शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

स्मार्टफोनचा अतिवापर धोकादायक! एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 22:10 IST

Smartphone : सर्वेक्षण रिपोर्टनुसार, 66 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात.

नवी दिल्ली : स्मार्टफोनमुळे आपल्या अनेक गरजा सोप्या झाल्या आहेत. आपण दूर असतानाही आपल्या कुटुंबीयांसह मित्रांसोबत स्मार्टफोनद्वारे जोडलेले राहतो. पण तुम्हाला माहीत आहे का? स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तुमची मुले तुमच्यापासून दूर जात आहेत. हे सायबर मीडिया रिसर्चच्या (सीएमआर) इंपॅक्ट ऑफ स्मार्टफोन ऑन ह्युमन रिलेशनशिप 2021 च्या (Impact of Smartphone on Human Relationship 2021) रिपोर्टमधून समोर आले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, तुमच्या स्मार्टफोनच्या अतिवापराचा मुलाच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

काय सांगतो सर्वेक्षणातील रिपोर्ट?

1) सर्वेक्षण रिपोर्टनुसार, 66 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात.

2) 74 टक्के भारतीयांच्या मते, स्मार्टफोनमुळे मुलांसोबत त्यांचे नातेसंबंध बिघडत आहेत.

3) 75 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की, स्मार्टमुळे लक्ष विचलित होते, ज्यामुळे ते आपल्या मुलांबद्दल अधिक सतर्क राहू शकत नाहीत.

4) 74 टक्के लोकांना असे वाटते की जेव्हा ते स्मार्टफोनमध्ये व्यस्त असतात आणि मुले काही विचारतात तेव्हा त्यांची चिडचिड होते.

5) स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांचे लक्ष विचलित होत नाही, असे 69 टक्के लोकांचे मत आहे.

6) 90 टक्के पालकांना असे वाटते की स्मार्टफोन वापरामुळे मुले आक्रमक होत आहेत.

7) 85 टक्के पालकांचे असे म्हणणे आहे की मुले स्मार्टफोनमुळे सामाजिक जीवनापासून दूर जात आहेत.

8) 90 टक्के पालकांना असे वाटते की मुलांमध्ये सामाजिक व्यवहार कमी होत आहे.

9) कोविड-19 दरम्यान भारतीयांनी दिवसाचे सुमारे 6.5 तास घालवले आहेत, जे 32 टक्के जास्त आहे.

10) 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना असे वाटते की स्मार्टफोन्स हे त्यांच्या कुटुंबीयांशी जोडण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात.

11) 94 टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की स्मार्टफोन त्यांच्या शरीराचा एक भाग बनला आहे आणि तो त्यांच्यापासून वेगळा केला जाऊ शकत नाही.

12) बाहेर जेवताना (70%), दिवाणखान्यात (72%) आणि कुटुंबासोबत बसताना (75%) लोक त्यांचा फोन वापरतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन