केल्यावर 12 तास आतील वस्तू थंड ठेवण्याचे काम करतो. यासाठी फ्रिजमध्ये अतिरिक्त बॅटरी देण्यात आली आहे. याची क्षमता 5 लिटर ठेवण्यात आली आहे. वजन कमी असल्यामुळे हा कुठेही सहज नेता येतो. समरजीतनं फ्रिजमध्ये कंप्रेसरच्या ऐवजी थर्मोइलेक्ट्रिकचा वापर केला आहे. या फ्रिजला विजेची आवश्यकता नाही.  

समरजीतनं या फ्रिजच्या पेटंटसाठी देखील अर्ज दिला आहे. “मी एक सौर फ्रिज बनवला आहे. यात कंप्रेसरचा वापर न करता डिवाइसचा प्रोटोटाइप बनवला आहे,” असं समरजीतनं म्हटलं आहे. हा डिवाइस सौर उर्जेचा वापर करतो त्यामुळे पर्यावरणाची देखील रक्षा होते. हा डिवाइस बनवण्यासाठी 3,000 ते 3,500 रुपये खर्च आला आहे.  

समरजीतनं म्हटलं आहे की, सौर पॅनलचा वापर करणारा हा रेफ्रिजरेटर वीज नसलेल्या भागांमध्ये आपल्या देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी देखील उपयुक्त ठरेल. या डिवाइसमधून सैनिकांना थंड पाणी तर मिळेलच परंतु आवश्यक असलेली इंजेक्शन, औषधं आणि खाण्यापिण्याचे पदार्थ देखील थंड राहतील.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान